एक्स्प्लोर
हिंदू धर्मापासून दूर गेलेल्यांची घरवापसी करा : मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा घरवापसीचा नारा दिला आहे. नागपूरमध्ये आयोजित धर्म संस्कृती महाकुंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शंकरचार्य, संत महतं उपस्थित होते. “या महाकुंभातून लोकांनी घरवापसीचा संदेश घ्यावा आणि जे लोक हिंदू धर्मापासून दूर गेले आहेत, त्यांची घरवापसी करावी”, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. स्वर्णिम भारताच्या निर्मितिसाठी जी संस्कृती लागेल, त्याचा शंखनाद करण्यासाठी हा कार्यक्रम असे आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. घरवापसी आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर याआधीही देशभरात वादंग माजला होता. त्यामुळे आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या घरवापसीच्या आवाहानानंतर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















