शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादच्या अलूर गावात ही घटना घडली. या महिलेनं चहाड्या सांगितल्या आणि घरातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा राग मनात धरुन आरोपींनी तिची धिंड काढली.
सुदैवाने सरपंचांनी मध्यस्थी करुन महिलेची सुटका केली. या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मुरुम पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
संबंधित 55 वर्षीय महिलेला उमरग्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे