एक्स्प्लोर

Maharashtra Rain Weather Updates: राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

Maharashtra Rain Weather Updates: पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र त्यानंतर पाऊसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली.

Maharashtra Rain Weather Updates: पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, अवघ्या 24 तासांत 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे. 

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळ आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचदरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र त्यानंतर पाऊसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. (Maharashtra Rain Weather Marathi News)

6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल- (Maharashtra Weather Updates)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे. 6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल. राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. 

राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद- (Satara Mahabaleshwar Rain News)

राज्यात सर्वदूर पाऊस आहे, मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे. आगामी तीन ते चार दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे आणि तशीच राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे, असंही एस.डी. सानप म्हणाले. 

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुण्याला उद्या रेड अलर्ट- (Palghar Thane Raigad Pune Rain Marathi News)

मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबईमध्ये दोन ते तीन दिवस पाऊस कोसळत राहणार आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई रायगड, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यात तसेच सातारा या भागात रेड अलर्ट असणार आहे. 

मुंबईसह उपनगरांना उद्या रेड अलर्ट- (Mumbai Rain Updates)

मुंबईत सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, ४ जुलैसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. हा इशारा 'Very Likely' म्हणजेच अत्यंत शक्य असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सखल भाग, समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget