एक्स्प्लोर

मराठवाडा, विदर्भ, नाशिकमध्ये परतीच्या पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

परतीच्या पावसामुळे, मराठवाड्यात सोयाबीन तर विदर्भात कापसाचं मोठं नुकसान झालं आहे. तर मनमाडमधल्या द्राक्षांच्या बागांना आणि रब्बीच्या पेरणीलाही मोठा फटका बसला आहे

मुंबई : राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दिवाळीच्या सणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आणि पहिल्यांदाच हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. पाऊस येणार नाही असं वाटून गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मराठवाड्यात परतीच्या पावसाचा पिकांना फटका गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान केलंय. यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नव्हता. तरीही मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड केली. हाताला आलेली पिकं काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली. बाजरीचे पीक काढणी काढून ठेवण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे बाजरीच्या देठाला पुन्हा अंकुर फुटलाय. कापसाचे ही तसेच बेहाल आहेत. उडीद भुईसपाट झाला. तीळ कधी गळून पडले कळलच नाही. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिकं डोळ्यादेखत उद्धवस्त होत असल्याचं शेतकऱ्यांना पाहावं लागलं. विदर्भात खरीप, रब्बी पिकांचं नुकसान परतीच्या पाऊसामुळे विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.  तर डाळींब, पपई, या फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाल. परतीच्या पावसाचा कहर, पिकांचं मोठं नुकसान | Beed | ABP Majha नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांद्याच नुकसान परतीच्या पावसाने नाशिक जिल्हयाला चांगलाच तडाखा दिल्याने कांदा आणि द्राक्ष पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नाशिक जिल्हयात द्राक्ष आणि कांद्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेत असतो. यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले त्यामुळे खरीपाच्या कांद्याची लागवड सुध्दा उशिरा सुरु झाली.चांगला पाऊस झाल्याने कांद्याच उत्पादन सुध्दा चांगले निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा तर खराब झालाच शिवाय ज्या शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकली होती ती सुध्दा सततच्या पाण्यामुळे सडून गेल्याने या पुढील काळात बाजारात येणाऱ्या नविन लाल कांद्याच प्रमाण कमी राहिल अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली असून शिल्लक उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 4000 हजार रुपये तर सरासरी 3500 रुपयांचा दर मिळत आहे. कांद्या बरोबरच जिल्हयातील बागलाण तालूक्यात अर्ली येथे जवळपास दिडशे हेक्टरवरील द्राक्ष खराब झाली आहे. आत्तार्यंत संपूर्ण बागलाण तालूक्यातील द्राक्ष उत्पादकांचे अंदाजे चारशे कोटीं पेक्षा जास्त नुकसान झाल्याच सांगण्यात येत आहे. सध्या काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असून, त्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा समजणार आहे. Rain Damage | परतीच्या पावसाचं पाणी कांद्याच्या शेतात, मनमाडमध्ये परतीच्या पावसाचा कांद्याला फटका | नाशिक | ABP Majha औरंगाबादमध्ये परतीच्या पावसाचा फटका गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. सतत झालेल्या पावसाने  सिल्लोड-सोयगाव कन्नड या भागातील अनेक पिकांना फटका बसला आहे. वैजापूर-गंगापूरमध्ये आताही हीच स्थिती आहे. यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं. सिल्लोड सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला असून खरिपाची सर्व पिके वाया गेली आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
रेल्वेचा वेग रात्री जास्त का असतो?
रेल्वेचा वेग रात्री जास्त का असतो?
Embed widget