= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर पकडला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे काही नाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. विक्रमगड मधील तांबडी नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने गडदे-विक्रमगड मार्गावरील तांबडी पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी तयार केलेला रस्ता पुरात वाहून गेला .त्यामुळे येथे एक ट्रक अडकून पडला असून तो काढण्याचे काम सुरू आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कामवारी नदीची पातडीत वाढ झाली आहे. तर शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. कामवारी नदीची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या परिसरात प्रसाशनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील बोरघाटात धुक्याची चादर, दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बोरघाटाच्या डोंगर परिसरात पाऊस, धुक्याचे वातावरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे. सोबतच मुसळधार पाऊस ही बाब लक्षात घेत महापालिकेने 24 विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्ग जिल्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील चिंदर येथे घराचे छप्पर, मातीच्या भिंती कोसळल्या, ठिक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान नुकसान झालं. जिल्ह्यात आतापर्यंत 1440 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सर्वच भागात चांगला पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवलाय तर जिल्ह्या समोर कोरोनाचे संकट देखील आहे. सध्या जिल्ह्यात 144 लागू असतानाही काही लोक कायद्याचे उल्लंघन करून पर्यटनासाठी वाहत असलेले धबधबे, धरण, तलाव, झरे, समुद्र किनारे, नद्या, नाले या ठिकाणची वाट धरतात आणि धोका पत्करतात.अशाच घटनेतून आताच जव्हार मध्ये 5 बळी ही गेले याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी कडक धोरण अवलंबलं असून अशा पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कलम 144 नुसार कडक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे,,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचं पाहिला मिळालं. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपुर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलामुळे तलाव क्षेत्रात केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचं दोन दिवसांपुर्वी समोर आलं होतं. परंतू आता शुक्रवार रात्रीपासूनच तलाव क्षेत्रात देखील पावसाने आपलं खातं उघडलं आहे. आज मुंबईत साडे बाराच्या सुमारास समुद्रात हाय टाईड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनकडून सर्व 24 विभागांना अलर्ट जारी केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोस्टल रोडच्या कामामुळे पाणी साचू नये यासाठी महापालिकेकडून कोस्टल रोडसाठी विशेष 3 नियंत्रण कक्ष तयार, 'सागरी किनारा रस्ता' प्रकल्पाचे तीन 'नियंत्रण कक्ष' कार्यान्वित*
,प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरीजवळ नियंत्रण कक्ष,
मनपा मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या दूरध्वनीवरही करता येणार तक्रार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले असून या ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तळकोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावर्षी दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला आहे. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीने देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी त पडतो तसाच पाऊस दरवर्षी आंबोलीत पडतो. याहीवर्षी आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडला आहे. 1 जून पासून आतापर्यंत 70 इंच पाऊस आंबोलीत पडला आहे. म्हणजे साधारणपणे 1700 ते 1800 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस आंबोलीत पडला आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे धबधबे या आंबोलीच्या घाटात प्रवाहित झालेले पाहायला मिळतात. खरंतर आंबोली हा जैवविविधतेणे संपन्न असा प्रदेश आहे. आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे दाट धुकं असल्याने घाटात प्रवास करताना गाडीच्या लाईट इंडिकेटर लावून प्रवास करावा लागत आहे. समुद्र सपाटीपासून 2500 फूट उंच असलेलं आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ बंद असल्याने आंबोलीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पर्यटकांना खुनावणारा लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालाय. पण पर्यटनासाठी इथं बंदी असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. यंदा आज सकाळपर्यंत 649 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. सकाळपासून पावसाने आणखी जोर धरल्याने धरणाचे पाणी पायऱ्यांवरुन ओसंडून वाहू लागलंय. याच पायऱ्यांवर बसून पर्यटक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असतात. पण यंदा कोरोनामुळं या आनंदावर विरझन पडलेलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नदी, धरणं यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली दिसून येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण महिनाभरातच पूर्ण क्षमतेने भरलं असून यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून त्या अद्यापही सुरुच आहेत. धरणाची क्षमता 126.15 मीटर असून आजघडीला गडनदी धरणातील पाण्याची पातळी ही 120.55 मीटर इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात संगमेश्वरमध्ये 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात आता मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल मध्यरात्रीपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसतोय.त्यामुळं इथल्या नद्या दुथडी भरुन वाहताहेत. तर धरणं देखील ओव्हफ्लो झालीत. रत्नागिरी जवळची काजळी नदी देखील आता दुथडी भरून वाहत आहे. कोकणात 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार ठाणे, पालघर तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वर्धा : दोन दुर्दैवी घटनेत चौघांचा मृत्यू , नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू , एक घटनेत दोन महिला तर दुसऱ्या घटनेत 12 वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू, शुक्रवारी संध्याकाळी शेताचे कामे आटोपून कामावरून परत जात असताना घडली घटना, नाल्याला अचानक पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलबंडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते, अचानक बैल बंडी नाल्याच्या पुलावर फसल्याने दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहू गेल्याने मृत्यू, सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृतकाचे नाव, रात्री उशिरा आढळले मृतदेह, दुसऱ्या घटनेत सकाळी येरणगाव गोजी मार्गावरील नाल्यात गोजी शिवारात 12 वर्षीय मुलाचा आणि त्याचा आजोबाचा आढळला मृतदेह,
धोत्रा येथून सावली सासताबाद येथे जात असताना येरणगाव गोजी नाल्यात प्रवाह जास्त आल्याने आजोबा आणि नातू बैलगाडीसह वाहून गेले, सकाळच्या सुमारास बैलबंडीसह मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कालपासून जिल्ह्यात कोसळणार पाऊस हा सरींवर होता. पण, आता मात्र जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानं अंदाज वर्तवला असला तरी जोरदार पाऊस जिल्ह्यात कोसळत नव्हता. पण, आता मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी जवळपास साडेचार मीटर पर्यत लाटा उसळण्याची शक्यता आहे. ज्यावेळी मुसळधार पाऊस आणि त्याच वेळी भरतीची वेळ असेल तर अशा वेळी समुद्राला मिळणारे नाल्याचे तोंड बंद केले जाते आणि त्या ठिकाणी असलेले पाणी वर उचलून मग समुद्रात टाकले जाते. भरती येण्याआधी नाल्याचे तोंड बंद केले गेले नाही तर मग समुद्राचेच पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता ज्याठिकाणी पावसाचे पाणी भरते तिथे आता महापालिका प्रशासनाकडून कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच एनडीआरएफ, आपतकालीन विभाग यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड :
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला,
किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची हजेरी,
अलिबाग , मुरुड , श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यात पावसाचा जोर,
सखल भागात पाणी साचायला सुरुवात ,
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 60.98 मिलिमीटर पावसाची नोंद,
पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता,
नागरिकांना सतर्क राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुचना,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तळकोकणाला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने कामावर जाणाऱ्याचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने बळीराजा चिंतेत आहे.