एक्स्प्लोर

मराठवाडा, विदर्भ, नाशिकमध्ये परतीच्या पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

परतीच्या पावसामुळे, मराठवाड्यात सोयाबीन तर विदर्भात कापसाचं मोठं नुकसान झालं आहे. तर मनमाडमधल्या द्राक्षांच्या बागांना आणि रब्बीच्या पेरणीलाही मोठा फटका बसला आहे

मुंबई : राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दिवाळीच्या सणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आणि पहिल्यांदाच हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. पाऊस येणार नाही असं वाटून गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मराठवाड्यात परतीच्या पावसाचा पिकांना फटका गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान केलंय. यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नव्हता. तरीही मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड केली. हाताला आलेली पिकं काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली. बाजरीचे पीक काढणी काढून ठेवण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे बाजरीच्या देठाला पुन्हा अंकुर फुटलाय. कापसाचे ही तसेच बेहाल आहेत. उडीद भुईसपाट झाला. तीळ कधी गळून पडले कळलच नाही. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिकं डोळ्यादेखत उद्धवस्त होत असल्याचं शेतकऱ्यांना पाहावं लागलं. विदर्भात खरीप, रब्बी पिकांचं नुकसान परतीच्या पाऊसामुळे विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.  तर डाळींब, पपई, या फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाल. परतीच्या पावसाचा कहर, पिकांचं मोठं नुकसान | Beed | ABP Majha नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांद्याच नुकसान परतीच्या पावसाने नाशिक जिल्हयाला चांगलाच तडाखा दिल्याने कांदा आणि द्राक्ष पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नाशिक जिल्हयात द्राक्ष आणि कांद्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेत असतो. यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले त्यामुळे खरीपाच्या कांद्याची लागवड सुध्दा उशिरा सुरु झाली.चांगला पाऊस झाल्याने कांद्याच उत्पादन सुध्दा चांगले निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा तर खराब झालाच शिवाय ज्या शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकली होती ती सुध्दा सततच्या पाण्यामुळे सडून गेल्याने या पुढील काळात बाजारात येणाऱ्या नविन लाल कांद्याच प्रमाण कमी राहिल अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली असून शिल्लक उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 4000 हजार रुपये तर सरासरी 3500 रुपयांचा दर मिळत आहे. कांद्या बरोबरच जिल्हयातील बागलाण तालूक्यात अर्ली येथे जवळपास दिडशे हेक्टरवरील द्राक्ष खराब झाली आहे. आत्तार्यंत संपूर्ण बागलाण तालूक्यातील द्राक्ष उत्पादकांचे अंदाजे चारशे कोटीं पेक्षा जास्त नुकसान झाल्याच सांगण्यात येत आहे. सध्या काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असून, त्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा समजणार आहे. Rain Damage | परतीच्या पावसाचं पाणी कांद्याच्या शेतात, मनमाडमध्ये परतीच्या पावसाचा कांद्याला फटका | नाशिक | ABP Majha औरंगाबादमध्ये परतीच्या पावसाचा फटका गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. सतत झालेल्या पावसाने  सिल्लोड-सोयगाव कन्नड या भागातील अनेक पिकांना फटका बसला आहे. वैजापूर-गंगापूरमध्ये आताही हीच स्थिती आहे. यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं. सिल्लोड सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला असून खरिपाची सर्व पिके वाया गेली आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime Case: तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, आरोपींनी दोन्ही भावांना संपवलं; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप
तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, आरोपींनी दोन्ही भावांना संपवलं; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'
प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'
Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
NEET Exam Shivraj Motegaonkar: शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्हायरल
शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Laxman Hake on OBC Reservation: 'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
Embed widget