Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : नागपूरमधील सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना...More
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
बैठकीसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित
सावरकर सभागृह दादर येथे होणार बैठकीला सुरुवात
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक
३० मार्च रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदान येथे पार पडणार आहे....
कालचे नागपूर प्रकरण आणि औरंगजेब कबर वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय टिपणी करतात याकडे ही लक्ष...
इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याने अवमान केला होता
त्यामुळे मी व्यथित होऊन फिर्याद दिली होती
आता पोलिसांनी बिळात लपलेल्या कोरटकरला शोधून काढलं पाहिजे
त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईल अशी आशा आहे
कोरटकरला तत्काळ अटक झाली असती तर फोनमधील अनेक गोष्टी कळाल्या असत्या
तो जर फरारी नसेल... थोडी जरी लाज शरम वाटत असेल तर त्याने पोलिसांसमोर यायला हवं
हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतं, त्यामुळे सरकार योग्य ती कारवाई करेल
नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मतदार नोंदणी क्रमांकसोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांसोबत सल्लामसलत होईल. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची माहिती आयोगाने दिली आहे. आधार कार्ड फक्त ओळख प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, त्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे.
वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेसचे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..
वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेसच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय, महाराष्ट्र शासनाचे वार्षिक बजेट 2023-24 मधून वाशिम - केकतउमरा- विळेगाव - कोकलगाव -बोरखडी या राज्य मार्गाचे काम मंजूर होऊन त्या रस्त् याचे काम कंत्राटदाराने सुरू केले व अर्धवट करून सोडून दिले 8 ते 9 महिन्यापासून या अर्धवट झालेल्या कामामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे.
वारंवार विनंती व आंदोलने करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने व कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले नाही. तसेच राजकीय दबावापोटी वाशिम तालुक्यातील विकास कामाचे टेंडर घेऊन सुद्धा बांधकाम विभाग हेतू पुरस्कर व आर्थिक व्यवहार व्हावा म्हणून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले नाहीत. असा आरोप करत या राज्य मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
अन्यथा 27 मार्च 2025 रोजी पासून कार्यकारी अभियंता यांच्या कॅबीने मध्ये साखळी आंदोलन करण्यात येईल.असा इशारा काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी यावेळी दिला.
वाशिम
रिसोडच्या मोठेगाव इथं विहीरिचा भाग खचून दोन मजूरांचा दबून मृत्यू.
रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील शेत शिवारात विहिरीच खोदकामा दरम्यान ब्लास्टिंग घेण्यासाठी विहिरीत मशीन द्वारे छिद्र घेण्याच काम सुरू असतांना..
विहिरीचा काही भाग खचुन मजुरांच्या अंगावर पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली..या घटनेत
47 वर्षीय उकंडी देवकर एकलासपूर आणि45 वर्षीय प्रकाश रावसाहेब देशमुख मोठेगाव यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांची विहीर परिसरात मोठी गर्दी उसळली होती.. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन दाखल झाले आहे..
Akola Flash :
समाजमाध्यमध्ये प्रकाश आंबेडकरांवर वादग्रस्त कमेंट करणे तरूणाला भोवले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तरूणाला चोपले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील घटना. वंचितच्या कार्यकर्त्यांनी काढली तरूणाची धिंड. तरूणाच्या वादग्रस्त कमेंटनंतर तेल्हारा शहरात काही काळ तणावाची परिस्थिती.
तेल्हारा शहरातील हरिओम नागोलकार नामक तरुणाने प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ऐनवेळी तेल्हारा पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात. यादरम्यान आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा पोलीस स्टेशन गाठलं, आणि तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असून सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे.. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणे, असा आवाहन अकोला पोलिसांनी केले.. सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
इटियाडोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्याने जिल्हा परिषद शाळेत शिरले पाणी... गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बरडटोली शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका ???
Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्याने बरडटोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये पाणी शिरला आहे.. सध्या रब्बी हंगामासाठी इटियाडोह धरणाचा पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आला आहे... बरडटोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळून वाहणाऱ्या कालव्याला गळती लागली असल्याने जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरले आहे.. परिणामी शाळेच्या भिंती जीर्ण होण्याची भीती व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे ?... या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला स्थानिक पालकांनी तक्रार करून देखील यावर कुठलाही मार्ग काढण्यात आला नसल्याने पालकांनी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन व इटियाडोह पाटबंधारे विभाग जबाबदार असेल व तात्काळ कालव्याची गळती बंद करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात असल्याचा इशारा देखील पालकांनी दिला आहे...
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर इथे विदेशी दारू आणि बियर ची मालेगाव येथून नवापूर कडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव धुळे महामार्गांवर सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता विदेशी दारू आणि बियरचा साठा मिळून आला पोलिसांनी वाहनासह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल 6 लाख 33 हजार 325 रुपये इतकी असून याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे...
गडचिरोली : अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. भावेश राजू कोरेटी (24 वर्ष) आणि मोरेश्वर नामदेव कोरेटी (24 वर्ष) असे आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी ही नवव्या वर्गात शिकते. ती दुपारी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली होती. तेथून घराकडे जाताना गावातील दोन युवकांनी मुलीचा हात धरून तिची छेड काढली. त्यानंतर तिला बाजुला नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी आरोपींना अटक करून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ
मी चूक केलीच नाही
माफी मागन्याची गरज नाही
चूक झाली तर माफी मागू
देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द औरंगजेब सारखीच
पक्ष फोडणे ,
मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफले का उचलू
लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची शिकवण पाळली पाहिजे
नागपूर मध्ये झालेल्या राड्याला घेऊन ज्या विश्व हिंदू परिषदेच्या कालच्या आंदोलनाला ट्रिगर पॉईंट मानला जात आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अमोल ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
औरंजेबाची प्रतीकात्मक कबर जळताना आम्ही आयता असलेली चादर जाळली नसल्याचे अमोल ठाकरे यांनी सांगितले.
पोलिसांचे रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही आहे त्यावरून वस्तुस्थिती पुढे येईल, मात्र तरी आमच्या अटकेची मागणी करत राडा केला गेला हे सुनियोजित कृत्य होते असेल अमोल ठाकरे यांनी सांगितले.
औरंजेबाची कबर महाराष्ट्रात नको हा विश्व हिंदू परिषदेची भूमिका कायम असल्याचे विश्व हिंदू परिषदेने स्पस्ट केले.
तर ज्या चिटणीसपार्क परिसरातील मस्जित मधून दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला ती मस्जित सील करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे .
विरार : मुंडक कापून धड गोणीत भरून, नाल्यात फेकलेला महिलेचा मृतदेह शोधण्यात मांडवी पोलिसांना आज यश आले आहे.
होळीच्या दिवशी या महिलेची सुटकेश मध्ये मुंडी ही विरार फाटा कडे जाणाऱ्या पिरकुंडा दर्ग्या जवळ मिळाली होती.
याबाबत मांडवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.
कौटुंबिक वादातून पती नेच पत्नीची राहत्या घरात गळा दाबून हत्या करून, तो मृतदेह विरार च्या देशमुख फार्म हाऊस जवळ आणून मुंडक कापून धड वेगळे केलं होतं. मुंडक नसलेला धड एका गोणीत भरून मोठ्या नाल्यात फेकून आरोपी पती फरार झाला होता.
होळीच्या दिवशी मुंडक मिळाल्या नंतर 24 तासात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली होती. आज सकाळी विरार पूर्व विरार नालासोपारा लिंक रोड जवळील देशमुख फार्म हाऊस जवळील नाल्यात मुंडक नसलेला मृतदेह सर्च ऑपरेशन राबवून शोधण्यात यश मिळविले आहे.
उद्धव ठाकरे
गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब
स्वराज्यावर चालून आला होता
महाराष्ट्र जिंकयला आला होता
महाराष्ट्र जिंकू शकला नाही
औरंगजेबाचा समर्थन कोणी शिवसैनिक करणार नाही
औरंगाजेबच कबर उखडण्यासाठी तुम्ही असमर्थ आहात का?. औरंगजेब तुमचा कोण लागतो
कबर विरोधात आंदोलन काय करता ? पंतप्रधान तुमच्या आहेत त्यांना सांगा...
नागपूरच्या कालच्या प्रचंड गदारोळात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांचा कालचा थरारक अनुभव एक्स्क्लुझिवली एबीपी माझासोबत शेअर केला आहे... पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या तोंडून आपल्याला काल रात्री कोणत्या भयावह परिस्थितीमध्ये पोलिसांनी फक्त परिस्थिती हाताळलीच नाही तर अवघ्या काही तासात नागपूर शांत करून दाखवलं याचा प्रत्यय आपल्याला येतोय...
१) नागपूरच्या झोन फाईव्ह चे उपायुक्त निकेतन कदम हे आपल्या पथकासह एका दगडफेकीतील संशयीताला शोधण्यासाठी एका अरुंद गल्लीत गेले असता, संशयीताचा एका घरात शोध घेत असताना कदम यांच्या चार ते पाच सहकाऱ्यांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने घेरले होते.. सर्वांच्या हातात लाठ्या काठ्या आणि काही धारदार शस्त्र होते.. आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी डोक्यावर एक हेल्मेट आणि हातात एक काठी घेऊन निकेतन कदम जमावाच्या दिशेने गेले.. आणि हातातल्या काठीच्या माध्यमातून बहुतांशी जमावाला त्यांनी नियंत्रितही केले.. मात्र जमावातील एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामध्ये निकेतन कदम यांचा हात गंभीररीत्या जखमी झाला.. नागपूर पोलीस एक टीम आहे आणि काल संकटाच्या वेळेला ती टीमच मैदानात उतरली होती.. त्यामुळे हे कुठल्याही अधिकाऱ्याचा शौर्य नाही, तर नागपूर पोलीस दलाची कर्तव्य परायणता असल्याचे निकेतन कदम म्हणाले.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून नागपूर पोलिसांना च्या कामगिरी संदर्भात समाधान व्यक्त करत पाठीवर शाबासकीची थाप दिल्याची माहिती ही कदम यांनी दिली... कालची परिस्थिती खूप भयावह होती.. चारही बाजूने दगडांचा वर्षाव होत होता.. लोखंडी आणि धारदार हत्यार वापरले जात होते आणि अशात संयम बाळगून संवेदनशीलतेने प्रसंग हाताळावे लागत होते.. आणि ते नागपूर पोलिसांनी करून दाखवले अशी भावनाही कदम यांनी व्यक्त केली....
२) आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या पायावर मोठा दगड लागल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.. सध्या तेही रुग्णालयात उपचार घेत असून काल कोणत्या दिशेने दगड येईल, तो शरीराच्या कोणत्या भागाला जखमी करेल याची कुठलीही शाश्वती नव्हती.. मात्र पोलीस म्हणून कर्तव्य बजवायचे होते म्हणून आम्ही वीस पावलं पुढे जात होतो पुन्हा दहा पावले मागे येत होतो हळूहळू करून आम्ही समोर गेलो आणि दंगल उसळलेल्या भागाला शांत केलं.. संशयीतांची धरपकड केली आणि त्यादरम्यानच जखमी झाल्याची भावना शशिकांत सातव यांनी एबीपी माझ्याशी बोलताना व्यक्त केली आहे...
ब्रेकिंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा
केंद्रीय मंत्र्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हजर राहणार
दुपारी ४ः३० पर्यंत मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार
दरम्यान, कुटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर लगेच परतणार असल्याची माहिती
महाराष्ट्राच्या सद्यस्थिती वर मा. खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
प्रिय जनतेला माझा सप्रेम संदेश...
देशात होळी, रंगोत्सव, रमजान, लोहडी तसेच विविध प्रांतात वसंतोत्सव विविध पद्धतीने साजरा होत आहे. सामान्य माणसाला या उत्सवांच्या दरम्यान अर्थार्जनाची चांगली संधी असते. मात्र राजकीय वातावरण दुषित करून सर्वच धर्मियांमध्ये एक असुरक्षितता निर्माण करण्याचे काम राजकीय मंडळी करत आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना या असुरक्षित वातावरणाची झळ पोहचत नाही. मात्र दररोज कमाई करून खाणारे अनेक लोक यामुळे भयाखाली जगतात. सणाच्या मांगल्यावर भयाचे सावट निर्माण होते ते वेगळेच.
बोर्डापासून ते स्पर्धा परिक्षापर्यंत हजारो पेपर लिक होताहेत. रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या शहरातून प्रचंड प्रमाणात स्थलांतर होताहे. शेतकरी कासावीस आहे. गेल्या पाच वर्षात सिंचनाची आकडेवारीच दिली जात नाहीये. बीडच्या घटनांमुळे, अक्षय शिंदे एन्काऊंटर सारख्या घटनांमुळे प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावर तर्क देण्याऐवजी आता औरंगजेबाची कबर उखडून काढण्याची टूम सुरू झाली आहे.
या शहरात परवाच ९०० मिमीची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा करता आला नव्हता. पर्यायी पाणी पुरवठा योजनाच अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. आता निवडणूक झाल्यामुळे नेत्यांना त्यावर बोलायची गरजही वाटत नाहीये. आता ५ वर्षे निवांत. लोकांच्या दैनंदिन जगण्यातील समस्यांत वाढच होत आहे. त्यावर एकही राजकारणी बोलत नाही. आदर्श पतसंस्था, मलकापूर बँक खातेदारांच्या समस्या यावर कोणी बोलणार आहे का? पर्यटन नगरी असलेल्या शहरात मुगल काळातील इतिहास उकरत बसल्याने काय साध्य होणार आहे? राष्ट्रीय माध्यमातून या पर्यटन शहराची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व धर्मिय जनतेचे नुकसान होणार आहे. हे मी एक मुस्लिम म्हणून सांगत नसून एक भारतीय म्हणून सुद्धा सांगू इच्छितो. अनेक उद्योग येथे येण्यास उत्सुक आहेत. मात्र या शहराला दंगलीचे शहर म्हणून प्रकाशझोतात आणले जात आहे. पाणी नाही म्हणून उद्योग नाहीत, आता त्यात या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत.
मला औरंगजेब या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमे करत आहेत. सर्वप्रथम या सर्व माध्यमांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मी मुसलमान लोकप्रतिनिधी आहे म्हणून जर तुम्ही मला बोलते करू इच्छित असाल तर तुमच्या पत्रकारितेत खोट आहे. मी भारतीय मुसलमान आहे हे नक्की. मात्र ते भारतीय असणे तुम्हाला एरवी आठवत नाही याच्या वेदना होतात. बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली. आता औरंगजेबाची कबर उध्वस्त करायच्या धमक्या काही धर्मांध संघटना देत आहेत. त्यावर सत्ताधारी मौन आहेत. इतकेच नव्हे तर शाहू, फुले व आंबेडकरांची परंपरा सांगणारेही मौन आहेत हे अधिक आश्चर्यकारक आहे.
मी व माझ्यासारखे अनेक हिंदू -मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई या शहरात लहानाचे मोठे झाले. या शहरात औरंगजेबाच्या जयंत्या-मयंत्यांना कधी उत्सव झालेले नाहीत याचे साक्षीदार येथिल हजारो नागरिक आहेत. पण जे मुळचे या शहराला कधी ओळखत नाहीत त्यांनाच औरंगजेबाची सर्वाधिक आठवण येते.
या देशात अनेक सुंदर इमारती, वारसास्थळे आहेत ते बौद्धांचे आहेत, मुगलकालिन आहेत, राजपुतांच्या आहेत, मराठ्यांच्या आहेत, अनेक सुरेख इमारती ब्रिटीशकालीन आहेत, यादव कालिन किल्ला औरंगाबाद जवळ आहे. या सगळ्याच वारसास्थळांचे जतन करण्याची तरतूद भारतीय घटनेत आहे. त्यामुळे कोणतीही हेरिटेज साईट उध्वस्त करण्याच्या धमक्या जेव्हा दिल्या जातात तेव्हा माध्यमांनी सर्वप्रथम इतिहास तज्ज्ञ , पुरातत्व विद्वान, वर्षोनुवर्षे उत्खनन करून इतिहासाची पाने लिहिणारे संशोधक यांना घेऊन टीव्ही चर्चा घडवून आणल्या पाहिजेत. या देशाच्या पत्रकारितेकडून याच किमान अपेक्षा आहेत. परंतू माध्यमे राजकीय नेत्यांना, त्यांच्या अर्धवट ज्ञानी प्रवक्त्यांना घेऊन सगळ्या चर्चा करत बसतात. माध्यमांनी त्यांच्या घटनाबाह्य वक्तव्यांना प्रसिद्धीच दिली नाही तर पत्रकारिता लोकांचे कल्याण करू शकते असे मला प्रामाणिकपणे वाटते.
मी स्वत: इतिहासाचा अभ्यासक नाही. मात्र या शहराचा लोकप्रतिनिधी राहिलो आहे त्यामुळे येथील वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून महसूल यावा असे मला वाटते. औरंगजेबावर मीच का बोलावे? काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्याच विरोधी पक्षांनी बोलले पाहिजे. इतिहासातील युद्धांचा संदर्भ देत वर्तमानात राजकारण होऊ नये याची खबरदारी राज्यघटनेत घेतलेली आहे. यावर हिंदू-मुस्लीम अशी चर्चा न होता मुगलकालिन सगळ्याच वास्तू पाडायच्या आहेत का? यावरच चर्चा एकदाची घडवून आणा. दररोज एक मुगलकालिन वास्तू घेऊन राजकारण करायचे ठरले तर पुढची दीडशे वर्ष एकेके वास्तू पाडण्यावर राजकारण होऊ शकते.
दुसरे उदाहरण देतो जेरुसलेमचे ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे महत्त्वाचे केंद्र असल्याने तिथेही सतत हिंसा, वाद सुरू असतात. त्याचा फायदा स्थानिक लोकांना होत नसून सो कॉल्ड विकसित देश त्यातून मतलब साध्य करून घेतात.
हा सगळा अभ्यास करून, आकलन करूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैविध्यासह सह अस्तित्व देणारी घटना अस्तित्वात आणली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर बांधली. आदिलशहाचा सेनापती अफजल खानाच्या कबरीवरून देखील भरपूर वाद झाले. संभाजी ब्रिगेडचा एक रिसर्च, दुसरा क्रमिक पुस्तकाताली उल्लेख आणि तिसरा या दोन्हींना नाकारणारा. वर्ष २०२२ मध्ये ही कबर सील करून वनखात्याने आता तिथे वनराई फुलवली आहे.
इतिहासात असे अनेक किस्से आहेत जे हिंदू मुस्लिम सौहार्द पण दाखवतात आणि वैर पण सिद्ध करतात. पण वर्तमान काळात यावर उपाय एकच वाटतो. सगळी वारसास्थळे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असली पाहिजेत. पर्यटक तिथे येतील, त्यांना गाईड करणारे गाईड्ज जो इतिहास आहे तो सांगतिल. यात राजकीय हस्तक्षेपापेक्षाही इतिहास अभ्यासकांची भूमिका असावी.
हिटलरच्या छळछावण्यांचा इतिहास पाश्चात्य देशांनी जतन केला व त्यातून नव्या पिढीने चांगला बोध घेतला.. इतिहास मिटवायचा नसतो तर त्यातून बोध घ्यायचा असतो. दुसऱ्या महायुद्धावर इतके चित्रपट तयार झाले की त्यांची संख्या फार मोठी आहे. पण त्यामुळे युरोपात दंगली झाल्या का? नाही झाल्या. उत्तम रिसर्च करून चित्रपट तयार झाले. लोकांनी ते पाहिले. त्यामुळे त्यांना अहिंसेचे महत्वच समजले. भारतातील उच्चशिक्षित नेत्यांना युरोपला जाऊन फोटो काढायला आवडते. पण युरोप इतका संपन्न का आहे ? याच्या मुळाशी जावे वाटत नाही.
इतिहासात उल्लेख आहे कि, सम्राट अशोकाने स्वत:च्या ९९ भावांना संपवून गादी मिळवली होती. नंतर तो बुद्धत्वाकडे गेला. तो बुद्धत्वाकडे गेला हा इतिहास महत्त्वाचा आहे की त्याने भावाला ठार केले हा इतिहास महत्त्वाचा आहे?
औरंगजेब कसा होता ? हे इतिहास तज्ज्ञांना ठरवू द्या. त्या काळात तो एक राजा होता हि वस्तुस्थिती आहे. त्याने प्रांत जिंकण्यासाठी हिंदू व मुस्लिम पातशाह्यांशी सुद्धा संघर्ष केले. निजाम, आदिलशहाशी तो लढला. केवळ तोच नाही तर प्रत्येक राजा हा सत्तेसाठी स्वत:च्या रक्ताच्या नातलगांशी लढला आहे. त्यात त्याचा धर्म कोणता हा प्रश्नच नाही. तो त्याकाळी राजा होता, तेव्हा लोकशाही नव्हतीच. पण आज लोकशाही आहे याचा विसर आपल्याला पडत आहे याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही.
आपला
इम्तियाज जलील
माजी खासदार
न्यू इंडिया बँक घोटाळ्यात भाजप नेता हैदर आझमचा भाऊ जावेद आझमला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळ्यातील आजम हा अटक झालेला सतवा आरोपी
व्यावसायिक उन्नथन अरुणाचलनच्या अटकेनंतर चौकशीत नाव समोर आल्यानंतर जावेद आझमला चौकशीला बोलवण्यात आलं होतं
चौकशीनंतर काल रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जावेदला अटक केली
जावेद आझमचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यासाठी उन्नथन अरुणाचलमने त्याला १८ कोटी दिल्याचा आरोप आहे
ब्रेक
महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरचा मद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार दिल्ली वारी
केंद्रीयमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाल्यानंतर शिंदे केंद्रीय नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता
महाराष्ट्रातील औरंगजेब कबर हटवण्याचा मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्यता
मुक्तगिरी येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला होतील रवाना
शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक...
ठाकरे गटाच्या नेत्याची दर आठवड्यातील आज बैठक
मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्याचा ठाणे दौरा झाला होता त्यानंतर आता पुढील जिल्ह्यातील दौऱ्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे...
संजय राऊत सुभाष देसाई चंद्रकांत खैरे राजन विचारे व इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत
अण्णा भाऊ साठे सभागृहात तीन दिवसांचा महोत्सव
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात तालवाद्यांची मैफल, जुगलबंदी, भक्तिसंगीतातील वाद्य वादन, तसेच पारंपरिक व पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होईल.
महिला वाद्य महोत्सव २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा येथे होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पनी अॅड. आशिष शेलार, मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची आहे. महिला वाद्य महोत्सव सर्वांसाठी निःशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विकास खरगे, मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग आणि श्री विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा
नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब
शासकिय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गोत्यात आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत
कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे
शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतून प्रमुख मागणी
शोभा बच्छाव, खासदार, काँग्रेस
किरीट सोमय्या येऊन गेले मालेगावात
त्यानंतर अचानक बांगलदेशी लोक शोधण्यासाठी म्हणून SIT स्थापन करण्यात आली आहे
जे प्रामाणिक आणि देशप्रेमी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये
अल्पसंख्याकांवर अत्याचार थांबले पाहिजे
ऑन नागपूर
राज्याचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत
गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले पाहिजे
गृहमंत्र्यांनी तिथे गेले पाहिजे
परिस्थिती नियंत्रणात ठेवली पाहिजे
पुणे -
- स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेचे एक वकील साहील डोंगरे यांच्यावर हल्ला
- काल संध्याकाळी हडपसर येथुन डोंगरे यांचे अपहरण करुन बोपदेव घाटात नेण्यात आले
- दिवे घाटात त्यांना मारहाण करुन सोडुन देण्यात आले
- मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जात दिली तक्रार
- हल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही
- ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससुन रुग्णालयात करण्यात येत आहेत उपचार
- दत्ता गोडेचे वकील वाजीद खान
यांचे डोंगरे सहायक वकील
ब्रेकिंग -
मुंबई गोवा महामार्गाच्या कामातला हलगर्जीपणा पुन्हा समोर.
चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे काम करताना रस्त्यावर लटकनारी जाळी मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ला अडकली.
वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. घटनेच्या वेळी ब्रीज वर तीन ते चार कर्मचारी करत होते काम.
ट्रक वेळीच थांबवल्यामुळे टळला अपघात.
ब्रीज दुर्घटने नंतरही महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनी कडून सुरक्षेचे तीन तेरा.
सविस्तर ब्रेक
गणेशमूर्ती विसर्जनाची धक्कादायक आकडेवारी माझाच्या हाती
मुंबईच्या गणेशोत्सवात समुद्रात दरवर्षी जात आहे हजारो टन वजनाचं प्लास्टर ऑफ पॅरीस
मुंबईत केवळ १० टक्केच शाडु मातीच्या गणेशमूर्ती तर ९० टक्के मूर्ती या पिओपीच्याच
गणेशोत्सवात शाडु माती की पिओपी या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशविसर्जनाचं किती पीओपी तयार होतो याच वास्तव समोर
मुंबईत दरवर्षी जवळपास १ लाख ८८ हजार ३०० पिओपी गणेशमूर्ती विसर्जीत होतात
त्यातील क्रुत्रीम तलावांमध्ये १८४६ टन वजनाच्या पिओपी मूर्ती विसर्जीत होतात
दरवर्षी गणेशोत्सवात साडे चार हजार टन प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तीरुपात विसर्जीत होतंय
GFX
मुंबईत होणा-या गणेशमूर्ती विसर्जनाची आकडेवारी
घरगुती गणेशमुर्ती
मुंबई शहरात एकदीड फुट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींसाठी ८ लाख ६५ हजार किलो पिओपी वापरलं जातंय
घरगुती गणेशमूर्तींची संख्या- १ लाख ७३ हजाराच्या घरात
घरगुती गौरी मूर्ती
गणेशासोबत विसर्जीत होणा-या गौरींच्या मूर्तीसाठी ३० हजार टन पिओपी वापरलं जातं
पिओपी गौरींच्या मूर्तींची संख्या ६ हजारांच्या घरात
सार्वजनिक गणेशमूर्ती
१५ फुट उंचीपर्यंतच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील मुर्तींसाठी तब्बल ३७लाख २० हजार टन इतकं पिओपी वापरलं जातं
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची संख्या जवळपास ९ हजार ३०० इतकी
मुंबईत दरवर्षी १ लाख ८८ हजार ३०० पिओपी मूर्ती विसर्जीत होतात.. या मूर्तींसाठी वापरलं जाणारं पिओपी चं वजन ४६ लाख १५ हजार इतकं आहे
यंदा कोर्टांने पर्यावरण च्या मुद्यावर न्यायालयाने पिओपीच्या मूर्त्यांवर बंदी घातली आहे, मुंबई महापालिकेकडून पत्रक ही काढण्यात आले आहे
मूर्तिकार संघटना या बंदी विरोधात एकवटलेल्या असताना पिओपी च्या मूर्त्यांची आकडेवारी समोर आली आहे
हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाचे पथक पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहे.... ज्या गाड्या जाळण्यात आल्या, ज्या वाहनांची तोडफोड झाली आणि ज्या खाजगी संपत्तीची नासधूस झाली त्या संदर्भातले पंचनामे या पथकाकडून केले जात आहे...हिंसाचार घडलेल्या वेगवेगळ्या भागांसाठी अशा पाच पथकांची निर्मिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून त्या अनुषंगाने एक पथक सध्या चिटणीस स्पार्क परिसरात पंचनामे करत आहे... नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय शासन करेल, मात्र आम्हाला पंचनामे करण्याचे निर्देश मिळाले आणि त्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे....
एकनाथ शिंदे
खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवली. विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथ जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकार मधे आम्ही सामील होऊ मात्र त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला.
त्यांचा डाव होता देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना जेल मधे टाकण्याचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले मात्र मी याना सोडल नाही. त्यामुळे माझ्या सोबत ६० लोक आले हिंदुत्वाच सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त २० लोक निवडून आणता आलं.
एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली
शेर का बच्चा है ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या
आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरे खाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर कुठे गेला मला माहिती आहे.
मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केलं नाही मी स्वतः अमित शाह आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितलं तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
जखमी पोलीस उप आयुक्त निकेत कदम यांच्याशी मुख्यमंत्री संवाद संवाद साधत प्रकुर्तीची विचारपूरस करतांना ... काल निकेत कदम यांच्यावर दंगलखोरांकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता.नागपूर येथील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी -
मुंबई गोवा महामार्गावरील लवेल येथे दोन कार मध्ये धडक.
धडकेत एक कार रस्त्यावर झाली पलटी,तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली.
सुदैवाने जीवित हानी नाही,मात्र दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान.
ओव्हरटेक करत असताना करताना झाला अपघात...अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केलं दवाखान्यात दाखल.
दिवेकरांचा रोष बघता बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या ठाणे महापालिकेने काढता पाय घ्यावा लागला
दिवेकरांनी रस्त्यावरती उतरत महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन केले.
Anchor: - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामाच्या विरोधात ठाणे महापालिकेने कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावरती उतरून महापालिकेचे विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले होते. मागे देखील अशाच प्रकारे आता पेट्रोल घेत आत्मदहनाच्या इशारा देखील दिला आहे देण्यात आला होता.या आंदोलन केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली नव्हती.. पुन्हा एकदा महापालिकेच्या कारवाईला सामोरे जात तिरडी आंदोलन आज करण्यात आले. दिवेकरांचा रोश बघता ठाणे महानगरपालिकेने काढता पाय घेतला आहे..दिव्यातील काही इमारती तोडक कारवाई देखील थांबली आहे.कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने बेकायदा बांधकामाचे विरोधात इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकर करत आहे. जोपर्यंत आम्हाला नाही मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंद पार्क मधील रहिवासी यांनी केलेला आहे.
Akola Flash :
अकोल्यातल्या तेल्हारा शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने तेल्हाऱ्यात काहीसा तणाव निर्माण झाला होता..
तेल्हारातील एका नागोलकार नामक तरुणाने प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.. त्यानंतर वंचितचे आणि आंबेडकरांच्या चाहत्यांनी तेल्हारा शहरात जमा होत पोस्ट करणाऱ्या तरुणाला घरातून बाहेर काढत चोप दिलाय.. तसेच तेल्हारा शहरात त्याची धिंड काढण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलाय.. ऐनवेळी तेल्हारा पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलंय.. जेणेकरून पुढील अनर्थ टळला आहे..
यादरम्यान आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा पोलीस स्टेशन गाठलं, आणि तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असून सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे.. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणे, असा आवाहन अकोला पोलिसांनी केले.. सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज धुळ्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने धुळे शहरातील जेल रोड परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले....
बिहार येथील महाबौधी बुद्धविहार मुक्तीसाठी संपूर्ण देशभरात जोरदार आंदोलन होत असून, केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे. महाबोधी महाबुद्ध विहार टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबौधी बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी धुळे वंचित आघाडी आणि बौध्द समाजाच्या वतीने करण्यात येत आहे....
नागपूरमधील हिंसाचारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं
मंत्री नितेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट
दरम्यान, स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी भेट झाल्याची देखील माहिती
खरा देवगड हापूस कसा ओळखायचा?
देवगड हापूस म्हणून अनेकांची फसवणूक होते मात्र ही फसवणूक रोखण्यासाठी आता टेक्नोलॉजीचा वापर केलाय. या टेक्नोलॉजीमुळे नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणं सोप होणार आहे. यासाठी प्रत्येक आमच्यावर TP seal UID कोड लावण्यात आलाय. त्यामाध्यमातून खरा देवगड ओळखत येणार आहे. GI नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार आहे.
TP Seal UID स्टिकर technology कशी काम करते?
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने GI नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID वितरित केले आहेत.
शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
• प्रत्येक स्टीकर दोन भागात विभागलेला एक स्वतंत्र युआयडी असतो. त्या कोड चा एक भाग स्टीकर च्या वरती आणि दूसरा भाग स्टीकर च्या खाली असतो.
• आपल्याकडील आंबा देवगड चाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी +91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे.
• ही सिस्टम (प्रणाली) त्या स्टीकर वरील कोड वाचते आणि स्टीकर च्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते. नंबर वाचण्यासाठी स्टीकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात.
• जर व्हॉट्सअॅप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील UID शी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, GI नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल.
या पडताळणी प्रक्रियेमुळे ‘देवगड हापूस’ बाबत ची विश्वसनीयता वाढेल.
गेल्या दोन वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे
सोन्याच्या या वाढत्या दराच्या मुळे ,गुंतवणूकदाराना बँकेच्या व्याज दराच्या पेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याने,अनेक ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवण्या पेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून,सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे
गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सह सोने व्यावसायिक यांच्या सोबत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे
पाहूया
गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात पंधरा हजार रुपयांची तर वर्ष भरात बावीस हजार रुपयांची वाढ सोन्याच्या दरात झाली आहे
जागतिक पातळीवर युद्ध जन्य परिस्थिती मुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूक दारानी,सोन्याच्या मधे गुंतवणूक केल्याने,सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे
गेल्या वर्षी जी एस टी सह 76000 हजार रुपये वर असलेली सोन्याची किमती आज 91000 हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत
अजूनही सोन्याचे दर वाढतच राहतील असा अंदाज असल्याने, जळगाव चे सुवरन नगरीत सोन्याचे दागिने खरेदी करण्या सोबत सोन्याचे नाणे खरेदी करून गुंतवणूक करण्या कडे ग्राहकांचा कल असल्याचं पाहायला मिळत आहे
Byte
सुवर्ण व्यावसायिक आणि ग्राहकांच्या सोबत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे
सोलापूर ब्रेकिंग
---
सोलापुरात आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि धरणे आंदोलन
बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
आरपीआयचे प्रदेशध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात बौद्ध समाजाचे आंदोलन
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने
हंसापुरी केस स्टडी 2
( आशा खोब्रागडे )
नागपूरच्या हंसापुरी भागात देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली. एकाच परिसरात 15 वाहनांची जाळपोळ करण्यात आली . यात आशा खोब्रागडे यांच्या एकट्यांच्या घरच्या 3 दुचाकी जाळण्यात आल्या. ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष केल्याचा आरोप आशा खोब्रागडे यांनी केला.
Crane Move
नागपूरच्या चिटणीस पार्क आणि अवतीभवतीच्या भागांमध्ये काल झालेल्या गदारोळाचा विकास कामांवरील अत्यंत विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.. कारण काल ज्या भागात तोडफोड, जाळपोळ, दगडफेक झाली होती, त्या भागातून नागपूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल जात आहे.. सध्या या उड्डाणपुलाचा निर्माण कार्य सुरू असून काल रात्री ज्या ठिकाणी जाळपोळ झाली, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणाऱ्या एनसीसी कंपनीच्या दोन क्रेन आणि जेसीबी जाळून टाकण्यात आल्या..
त्यानंतर कंत्राटदाराने दक्षता म्हणून सुरक्षेसाठी आपला सर्व साहित्य आणि मोठ्या मशिनरीज त्या ठिकाणातून उचलल्या आहे... घटनास्थळी क्रेन आणून मोठमोठे जनरेटर उचलून ट्रकवर लादून ते सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.. त्यामुळे येणारे काही दिवस तरी उड्डाणपूलचा बांधकाम स्थगित राहील अशीच शक्यता आहे.. त्यामुळे काही माथे फिरूंनी घातलेल्या धुळगुसामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे...
अमरावती
किरीट सोमय्या ऑन नागपूर दंगल
काही लोकांना औरंगाझेबला हिरो करायचे आहे... ही गोष्ट हिंदुस्थान आणी महाराष्ट्र सहनच करू शकत नाही...
सरकारी मंत्री असो किंवा सरकारी यंत्रणा असो त्यांनी सुद्धा थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे... कारण औरंगझेब हा एक नंबरचा क्रूर होता हा इतिहास आहे...
औरंगजेबच कोणी कौतुक करत असेल तर आम्ही सहन करू शकणार नाही पण, सरकारचे काही बंधन आहेत म्हणून त्या वास्तूचे रक्षण करावे लागत आहे...
किरीट सोमय्या ऑन संजय राऊत..
संजय राऊत आणी उद्धव ठाकरे यांच्या मनात औरंगजेब बद्दल सहानुभूती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक भक्ताची, मग तो मंत्री का असे ना, त्याची इच्छा आहे की औरंगजेबची कबर असता कामा नये...
सरकारच्या काही मर्यादा असतात..ती जी काही वास्तू आहे त्याचं न्यायालयच्या निर्णयाप्रमाणे जे काही व्हायचं ते होईल, पण तो पर्यंत सरकारने त्याची काळजी घ्यावी...
वेरूळ मध्ये मालोजी राजांची गढी आहे तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली.. यावेळेस शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली, जरांगे पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते...
जरांगे पॉइंटर्स
निवडणूक आल्या की वाद उकरतात समाजाने सावध राहणे गरजेचे आहे, हे सगळे कावे आहेत कबर इथं दंगल नागपूरला, पैसे हेच देतात सरकार यांचेच कबर काढा ही तुम्हीच... म्हणतात इथल्या मुसलमान लोकांना कबरीच्या प्रेम असणे गरजेचे नाही, ही दंगल सरकार, फडणवीस पुरसकृत आहे, याना तो कोरटकर सोलापूरकर दिसत नाही का...
तिथं हिंदुत्व जळते का, निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद करतात, बरं रक्षण ही तुम्ही करतात
बरं ते मूर्ख तर तुम्ही ही मूर्ख का इथं माझ्या मताला काय किंमत, सरकारचे लोक म्हणतात कबर हटाव, गोरगरिबांना अडचणीत आणतात हे बस
मराठा आरक्षण दिले नाही सरकार आश्वासन पूर्ण करत नाही...
मुस्लिम जनतेला आवाहन कबरीवर प्रेम करू नका
सरकार तुमचे आहे कबर काढायची तर काढू शकता फक्त, गोरगरिबांना जुंझवू नका
तेलंगणा ने 42 टक्के ओबीसी आरक्षण दिले पण महाराष्ट्रात करणार नाही फडणवीस करनार नाही लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याची काम करावे, दंगली नाही...
Akola Flash :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना बदलविण्यासाठी धनंजय मुंडेंचा आपल्यावर दबाव होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अकोल्यात मोठा गौप्यस्फोट. आपल्या पसंतीचे अधिकारी देऊन गुंडांना संरक्षण देण्याचा मनसुबा आपण यशस्वी होऊ दिला नाही. देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट. आपण धनंजय मुंडेंचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी आपली तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होतीय. आपण आपल्या मंत्री पदाच्या काळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला नाही. अनिल देशमुखांचा निर्वाळा. त्यावेळी नेमक्या कोणत्या पोलीस अधिक्षकांच्या बाबतीत मुंडेंनी बदलीसाठी आग्रह केला होता हे सांगणं देशमुखांनी टाळलंय. या काळात हर्ष पोद्दार आणि जी. श्रीधर होते बीडचे जिल्हा पोलीस अधिक्षक.
साऊंड बाईट : अनिल देशमुख, माजी गृहमंत्री.
पॉईंटर्स :
# गृहमंत्री असताना कधीही बीड जिल्ह्याचे वातावरण खराब होऊ दिले नाही, आणि कुणालाही अशा पद्धतीने गुडांना संरक्षण दिल नाही. : अनिल देशमुख.
# गृहमंत्री असताना बीड जिल्ह्याचे SP बदलण्यासाठी धनंजय मुंडे हे माझ्या खूप पाठीमागे लागले होते..
# त्यांचं ऐकलं नाही तर मुंडेंनी माझी तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली.. अनिल देशमुख यांचा गौप्यस्पोट.
# गुंडांना संरक्षण देण, पसंतीचे अधिकारी देणं, अशा पद्धतीने गृहमंत्री असताना कधीही वातावरण होऊ दिलं नाही.
नवी दिल्ली
उदयनराजे भोसले, खासदार , भाजप
छत्रपती शिवाजी महाराजाची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही
पण शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे काम मोदीजींनी केले
शिवाजी महाराजांचा शासनामान्य इतिहास प्रसिद्ध करावा
शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो
नागपूरात जे झालं ते समाज कंटकांनी केली
हे लोक जातीचे नसतात
ऑन प्रदीप पुरोहित, सुधांशू त्रिवेदी
यांना शासन झालं पाहिजे अस भूमिका आम्ही मांडलीच आहे
कायद्यात बदल करणे गरजेचे आहे
दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा व्हावी
उदयनराजे भोसले, खासदार , भाजप ऑन दंगल
काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या
नेहमी दंगली व्हवायच्या
त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले
संचारबंदी लागू केलेली असताना काल दगडफेक, जाळपोळ झालेल्या भागात जाणे योग्य नाही असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचे ठरवले आहे...*त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा ताण नाहक वाढेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे...( एबीपी माझाशी दूरध्वनीवर बोलताना बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे..)
पोलिसांची माहिती घेतल्यानंतर बावनकुळे आता जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहे...
रुई शिवारात अनोखा पदार्थ जमिनीबाहेर, शेतकऱ्यात भीतीचे वातावरण ; महावितरणचे दुर्लक्ष
AR: नांदेडच्या नायगांव तालुक्यातील रुई शिवारात एका शेतात जमिनीतुन कोळसा सदृश्य पदार्थ बाहेर येतोय. त्यामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 33 KV च्या उच्च दाबाच्या विजवाहिनीच्या खांबाला सपोर्ट करणाऱ्या जागेतून हा प्रकार झालाय. त्यामुळे स्थानिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलय. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान विद्युत घर्षणातून उन्हाळ्यात असा प्रकार होऊ शकतो असा आजवरचा अनुभव आहे. मात्र रुई या शिवारातील या घटनेची तपासणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
ब्रेकिंग..
सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलविले
सतीश भोसले उर्फ खोक्या याची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. शिरूर न्यायालयाने खोक्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तीन दिवस त्याचा मुक्काम शिरूर पोलीस ठाण्यात होता. परंतु सुरक्षेच्या काही कारणास्तव त्याला बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत आणण्यात आले आहे. 20 मार्च रोजी खोक्या भोसलेची कोठडी संपणार आहे. परंतु शिरूर पोलीस ठाण्यात येणारे अडथळे लक्षात घेता सुरक्षेचे कारण देत त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे.
बावनकुळे
घटना दुर्भाग्यपूर्ण.... मुख्यमंत्री मिनिट to मिनिट माहिती घेताय
34 पोलीस जखमी आहे... 5 नागरिक जखमी
50 ते 55 वाहने जाळले
सोशल मीडियातून वातावरण बिघडले...
शांततेचे आवाहन आम्ही सातत्याने करतोय
पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली...
हात जोडून विनंती आहे.. सर्वजण नागपूरचा संस्कृतीक इतिहास जोपसावा...
विरोधी पक्षाने पोलिटिकल पाहू नये....
सर्व पक्ष, संघटना यांना विनंती करावी की आपण सलोखा ठेवावे
ट्रिगर पॉईंट शोधू.. आता शांतता प्रस्थापित करणे
कॉल रेकॉर्ड, cdr काढावे लागेल...
शासन कडक कारवाई करेल
पोलीस ढाल होते.. सगळ्यात जखमी झाले.. पोलिसांनी ढाल बनले म्हणून दोन समाजमध्ये
5 Fir दाखल झालेय... 50 जण ताब्यात घेतले आहे
सोशल मीडियातून वातावरण बिघडल...
देवेंद्रजींनी माहिती मिळताच पाऊल उचलले... सरकारच फ्ले्युअर कसे म्हणता... पोलिसांनी जिवाची पर्वा न करता ढाल म्हणून उभे
पुढे येणारी शोभयात्रा
-- सर्व धर्माचे लोक समजदार आहे... भेदभाव नाही
नुकसान पंचनामा सुरु केलीय
मुंबई : नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे."
ॲड. आंबेडकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, "हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा."
ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
रवींद्र चव्हाण -
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक पक्षात येत आहेत.
आज अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सीताराम घनदाट यानी भाजप नेतृत्वावर विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षात त्यांच स्वागत आहे.
या लोकांच्या नक्कीच पक्षाला फायदा होईल, पक्षसंघटन वाढेल.
काही वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यानीही आज पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांचेही स्वागत.
छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवक भाजपच्या गळाला
भाजपकडून महाविकास आघाडीला संभाजीनगरात धक्का देण्याचा प्रयत्न
आज दुपारी १२ः३० वाजता संभाजीनगर येथील शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकासह काही महत्वाचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
- शिरूर कासार
- ब्रेक
- सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी.
- शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावल्या नंतर 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यात होता मुक्काम.
- सुरक्षेच्या कारणास्तव सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवल्याची माहिती.
- मध्ये रात्री बारा वाजता शिरूर कासार पोलीस ठाण्यातून बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी.
- 20 मार्च रोजी संपणार आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी.
सातारा:माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर, अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी केली रामराजेंवर टीका
सातारा:फलटण तालुक्यातील राजाळे येथे काही युवकांचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पाडला. यावेळी त्यांनी आमच्याकडे इन्कमिंग सुरू झाले असून सावध राहा असा इशारा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला होता. याला माजी सभापती रामराजे यांच्याच पक्षाचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी प्रतिउत्तर देत अजित पवार गटात कोणतेही प्रवेश झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.
बाईट: सचिन पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर रामराजेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत वैयक्तिक टीका टाळावी आपण किती उद्योग काढले? किती तरुणांना नोकऱ्या दिल्या? हे अगोदर तपासा. आम्ही आमच्या नेत्यावर केलेली कोणतीही टीका सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली.
बाईट: सचिन पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
अँकर : नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच नितेश राणेंसारख्या काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होतेय. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना खडसावलं पाहिजे असं ते म्हणालेय. गेल्या काही दिवसातील फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्री, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेय. नागपुरात सर्वात आधी शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहेय. त्यानंतर या विषयावर राजकारण करता येईल असं अनिल देशमुख म्हणालेय.
बाईट : अनिल देशमुख, माजी गृहमंत्री.
भिवंडी
नागपूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील अति संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भिवंडी शहराची संवेदनशीलता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी परिमंडळ दोनच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शहरातील अति संवेदनशील तसेच गर्दीच्या भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, गस्तीदेखील तीव्र करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
शहरात शांतता टिकावी यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या असून, कोणत्याही अप्रिय घटनेला थांबवण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ब
Anchor-: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर मध्ये हिंसाचार उफळल्यानंतर राज्यातील संवेदशील असलेल्या शहरांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज या शहराचा देखील संवेदनशील शहरात समावेश होतो. त्यामुळे आज सकाळपासून खबरदारी म्हणून मिरज शहरात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी लक्ष्मी मार्केट चौकात तैनात करण्यात आलेय. नागपूर मधील रात्रीच्या हिंसाचारानंतर सांगली मिरज या भागात देखील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क असून खबरदारी म्हणून ठिकाठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागपूरच्या 15 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी लावण्यात आली
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
नागपुरात दोन गटात दंगल !!
जे पेराल तेच उगवत!!
गाडला होता ना एवढे वर्ष त्याला. जमिनीत झोपला होता तो.काही फरक पडला होता??
ढोसून ढोसून उकरून बाहेर काढलंत त्याला. आता त्याचं भूत तुमच्या खांद्यावरती बसून खादाखदा हसेल आणि त्या भुताला ताकद, बळ कोण देतय तर ज्यांची शिवराय संभाजी आणि जिजाऊ यांची नाव मनात आणण्याची सुद्धा लायकी नाही असे राजकीय पुढारी!!
खरी खोटी बातमी पसरली की लगेच उतरले सगळे गट राडे करायला!!
इतके भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी औरंगजेब आजुबाजूला आहेत, त्यांचे पुतळे यांना कधी जाळावे असे वाटत नाही. त्यांना कबरीत गाडाव ,त्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्य लोकां विरुद्ध आंदोलन करावं असं वाटत नाही आणि निघाले so called धर्माभिमानाचा झेंडा खांद्यावर घेऊन.
अर्थात ह्यांनी भडकवल्यावर आपण भडकणारी मूर्ख जनता ही कारणीभूत आहोत त्याला !!
Exclusive
औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता औरंगजेबाने मंदिरे पाडून मसजीती बांधल्या,यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता,संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी त्याने मारले.अश्या क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमच समर्थन आहे असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.
नागपूर येथे झालेल्या दंगली बाबत देखील रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे...
सध्या अराजकता पसरवली जात आहे याच कारण मुस्लिम धर्मियातले काही धर्म गुरू हे लहान पानापासून मुलांना भलकवण्याच काम करतात असेही विधान महंत रामगिरी महाराजांनी केले आहे....
Chk BJP office output
गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश.
२००४ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले होते.
२००९ साली विधानसभा निवडणूक ८२ हजार मतांनी निवडून आले होते
सिताराम घनदाट हे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत.
ब्रेकिंग
नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे पोलीस आयुक्त कार्यलयात पोहचले
वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकार्त्यांसोबत बैठक सुरु
महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुण मुलगी घराबाहेर असेल आणि घराच्या प्रवेश दारावर दंगल उसळली असेल, तर तिच्या आईवर काय परिस्थिती उद्भववेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही... अशीच परीस्थिती स्वाती दहीकर यांच्यावर ओढवली होती... त्यांची मुलगी आस्था कॉलेजमधून परत येत असताना स्वाती यांच्या वस्तीत मोठी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुरू झाली अशा अवस्थेत मुलीला अनेक फोन करून लवकर घरी बोलावलं. मुलगी घराच्या आत शिरताच घरावर मोठ्या प्रमाणावर दगडांचा वर्षाव झाला...कालची परिस्थिती सांगताना स्वाती यांचे अश्रू अनावर झाले..
तर मुलगी आस्थाही कशा भयावह परिस्थितीत घरापर्यंत पोहोचली याचा कथन तिने एबीपी माझाशी बोलताना केलाय.. अगदी रस्त्यात जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना कसतरी घरी पोहोचल्याच तिनं सांगितलं...
घरी ब्रेन स्ट्रोक झालेले आजोबा आतल्या खोलीत असताना बाहेर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही दहीकर कुटुंबाने बाहेर काय सुरू आहे हे सांगितलं नव्हतं अजूनही त्यांना काल वस्तीत काय घडलं हे सांगितलं नाही त्यांच्यासमोर जाताना चेहऱ्यावर हास्य घेऊनच जावं लागत आहे अशा परिस्थितीत हे कुटुंब जगतय...
राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही - हायकोर्ट
एमएमआरडीए आणि राज्य सरकारला मोठा दिलासा
एका पत्रकारानं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली
सरकार आणि मेघा इंजिनिअरिंग या कंपनीनं याचिकेच्या वैधतेवरच सवाल उपस्थित करत याचिका फेटाळण्याची केली होती मागणी
मेघा इंजिनिअरींग या खासगी कंपनीकडून एमएमआरडीएला 16 हजार 600 कोटींची बँक गँरंटी
युरोपातील सेंट लुशिया स्थित 'युरो एक्झिम बँक' या आरबीआयकडून मान्यता प्राप्त नसलेल्या परदेशी बँकेकडून दिलेली बँक गँरंटी कायदेशीर कशी?, याचिकेत उपस्थित केला गेला होता सवाल
मेघा इंजिनिअरिंग कंपीनचं नाव इलेक्टोरल बाँड घोटाळ्यात सर्वाधिक निधी देणारी दुस-या क्रमांकाची कंपनी, त्यामुळे यात राजकारण्यांचे लागेबांधे असल्याचाही केला गेला होता याचिकेतून आरोप
नागपूरच्या घटनेनंतर खुलताबादत औरंगजेबाच्या कबरीजवळ अतिरिक्त ची सुरक्षा व्यवस्था. आत मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची फिजिकली आणि मेटल डिटेक्टर द्वारे चेकिंग केली जाते आहे. खुलताबाद आणि परिसरामध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आत मध्ये आणि बाहेर दोनही ठिकाणी आज कशी सुरक्षा व्यवस्था आहे.
बुलढाणा
रविकांत तुपकर बाईट्स
अगदी इंग्रजांप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांना रातोरात घरातून उचलून अटक केली आहे बुलढाणा पोलीस हे इंग्रजांपेक्षाही जास्त दादागिरी करत आहे.
मी मुंबईत पोहचलो असून मी भूमिगत आहे
सत्याग्रह करणे हा आमचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सोयाबीन कापसाला भाव ही आमची मागणी आहे.
उद्या आमचं मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणारच... सरकारने कितीही दडपशाही केली तरी आम्ही आंदोलन करणारच.
पांढरपेशी गुंड मोकाट फिरतात त्यांना अटक करायला पोलिसांना वेळ नाही मात्र शेतकऱ्यांसाठी न्याय मागणाऱ्या नेत्याला अटक करण्यासाठी हे तत्परता दाखवतात.
घटनाक्रम
काल 1 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी काल दुपारी बारा वाजता महालच्या शिवाजी चौकात आंदोलनाला एकत्र आले
काल 1:30 वाजता - आंदोलनादरम्यान चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली.औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.
औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.
दुपारी 3 वाजता : दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदविला
दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी परिस्थिती शांत केली
दुपारी 4 वाजता : विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात एकत्र यायला सुरवात झाली
सायंकाळी 5 वाजता : औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र समाजमाध्यमांवर वायरल झाले.
रात्री सात वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून व मुस्लिम गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकमेकांच्या विरोधात नारेबाजी सुरु झाली
सायंकाळी 7 वाजता पोलीसांनी अधिकची कुमक मागवून घेतली
रात्री साडेसात वाजता पोलिसांनी दोन्ही गटाला आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.
रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.
– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.
– दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.
– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली
रात्री - 9 वाजता एका गटाकडून भालदारपुरा व चिटणवीस पार्क परिसरात भागात जेसीबी व वाहनांची जाळपोळ सुरु झाली. काही स्थानिकांच्या घरांवर हल्ले झाले
दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलीस देखील रस्त्यावर उतरली
रात्री 10:30 नंतर पोलीसांनी दंगलखोरांनी धरपकड सुरु केली
रात्री 12 वाजता हंसापुरी व गीतांजली थेटर परिसरात काही वाहनांची तोडफोड करत स्थानिकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले
रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत 46 आरोपींना ताब्यात घेत गणेशपेठ पोलिसठाण्यात आण्यात आले.
प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्यात आली
नवी दिल्ली -
खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस बाईट -
महाराष्ट्र आणि नागपूरच्या जनतेला आवाहन करते की शांतता राखा
घटना ऐकली तेंव्हा मनाला वेदना झाल्या
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे
महाराज हे रयतेचे राजे होते
जाती धर्मात सौख्य राहील पाहिजे
शिवजी महाराज यांचं नाव घेत असताना काही लोक जाती जातीत तेढ निर्माण करत आहेत
काही मंडळी जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचं काम करत आहेत
त्यांच्या विभागवार ते काही बोलत नाही मात्र यावर अशी विधान करत आहेत
सगळ्या मंडळींना आवाहन आहे की द्वेषाचं राजकारण कडे तुम्ही लक्ष देवू नका
मुख्यमंत्री यांना आवाहन करायचं आहे की राज्यात काय सुरू आहे ?
नितेश राणे यांना प्रश्न आहे की त्यांना आज महाराष्ट्राबद्दल काय वाटतं ? त्यांना महाराष्ट्र जळयाचा आहे का ?
सगळ्या माणसांना आपला आपला धर्म काय आहे ते माहीत आहे
राज्याच्या मूलभूत प्रश्नावर हे लोक बोलत नाही
राज्याचं पुरोगामित्व आज धोक्यात आल आहे
राजकारण आणि धर्मकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत
बजेट, शेतकरी यांच्यावर हे काहीच बोलत नाहीत
या द्वेषाच्या राजकारणातून काय सिद्ध करणार आहात ?
सरकारने थडग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी
नितेश राणे यांना कोणी का थांबवलं नाही
राज्यात हे कोणी सुरू केलं आहे ?
मुख्यमंत्र्यांच नागपूर जळत आहे हे किती दुर्देवी आहेत... याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल
कोण बोलतंय याच आत्मचिंतन केलं पाहिजे
म्हस्के यांनी कधीतरी मुंबईच्या प्रश्नावर पोटतिडकिने बोलावं ना
खोटा इतिहास सांगायचं काम सुरू आहे
या मंडळींना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे
ऑन प्रदीप पुरोहित विधान -
हे हास्यास्पद वाक्य आहे
काय चालल आहे ?
शिवाजी महाराज यांच्याशी बरोबरी करता ?
तुम्हाला महाराज समजले आहेत का
तुम्ही गोविंद पानसरे यांचं पुस्तक वाचाव
वाशिमच्या मालेगाव ते मेडशी या जुन्या मार्गावर मेडशी जवळ असलेल्या मोठ्या जुन्या पुलाखाली आज सकाळी बिबट्याची 2 पिल्ल खेळताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील सरपंचांला सकाळी बिबट्याच्या पिल्लाचं दर्शन झाल्याने त्यांनी आपल्या मोबाईल केमेऱ्यात हे दृश्य टिपलं आणि या बद्दलची माहिती वनविभागाला दिली. वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याची दोन पिल्लं आढळल्याने वन विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होतय ..वनविभागाला या परिसरात मादी बिबट्या आहे..याची माहिती नव्हती का असा प्रश्न? झालाय परिसरात मादी बिबट्या बिनधास्त वावर असतांना नेमकं वनविभाग करतय काय..आणि वर्दळीच्या ठिकाणी या वन्य जीव प्राण्यांच्या जीव घोक्यात असताना वन कर्मचारी कुठे असा प्रश्न निर्माण होतय...
Breaking news
नागपूर मधील दंगलीचा नाशिकच्या रंगपंचमी ला फटका बसण्याची शक्यता
जुने नाशिकमधील शिवाजी चौकात 60 वर्षानी खुली करण्यात आलेली रहाड बुजविण्याचे पोलिसांचे फर्मान
नागपूर मधील वातावरण चिघळल्यानं रात्री उशिरा पोलिसांनी रहाड बंद करण्याचे सूचना केल्याची स्थानिकांची माहिती
हिंदू मुस्लिम अशी मिश्र वस्ती असल्यानं रंगपंचमी सणाला गालबोट लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा खबरदारीचा उपाय
पोलिसाच्या आदेशाला स्थानिक नागरिकांचा विरोध
पोलिसांच्या आदेशानंतर ही रहाडीची पूजा केली जाणार जाणार पूजाविधीच्या तयारीला सुरवात
*स्थानिक नागरिक पोलीस आयुक्तांची घेणार भेट, रहाड उत्सवाला पोलीस परवानगी देणार का याकडे लक्ष
-
शिवाजी चौकातील रंगपंचमी वादाची नाही तर एकोप्याची असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा
-
हिंदू बरोबर मुस्लिम बांधव ही रंगपंचमीच्या तयारीला लागले असून पोलिसांनी रंगपंचमी वर बंदी घालू नये अशी मागणी
नाशिकमधे पेशवेकालीन रहाडी मध्ये रंगपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा
जुने नाशिक परिसरात सहा ते सात रहाडी मध्ये रंगोत्सव साजरा केला जातो
पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी
पुजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली जिल्हा न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयाने फेटाळला
खेडकर सर्वोच्च न्यायालयात अपिलात
सर्वोच न्यायालयाच्या सात क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी
नंदुरबार फ्लॅश:-
नंदुरबार:-जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत...
वाढत्या तापमानाचा फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका....
केळी आणि पपई चे फळ खराब होण्याची शक्यता....
तापमानात अजून वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज....
वाढत्या उष्णतेपासून फळबागांच्या संरक्षणासाठी गोणपाट आणि इतर आच्छादनांचा वापर......
पपईच्या फळांची उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फळांवर गोणपाट आणि इतर अच्छदनाचा वापर....
एप्रिल आणि मे मध्ये अजून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
Nanded:गॅसचा स्फोट होऊन ओमनी कारसह घर जळून खाक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय.. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील वण्णाळी गावात ही घटना घडलीय, घरासमोर पार्क केलेल्या ओमनी कार गाडीतील सीएनजी गॅस चा स्फोट होऊन ओमनी कार जळून खाक झाली, तर या आगीच्या लाटांमुळे घरालाही आग लागली आगीत ओमनीसह संपूर्ण घर जळून खाक झाले आहे, घरमालकाचे यात लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.. रात्री उशिरा अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे..
नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल शिवाजी चौक, हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली. या परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या आहे. महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेवर येऊन उघडली आहे. आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहेत. आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केली आहे.
अहिल्यानगर मधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. नगर मनमाड रोड वरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत.
नागपुरातील घटनेवरती खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडिया पोस्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. "नागपूर शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. नागरीकांना आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. परस्पर सामंजस्य आणि सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. हा महाराष्ट्र प्रागतिक विचारांचा आहे. आपल्या राज्याची ही ओळख कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया", असंही त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव सुरू असतानाच देसाईगंज वनपरिक्षेत्रातील डोंगरमेंढा, कळमगाव रिठी, पिंपळगाव, विहीरगावच्या शेतशिवारात रानगव्यांचा हैदोस सुरू आहे. जंगलालगतची उन्हाळी धानपिके, मका, तुळ आणि अन्य पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे परीसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. मागील चार वर्षांपासून देसाईगंज वनपरिक्षेत्रात रानगव्यांच्या कळपाचा वावर आहे. यात 10 ते 12 रानगव्यांचा समावेश असून शेत पिकांची मोठी नासाडी करीत आहेत. रानगव्यांना हुसकावून लावण्यासाठी काही शेतकरी रात्रीची जागल समूह-समूहाने करीत आहेत.
नागपूर कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. आरसीपी, एसआरपीएफ, होमगार्ड यांच्यासह शहर पोलिसांचे शहरात फिक्स पॉईंट लावले. सोशल मीडियावर विशेष लक्ष, काही आक्षेपार्ह आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या. Whatsapp वर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज होणार पहिली सूनावणी होणार असून आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोकाटे यांना मिळालेल्या स्थगिती आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे-राठोड यांनी दाखल याचिका केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात आज बीड न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. हा खटला केज न्यायालयात चालवायचा की बीड न्यायालयात यावर आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात होईल. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना तारखेला केज कोर्टामध्ये हजर करताना होणाऱ्या अडचणी त्यामुळे सीआयडीने हा खटला बीडमध्ये चालवावा असा विनंती अर्ज केला होता. त्या विनंती अर्जावर आज सुनावणी होणार आहे. खटला केज मध्ये चालवला जातो की बीडमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल.
शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधान परिषदेत याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज्यात निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृतीमुळे लाखो हेक्टर वरील जमिन खरडल्या गेली होती. कापुस, सोयाबीनसह तूर हे तिन्ही खरीप पिके हातुन गेली होती. तत्कालीन कृषी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री आदींनी नुकसानीची पाहणी करून पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. २५% अग्रीम रक्कम बाबत ऑक्टोबर मध्ये अधिसूचना ही काढण्यात आली होती. परंतु ६ महिन्यानंतरही ना अग्रीम मिळाली, ना पुर्ण पीक विमा. पिक विम्यातील राज्य सरकारचा हफ्ता च थकलाय. त्यामुळे परभणी सह राज्यातील लाखो शेतकरी पिक विम्या पासुन वंचित आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय मार्गी लागेल अशी अशा शेतकऱ्यांना होती याबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकरी हा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत.
बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात सहा आरोपी अटकेत असून इतर चार जण अद्याप फरार आहे. आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे प्रेम संबंधाच्या संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर याने विकास बनसोडे या तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह दहा जणांविरोधात खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार
बावनकुळे हे सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देणार
नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे करणार पाहणी
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना
नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत. बावनकुळे हे सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देणार आहेत. नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत.
अकोला रेल्वे स्थानकावर मंगळसुत्र चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हेमंत गावंडेंचा उपचारादरम्यान मृत्यू. अकोल्यातील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास. रविवारच्या रात्री अकोला रेल्वे स्थानकावर झाली होती घटना. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं महिलेच्या नवऱ्याला चांगलचं महागात पडलं होत.. मंगळसूत्र चोरट्याने पाठलाग करणाऱ्या महिलेच्या पतीला बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा ठेचून काढला होताय. अखेर पोलिसांनी मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातून रात्री उशिरा अटक केली आहे. अवघ्या 24 तासात या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.
शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल
संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून आत्महत्या केली
या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधान परिषदेत याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
नंदुरबार:- सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तीव्र पाणीटंचाई...
आदिवासी पाड्यावरील महिलांची पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट
धडगाव तालुक्यातील दुर्गम सेजला आणि इतर भागातील गावांमधील परिस्थिती
नागरिकांना पिण्यासाठी झऱ्याचे अशुद्ध पाणी
सरकारची हर घर जल हर घर नल योजना अजून पोहोचलीच नाही
जिल्हा प्रशासनाचा टंचाई आराखडा फक्त कागदावरच
विधान भवनात पुणे स्वारगेट ST डेपोमधील बलात्कार पीडित महिलेची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांनी घेतली.
पिडीत महिलेच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली… यावेळी पिडीत महिलेने तीची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांच्याकडे मांडली.
आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी पिडीत महिलेने केली.
धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच शिक्षकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. यावर मार्ग शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने पुढाकार घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा अभियान राबविण्यात येत आहे. आज पासून या अभियानाला सुरूवात झाली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आलं. यासोबतच शिक्षक घरोघर जाऊन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण देखील करणार आहेत. सहा ते 14 वर्षांमधील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक १९ मार्च रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नरिमन पॉईंट मुंबई येथे समुद्रात कापूस आणि सोयाबीन फेकून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेत सरकारला जाब विचारणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होणार होते . मात्र तत्पूर्वीच रात्री क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती आहे. तर बुलढाण्यातही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर हे भूमिगत झाले असून कुठल्याही परिस्थितीत उद्या आंदोलन होणारच अशी भूमिका ही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे.
ट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली
त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीर सह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रणवीरच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा सहभागाची पडताळणी सुरू आहे.
गँगस्टर छोटा राजन हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ड्रायव्हरची साल 2011 मध्ये झाली होती हत्या
या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं पुराव्यांअभावी राजनची निर्दोष मुक्तता केलीय
17 मे 2011 रोजी दक्षिण मुंबईत आरिफ अबुनाकर सय्यद नावाच्या व्यक्तीवर दोन आरोपींनी गोळीबार केला होता
आरिफ सय्यद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर होता
या प्रकरणात छोटा राजनला हत्येच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता
छोटा राजन हा सध्या तिहार तुरुंगात असून त्याच्याविरोधातील सारे खटले मुंबईच्या सीबीआय कोर्टात सुरू आहेत
पत्रकार जेडे हत्या प्रकरणात राजनला जन्मठेप झाल्यानं त्याचा मुक्काम कारागृहातच राहिल
नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर