एक्स्प्लोर

सरकारने राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करुन मराठ्यांना आरक्षण द्यावं : शरद पवार

राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.

कोल्हापूर : राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा,  धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अस्वस्थतेचं वातावरण आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापुरात शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला आहे. आजच्या युती सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर दिलेल्या वेळेत आश्वासन पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आज मराठा समाज आक्रमक झाला असल्याचंही शरद पवार म्हणालेत. आरक्षणाचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच सरकार असताना निर्णय घेतला होता. त्या काळात सरकारी भरतीमध्ये 16 टक्के जागा भरल्या गेल्या.  या निर्णयाविरोधात काही व्यक्ती कोर्टात गेल्या आणि निर्णय रद्दबातल ठरवला असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आणि नंतर ठिणगी पडली. त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील आंदोलने भडकली असा घणाघातही शरद पवारांनी केला आहे. वारीत साप सोडल्याच विधान नेत्यांनी केल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्याच्या विधानांनी आगीत तेल ओतण्याचे काम केलं म्हणून राज्यात मराठा समाजाची आंदोलने भडकली असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी शरद पवारांनी कोल्हापुरात केली आहे. “माझा पक्ष संसदेत लहान आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाण्यासाठी घटनेत दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. घटना दुरुस्तीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी आणि विनंती मी करेन” असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. राज्यात जास्त काळ अस्वस्थतेच वातावरण हितावह नाही. राज्य सरकारच्या भूमिकेविरोधातील राग या आंदोलनातून बाहेर पडत आहे. त्यामुळे सरकारने सुप्रीम कोर्टात भक्कम बाजू मांडावी अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न हा भाजपा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या बाबत आम्ही काय बोलणार? कारण नसताना  मुख्यमंत्र्याच्या जातीवर विधान करणं योग्य नाही, अस मला वाटतं असंही शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील जागा वाटपा बाबत लवकरच प्रक्रिया सुरू होईल, या बाबत काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, असं विधान लोकसभा निवडणुकीवर बोलताना शरद पवारांनी केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget