एक्स्प्लोर

फोन टॅपिंगच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव : आमदार शशिकांत शिंदे

धनंजय मुंडे प्रकरण त्यानंतर संजय राठोड प्रकरण आणि त्यानंतर आता अनिल देशमुख प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये केंद्रीय यंत्रणांनी फोन टॅप केले असून त्यामधून गोळा केलेली माहिती माध्यमांकडे पोहचवली जात आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोन टाईप होत आहेत हे फोन टॅप करून मंत्र्यांची माहिती गोळा करणे आणती माध्यमांना पुरवण्याचं काम भाजप करत आहे या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपच्यावतीने रचण्यात येत असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांना केला आहे. आमदार शशिकांत शिंदे आज एबीपी माझाशी बोलत होते.

 याबाबत अधिक माहिती देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर एक बाब सातत्याने समोर येत आहे ती म्हणजे माध्यमांपर्यंत राज्यातील मंत्र्यांची माहिती पोहोचवण्यात येते ही माहिती कोण पोहचवते याचा शोध घ्यायला हवा. मला दाट संशय आहे की भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे फोन टॅप करत आहेत आणि ही सर्व माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवत आहेत. या यंत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला हेच माहिती पोचवायची आणि राज्यातील सरकार पाडायचं अशा पद्धतीचा आढावा भाजपच्या वतीने रचण्यात येत आहे. धनंजय मुंडे प्रकरण त्यानंतर संजय राठोड प्रकरण आणि त्यानंतर आता अनिल देशमुख प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये केंद्रीय यंत्रणांनी फोन टॅप केले असून त्यामधून गोळा केलेली माहिती माध्यमांकडे जात आहे ही राज्य सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे आणि अशा पद्धतीने हे माहिती पोहोचवत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या बदली संदर्भात याचिका दाखल केली आहे यामध्ये त्यांनी रश्मी शुकला यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारमधील मंत्री पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत रश्मी शुक्ला यांनी एक अहवाल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. माझा सवाल परमबीर सिंग यांना आहे की, जर त्यांच्या काळात असा अहवाल समोर आला असेल तर त्यांनी त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. त्यांना कारवाई पासून कोणी रोखलं होतं. माझी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी तत्काळ आशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आशा अधिकाऱ्यांची तत्काळ संपत्ती किती आहे याची चौकशी करावी. यानिमित्ताने जनतेला देखील कळायला हवं की, हा अधिकारी किती स्वच्छ आहे ते. पदावरून दूर झाल्यानंतर आशा पद्दतीने आरोप करत राहणं यामध्ये काही तथ्य नाही.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget