एक्स्प्लोर

 Maharashtra High Alert : मुंबईत नाकाबंदी, समुद्र किनारच्या जिल्ह्यात झाडाझडती, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी

Maharashtra High Alert : रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra High Alert : रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट (High Alrt) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच पालघरच्या किनारपट्टी भागातही पालघर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. रायगडमध्ये आज दोन संशयास्पद बोटी जप्त करण्यात आल्या त्या बोटींमध्ये शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व किनारी भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव किनारी भागांसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व माहिती राज्य सरकारकडून केंद्रीय एजन्सींना देण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात हायअलर्ट जारी कऱण्यात आला आहे. तसेच इतर राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल रायगडला रवाना झाला आहेत. 

पुण्यात हाय अलर्ट-
रायगडमधील एका बोटीमध्ये शस्त्रासह साठा सापडल्यानंतर पुण्यात देखील हाय अलर्ट करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहेत. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बोलावली तातडीची बैठक बोलवली आहे. 

किनारी भागात हाय अलर्ट - 
रत्नागिरीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते श्रीवंर्धनला रवाना झाले आहेत. संजय मोहितेंसोबत विशेष पथकही रवाना झाले आहे. रायगडमध्ये आढळलेल्या बोटीची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. रायगडसह सर्वच किनारी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बोटीमध्ये एके 47 - 
रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत.   या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ओमान देशातील बोट - 
हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspected Boat) ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. 

घातपाताचा कट?
रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

संशयास्पद बोटीबाबत आतापर्यंत काय काय माहिती समोर आली?

  • हरिहरेश्वर समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली.
  • बोटीवर 3 एके-47 रायफल्स आणि 225 राऊंड्स (काडतुसं) आढळले.
  • बोटीवर 10 बॉक्स सापडले.
  • बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये केली असल्याची माहिती.
  • बोटीवर असलेले दोन जण ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती.
  • ही बोट ओमानमधून भरकटल्याची शक्यता.
  • संशयास्पद बोट आढळल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी.
  • बोटीवर हत्यारं आढळल्यानं संशय बळावला.
  • एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल घटनास्थळाकडे रवाना.
  • दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत एटीएसकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

रायगड किनारा का महत्वाचा?

  • पश्चिम किनारपट्टीवरील रायगडचा किनारा संवेदनशील आहे.
  • रायगडच्या किनाऱ्यावरुन याआधीही स्फोटकं आल्याचा इतिहास आहे. 
  • 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी रायगड किनाऱ्यावरच स्फोटकं उतरवण्यात आली. 
  • 2008 मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ला समुद्रमार्गेच झाला होता. 
  • रायगड किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.