इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बँकेवर आरबीआय अर्थात रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कारवाई करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत इचलकरंजी मधील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली. अवसायानात प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखापर्यंतची रक्कम डीआयजीसीकडून मिळणार आहे.


दरम्यान, आरबीआयच्या या कारवाईमुळं राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचं अस्तित्वं नाहीसं झालं आहे. पुरेशा भांडवलाअभावी ही कारवाई करण्यात आली असून, शिवम सहकारी बँकेतील 37 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सदर प्रकरणात तब्बल 24 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक घोटाळा झाल्याची बाब उघड होत आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं आता यापुढं बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. असं असलं तरीही बँकेतील खातेदारांना मात्र काहीसा दिलासा आरबीआयकडून देण्यात आला आहे.


IN PICS | 4 वर्षांत 'भोवत्या' पक्ष्याचा 31 हजार 800 किलोमीटरचा प्रवास


बँकेकडे पुरेसं भांडवल नसल्यामुळं ती कार्यरत ठेवण्यामुळं खातेदारांनाच या साऱ्याचा फटका बसेल त्यामुळंच महाराष्ट्र रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटीव्हनं बँक बंद करण्याचे आदेश द्यावेत असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.