Manoj Jarange patil: निवडणुका आल्या की वाद उलरून काढला जातो, त्यामुळे समाजाने सावध राहणे गरजेचे आहे. हे सगळे कावे आहेत. कबर इथं दंगल नागपूरला? यांचेच सरकार असून हेच कंबरीसाठी पैसे देतात, मग कबर ही तुम्हीच काढा ना. इथल्या मुसलमान लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही, ही दंगल सरकार, फडणवीस पुरस्कृत आहे. यांना तो कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? तिथं हिंदुत्व जागत  का नाही? असा सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी सरकारवर टीका केली आहे. नागपूरच्या महाल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur riots) पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 


दरम्यान, वेरूळमध्ये मालोजी राजांची गढी आहे, तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस  शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला जरांगे पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी नागपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केलं आहे.


कबर काढायची तर काढा, फक्त गोरगरीबांना झुंजवू नका- मनोज जरांगे पाटील     


निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद करतात, बरं रक्षण ही तुम्हीच करता. ते मूर्ख तर तुम्ही ही मूर्ख का? इथं माझ्या मताला काय किंमत? सरकारचे लोक म्हणतात कबर हटाव. मात्र यामुळे गोरगरिबांना हे अडचणीत आणतात. मराठा आरक्षण दिले नाही. सरकार आश्वासन दिलं ते पूर्ण करत नाही. किंबहुना मुस्लिम जनतेला माझं आवाहन आहे कि कबरीवर प्रेम करू नका. सरकार तुमचे आहे कबर काढायची तर काढू शकता फक्त, गोरगरिबांना जुंझवू नका. असेही जरांगे पाटील म्हणाले. तेलंगणा ने 42 टक्के ओबीसी आरक्षण दिले पण महाराष्ट्रात हे करणार नाही. फडणवीस असे करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याची काम करावे, दंगली नाही. असे आवाहन ही त्यांनी केले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या