Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2023 11:14 PM
Latur News: लातूर: पेठच्या तावरजा नदीच्या पुलावर विचित्र अपघात; एक कार पुलावरून कोरड्या नदीत कोसळली

Latur News:  लातूर ते औसा रोडवरील पेठ गावाच्याजवळ असलेल्या तावरजा नदीच्या पुलावर आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला असून भरधाव वेगात असलेली एमएच २४ एयू ७३०४ या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार आणि एमएच २४ एस १७५२ क्रमांकाची मोटारसायकलची आणि दुसर्‍या एका कारची धडक झाली. पहिली कार आणि मोटारसायकल ही दोन्ही वाहने पुलावरून थेट कोरड्या नदीत कोसळली.

Palghar News: पालघर: मोखाडा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने सातूर्ली गावातील तीन घरांचे मोठे नुकसान, दोन जखमी

Palghar News:  मोखाडा तालुक्यात संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने सातूर्ली गावातील तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सातूर्ली मधील वामन पाटील यांच्या घराचे पूर्ण छप्पर उडाले असून इतर दोन घरांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये शकुंतलाबाई पाटील आणि वामन पाटील या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Dhule News: धुळे: विद्याभवन महिला वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; देवपूर भागातील घटनेने खळबळ

Dhule News: धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विद्या भवन लेडीज हॉस्टेल येथे राहणाऱ्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील एलएलबी च्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Weather Forecast : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पावसाबद्दल स्कायमेटचा दावा फेटाळला

Weather Forecast :  स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेचा दावा भारत सरकारने फेटाळला आहे. काल स्कायमेट हवामानाने असा दावा केला होता की , भारतात या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जो आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पूर्णपणे नाकारला आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे...? याबाबत भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज आला आहे. हा अंदाज स्कायमेट या संस्थेच्या अंदाजाच्या विरुद्ध आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात सामान्य पाऊस पडेल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की ,यावर्षी दक्षिण भारत, पूर्व मध्य भारत, पूर्व भारत, ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागात सामान्य पाऊस पडेल. तथापि, मंत्रालयाचे म्हणणे आहे की ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. यासह पश्चिम मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

pune Rain : पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. पुण्यातील डेक्कन, सिंहगड रोड, शिवणे, प्रभात रोड, नळ स्टॉप परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन संध्याकाळी पावसानं हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 

भंडाऱ्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील सातही दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा

Bhandara Sonu Murder Case : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा आज (11 एप्रिल) अंतिम निकाल लागला. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारं हे हत्याकांड 26 फेब्रुवारी 2014 मध्ये तुमसर येथे घडलं होतं. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (वय 42 वर्षे), त्यांची पत्नी पूनम सोनी (वय 40 वर्षे) बारा वर्षीय मुलगा धृमील सोनी यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांचा चालक आणि त्यांच्या सहा सहकाऱ्याने केली होती आणि पाच कोटी रुपयांचे दागिने पळवले होते. भंडारा जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी निकाल घोषित करताना, सातही आरोपींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी हा निकाल देताना, सर्व आरोपींना शिक्षेसाठी 275 पानांचं निकालपत्र तयार केलं. या निर्णय ऐकायला मोठ्या संख्येने नागरिकांनी न्यायालय परिसरात उपस्थिती लावली होती.

राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता


कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज 


१३ आणि १४ एप्रिल रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची देखील शक्यता


१४ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज


मुंबईत देखील गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी अवकाळी

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटवरुन पुन्हा गोंधळ; बीए तृतीय वर्षाची परीक्षा उद्या असताना हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यार्थी संभ्रमात

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटवरुन पुन्हा गोंधळ


बीए तृतीय वर्षाची परीक्षा उद्या असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यार्थी संभ्रमात


बीए तृतीय वर्षाची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे सकाळी साडेदहा वाजता मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात पेपर सुरु होणार आहे


मात्र अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी परिपत्रक देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षा नेमक्या कोणत्या केंद्रावर द्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे


अनेक विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन या संदर्भात विचार न करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर विद्यापीठाकडून अद्याप मिळालेला नाही

अवकाळीमुळं नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित, 13 हजार 909 हेक्टरील शेती पिकांना फटका

Nashik Rain : नाशिक जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून 7 ते 9 एप्रिल या कालावधीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पावसामुळे 12 तालुक्यातील 208 गावे बाधित झाली आहेत तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या दोन दिवसातच एकूण 13 हजार 909 हेक्टर वरील शेतीपिके आणि फळबागांना कमालीचा फटका बसला आहे. चिंताजनक बाब म्हणजे कांद्याला आधीच कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक संकटात सापडलेला असतांनाच या अवकाळीमुळे कांद्याचेच सर्वाधिक नुकसान झाले असून 10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला आहे. कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टर द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन तर दिले आहे मात्र आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनकुटे गावात दाखल, नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी अहमदनगर दौरा 

CM Eknath Shinde : अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरमध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील वनकुटे येथे पोहचले असून येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार आहे. कालच शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचा दौरा केला होता. त्यानंतर आज लागलीच मुख्यमंत्री शिंदे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी अवकाळीमुळे घराचे नुकसान झालेल्या हिरामण बर्डे यांच्या घराची पाहणी केली. अवकाळीमुळे पारनेर तालुक्यात 332 ठिकाणी अंशतः पडझड झाल्याची प्राथमिक अहवालात माहिती आहे. 

Uddhav Thackeray:  उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार

UddhavThackeray:  उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देणार आहे. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेय 

भाजपचे नेते विनोद तावडे यांना मातृशोक, आज मुंबईतील अंधेरीमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

Vinod Tawde Mother Passes Away : माजी मंत्री आणि भाजप राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया श्रीधर तावडे यांचे काल (10 एप्रिल) दीर्घ आजाराने निधन झाल. आज त्यांच्यावर अंधेरी सहारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद तावडे यांच्या घरी जाऊन त्याच्या मातोश्री विजया तावडे यांचे अंत्यदर्शन घेतले आणि विनोद तावडे यांचं सांत्वन केलं. आज तावडे यांच्या घरी सकाळपासून अनेक राजकीय मंडळी अंत्यदर्शनासाठी येत आहेत. यामध्ये मंगल प्रभात लोढा, शिवसेना उबाठा सचिव मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री विजयकुमार गावित, मनसे नेते बाळा नांदगावकर, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही अंत्यदर्शन घेतलं.

मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाक्यावर वसुलीला सुरुवात, व्यापारी संघटना आणि काही राजकीय पक्षांचा विरोध

Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली सुरु झालेली आहे. टोल नाक्यापासून 20 किलोमीटर परिघामध्ये असलेल्या स्थानिक वाहनांना महिना 315 रुपये मासिक पास दिला जाणार आहे. या टोल वसुलीला स्थानिक व्यापारी संघटना आणि आणि काही राजकीय पक्ष यांचा विरोध आहे.

1 मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत होणार सभा 

1 मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत होणार सभा 


मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता 


महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी करणार शिंदे सरकारवर हल्लाबोल

यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभाग आज घोषणा करणार 

यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभाग आज घोषणा करणार 


स्कायमेट ह्या खासगी हवामान संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केल्यानंतर भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमान जारी करणार 


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डाॅ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डाॅ. महापात्रा यांच्या उपस्थिती दुपारी 12.30 वाजता नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे मान्सूनसंबंधी माहिती दिली जाणार


एल-निनोचा प्रभाव बघता भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनबाबत काय घोषणा होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष


स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे

नंदुरबारमधील अक्कलकुवामध्ये सात वर्षीय मुलाला जीवे मारणारा बिबट्या जेरबंद, गुजरात वनविभागाची कारवाई

Nandurbar News : नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन शिवारातील एका सात वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून जीवे मारलं होतं. या परिसरातील नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली जात होती, त्यासाठी गुजरात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं आहे. देवमोगरा पुनर्वसन या गावातील सात वर्षाच्या सुरेश पाडवी हा जेवण करत असताना बिबट्याने हल्ला करत त्याला फरफटत नेऊन त्याला जीवे मारलं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं. या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी केली जात होती. नागरिकांनी तक्रारी केली होती, मात्र महाराष्ट्राच्या वन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होतं. परंतु बिबट्याने नागरी वस्तीत शिरुन हल्ला केल्याने गुजरात वनविभाग सतर्क झाला आणि बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र या परिसरात आणखीन बिबट्या असल्याने वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आंबा विक्रेत्यांचे 12 मोबाईल फोन चोरले; आंबा महोत्सवातील घटना

Pune News : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील आंबा महोत्सावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरट्यांनी महोत्सावातून विक्रेत्यांचे तब्बल 12 मोबाईल फोन मध्यरात्री चोरुन नेले आहे. स्टॉलधारक झोपल्यानंतर उशाला ठेवलेले हे मोबाईल चोरुन नेले. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अक्षय थोटम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तक्रारदार आंबा महोत्सावासाठी पुण्यात आले असून, त्यांनी मार्केट यार्ड येथे सुरु असलेल्या आंबा महोत्सावात स्टॉल टाकलेला आहे. स्टॉलधारक येथेच झोपतात. यादरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री स्टॉल धारक झोपले असता तक्रारदारासह इतरांचे झोपताना उशाजवळ ठेवलेले 61 हजारांचे 12 मोबाईल फोन चोरुन नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Dombivali News: "जो फेरीवालो की बात करेगा,वही डोंबिवली पे राज करेगा"; सर्व राजकीय पक्षांना फेरीवाल्यांचा इशारा

Dombivali News: गेल्या काही दिवसापासून डोंबिवली स्टेशन  परिसरातील फेरीवाल्यांचा विषय हा गाजत आहे. यातच येणाऱ्या निवडूकीच्या पार्शभूमिवर "जो फेरीवालो की बात करेगा, वही डोंबिवली पे राज करेगा" असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी दिला आहे.


डोंबिवली स्टेशन पासून 150 मीटर पर्यन्तचा परिसर फेरीवाला मुक्त करावा अशी मागणी करत मनसे चे आमदार राजू पाटील रस्त्यावर उतरले होते. त्यांनतर महापालिकेने स्टेशन परिसरात फेरुवाल्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सर्वपक्षांना फेरीवाला अध्यक्ष बबन कांबळे यांनी इशारा दिला आहे
Sangli News: सांगली जिल्ह्यात पावसाने बेदाणा भिजल्याने बेदाणाचे नुकसान

Sangli News: एकीकडे सांगली जिल्ह्यातून यंदा 14 हजार टनाच्या आसपास द्राक्षाची निर्यात झाली असताना दुसरीकडे  निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आलेल्या  पावसाने शिल्लक राहिलेल्या द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादकाची चिंता वाढवली आहे. योग्य दर न मिळाल्याने अजून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागाची निर्यात झाली नाही. त्यामुळे एकीकडे दर नाही आणि दुसरीकडे चार दिवसांपासून अस्मानी संकट निर्माण झाल्याने आहे द्राक्षचे नुकसान होत आहे. दुसरीकडे बेदाणा करण्यास टाकलेली द्राक्षे देखील झालेल्या पावसाने खराब होत आहेत. त्यामुळे सध्या दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकला आहे. 

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी

राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. 

Maharashtra News: मुख्यमंत्री अहमदनगर आणि धाराशिव दौऱ्यावर

Maharashtra News: मागच्या तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्या अनुषंगानेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसानग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी नाशिक जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

Kalyan Dombivali : कल्याण, डोंबिवली महापालिका पाच फाईल गहाळ प्रकरण
कल्याण डोंबिवली महापालिकेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आलाय.कल्याण डोंबिवली महापालिकेतील दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरनाचा प्रस्ताव संबधित विभागाने तयार केले. हे दोन्ही रस्ते डांबरी आणि सुस्थितीत असताना या रस्त्यांचा काँक्रिटकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठवला. मात्र पालिका आयुक्तांना संशय आल्याने हे सर्व प्रस्ताव रोखून धरले. इतकेच नव्हे तर आयुक्तांनी पाच

 

अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावत लक्ष्मण दिवेकर या शिपायाला निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात या आदेशाच्या फाईल्स गायब झाल्याने हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगित कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय. मात्र मधील आठ दिवस या फाईल कुठे गायब झाल्या होत्या? संबंधित अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गारपीट पाहणी दौरा करणार आहेत.  आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


मुख्यमंत्री गारपीट पाहणी दौरा -


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करतील.    मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता धारूर आणि दुपारी 3 वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करतील. दोन्ही जिल्हे मिळून सुनिल भोंगळ सकाळी 7.30 वाजता चालवण्यासाठी डफेर्ड लाईव्ह देईल. सकाळी 9 वाजेपर्यंत संभाजीनगरचं लाईव्हयु सुनिल भोंगळपर्यंत जाईल.


