एक्स्प्लोर

आता पक्ष आणि चिन्ह मिळणारच नाही, उद्धव ठाकरेंचं नेमकं कुठं कुठं चुकलं? श्रीहरी अणेंनी कायदेशीर बाबी सांगितल्या

Shrihari Aney : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबद्दल मोठा निकाल दिला. या निकालावर राजकीय प्रतिक्रिया तर अनेक आल्या. पण सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्या निकालाचं कायदेशीर विश्लेषण.

Shiv Sena MLA Disqualification Verdict Shrihari Aney : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबद्दल (Shiv Sena) मोठा निकाल दिला. या निकालावर राजकीय प्रतिक्रिया तर अनेक आल्या. पण सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्या निकालाचं (Shiv Sena MLA Disqualification Verdict ) कायदेशीर विश्लेषण. त्यासाठी आम्ही राज्याचे महाधिवक्ते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. श्रीहरी (Shrihari Aney) अणे यांच्याशी सविस्तर बातचित केली. अध्यक्षांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या चौकटीतच होता, असं मत डॉ. अणे यांनी व्यक्त केलं. राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना तंतोतंत कायदा पाळण्याची सवय नसते, मात्र जेव्हा वाद होतो तेव्हा मग त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं महत्त्वाचं निरीक्षण देखील अणे यांनी नोंदवलं. तसंच, दोन्ही गटांना एकमेकांचे व्हिप पाळण्याची गरज नाही, त्यांनी आपापले व्हिप पाळावे असं मत देखील अणे यांनी व्यक्त केलं. 

अध्यक्षांचा निर्णय कोर्टानं घालून दिलेल्या चौकटीतच आहे, असे अणे यांनी सांगितलं. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांची नेमकी चूक कुठे झाली? याबाबतही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या घटनेत त्रुटी होत्या हे सिद्ध झालं. ठाकरेंनी पक्षाच्या घटनेकडे लक्ष दिलं नाही.  केलेले बदल योग्यरित्या निवडणूक आयोगाला कळवलेच नाहीत. नेत्याच्याही वर कायदा असतो हे अनेकांना कळत नाही. कायदेशीररित्या गोष्टी केल्या नाहीत तर परिणाम भोगावे लागतात, असे अणे यांनी सांगितलं. त्याशिवाय धनुष्यबाण आता उद्धव ठाकरेंना मिळणार नाही, असेही श्रीहरी  अणे यांनी सांगितलं.  

शिवसेना अपात्रेबाबत अध्यक्षांनी दिलेला निकाल हा त्यांना घालून दिलेल्या चौकटीतच आहे. याउलट जर त्यांना अधिक पुरावे तपासण्याचा अवधी मिळाला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असं जेष्ठ कायदेतज्ञ आणि घटनेचे अभ्यासक श्रीहरी अणे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय. तसेच शेवटी कोणतंही कोर्ट अध्यक्ष कोण?, पक्ष कोणाचा?, नेता कोण? हे ठरवू शकत नाही. ते शेवटी जनताच मतपेटीतून ठरवेल असंही अणेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं तरी शेवटचा निकाल हा जनतेचाच असेल. मात्र पक्षाच्या घटनेची वैधता, व्हीप या बाबींच्या बाबतीत त्यांचा कायदेशीर लढा हा सुरूच राहील. तूर्तास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे व्हीप हे वेगळे राहतील ते दोन्ही गटांकरता बंधनकारक होऊ शकणार नाहीत. आणि भविष्यात हात घटनाक्रम राष्ट्रवादी काँग्रेच्या बाबतीतही पाहायला मिळेल. कारण सध्याच्या काळातील लोकशाहीत घराणेशाहीला स्थान नाही, हे या उदाहरणांवरून सिद्ध होतंय. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या घटनांची योग्य पद्धतीन रचना करून ती अधिकृत करून घेणं आवश्यक असल्याचं अणेंनी आपल्या सांगितलं.

नेमका निकाल काय ?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी पार पडलं.  एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.