एक्स्प्लोर

Jayant Patil on Cabinet Expansion: 'मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने...', मंत्रीमंडळ विस्तारावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil on Cabinet Expansion: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे.

Jayant Patil on Cabinet Expansion:  राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडलं मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळ विस्तार केला नाही यावरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काल(बुधवारी) बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना आमच्या मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे असे बरेच आमदार मागे लागले असल्याचं म्हणत महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, 'परत मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार नाही, ही शेवटची संधी आहे असं काही आमदारांना वाटतं आहे. त्यामुळे आमच्या मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे असे बरेच आमदार मागे', लागल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

मंत्रीमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया


लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे, काळजी करु नका. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं काहीच नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन लवकरच याबाबत बातमी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा...,शिरसाट यांचं वक्तव्य


 राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल (Cabinet Expansion) एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य केलं आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.

विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर - जयंत पाटील

विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. पायथ्याला असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेथील लोकांची घरदारं फोडून, तिजोऱ्या लुटून त्यातील संपत्ती नेली. हे शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे हे मोठं फेल्युअर आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget