लातूर : पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने 40 जणांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे, तर इतर 20 जणांवर उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथील ही घटना आहे.


हौदातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावात पाण्याची सरकारी टाकी नाही. हौदातून गावाला पुरवण्यात आलेल्या पाण्याने अचानक अनेकांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरु झाला. तर काही जण चक्कर येऊन कोसळले.

या प्रकारानंतर 40 जणांना तातडीने अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.

या हौदात कुणीतरी सूडबुद्धीने थायमेट हे विषारी औषध मिसळले असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचा पोलिसांनाही संशय आहे.