एक्स्प्लोर

Maharashtra Rain Updates | चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा पिकांवर संमिश्र परिणाम

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावरासाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

Maharshtra Rain - Heavy to very heavy rainfall on Tuesday and Wednesday, IMD issues orange alert Maharashtra Rain Updates | चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा पिकांवर संमिश्र परिणाम

Background

मुंबई : राज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.

 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, "दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे."

 

खरंतर जून महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज (15 जुलै) आणि उद्या (16 जुलै) मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.





दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आजही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात, डहाणू 128 मिमी, कुलाबा 121.6 मिमी, सांताक्रुज‌ 96.6 मिमी, रत्नागिरी 101.3 मिमी, अलिबाग 122.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

काल सकाळी रिपरिप असलेला पाऊस दुपारी मुसळधार बरसला. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस होता. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं.

 

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यभरात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा


00:24 AM (IST)  •  16 Jul 2020

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या फक्त निम्माच पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाची मोठी प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना बहुप्रतीक्षित असलेला हा पाऊस गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसला पण या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झालाय तर काहींच्या शेतात पाणी साचलंय. पावसाने थोडी उघाड दिल्यास हे पाणी मुरण्यास मदत होईल आणि पिकाला याचा फायदा होईल. पण पावसाने पुन्हा संततधार लावली तर शेतात पाणी साचलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाने धान पिकाला चांगला फायदा झालाय. लावणीसाठी तयार केलेल्या धानाच्या बांद्यांमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर या पावसाचा संमिश्र परिणाम दिसून आला आहे.
23:55 PM (IST)  •  15 Jul 2020

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायाला मिळत आहेत. जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झालेली आहे. पुढील काही तासांत पावसाचा हा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे आता संबंधित यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, पावसाच्या जोडीला जोरच्या वारा देखील साथ देत आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget