Shashikant Warise Death Case : रत्नागिरीतीलपत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची कबुली सरकारने दिली आहे. विधान परिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरु असल्याची देखील माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली आहे.


काय आहे वारिसे मृत्यू प्रकरण?


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीने जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर कोण?


शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी आहे. सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी असलेला पंढरीनाथ आंबेरकर 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


पत्रकार शशिकांत वारिसे (Journalist Shashikant Warise) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत (SIT) होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदेश दिले होते. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे मृत्यूच्या पाच दिवसानंतर म्हणजे 11 फेब्रुवारी 2023 ला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Shashikant Warise : पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी; गृहमंत्री फडणवीसांचा निर्णय