अवकाळी पावसाचा अंदाज -
राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.    मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आला आहे.  13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, कुठेही गारपिटीची शक्यता नाही.


नंदुरबार – बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गहूचे आवक होत असल्याचे चित्र आहे हवामान खात्याने काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजार समितीत विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये आता दररोज 2500 ते 2700 गव्हाचे आवक होत आहे. अगोदर 1000 ते तेराशे क्विंटल गव्हाची आवक होती ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आवक वाढल्याचा अंदाज आहे गव्हाला 2300 ते 2800 पर्यंत दर मिळत आहे.  
 
हवामान विभागाची पत्रकार परिषद -


दिल्ली – यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे, दुपारी 12.30 वाजता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. महापात्रा संबोधित करतील. स्कायमेटकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केल्यानंतर भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमान जारी केलं जाणार आहे.


मराठा आरक्षण सुनावणी -


मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. विनोद पाटील यांनी सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल रिव्हीव्यु पीटीशनवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारने कोणतीही पावलं उचली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप.


 मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोलवसूली  -
मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोलवसूली  केली जाणार आहे.  मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका आजपासून सुरू होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने सर्वपक्षीयांनी टोल सुरू करण्यास विरोध केलाय. जर टोल वसुली सुरू झाली तर मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. 


रूग्णालयात आजपासून मास्क सक्ती
महापालिका रूग्णालयात आजपासून मास्क सक्ती करण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
महानगरपालिका रुग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रूग्णांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.     तसेच सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  लवकरच महापालिका गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करण्यात येणार आहे. 


पुणे – महात्मा फुले जयंतीनिमित्त शेफ विष्णु मनोहर हे पाच हजार किलोची मिसळ तयार करणार आहेत. एक लाख लोकांना ही मिसळ वाटण्यात येणार. सकाळी 7 वाजल्यापासून मिसळ तयार करण्यास सुरुवात होणार आहे. 
 
नागपूर – महाविकास आघाडीच्या 16 एप्रिल रोजी नागपुरात होऊ घातलेल्या वज्रमुठ सभेसाठी जरी महाविकास आघाडीने दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड केली असली तरी स्थानिक नागरिकांनी मैदानावरील क्रीडासोयी राजकीय सभेमुळे खराब होतील, मैदानावर राजकीय सभा झाल्यास खेळाडूंना अनेक दिवस खेळता येणार नाही, असे मुद्दे समोर करत मैदान राजकीय सभेसाठी देण्यास विरोध सुरू केला आहे. आज सकाळपासून दर्शन कॉलनीचे नागरिक मैदानाच्या बाजूला आंदोलनावर बसणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा असून भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी सुद्धा मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला हे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी देण्यात येऊ नये असे पत्र पाठवले होते. 


भंडारा – जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल दिला जाणार आहे. या हत्याकांडातील सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. सकाळी 11.30 नंतर निकाल देतील. त्यापुर्वी उज्ज्वल निकम आणि सोनी कुटुंबातील मुलगी आणि अन्य नातेवाईकांचे बाईट मिळतील. 


-   बेस्ट बेकरी केस प्रकरणावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे.. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपिंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे.


-  हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायधीश एम जी देशपांडे देणार निकाल. मुश्रीफांना अटकेपासून कोर्टानं दिलेलं संरक्षण निकालापर्यंतच कायम आहे. मुश्रीफ यांच्यावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. कथित भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही ईडीकडून ठपका. 


अकोला – आमदार नितीन देशमुखांची अकोला ते नागपूर पदयात्रा अंबिकापूरवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरकडे रवाना होणार आहे. आज या पदयात्रेत ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत पायी चालणार आहेत, सकाळी 8.30 वाजता. 


मुंबई – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणांमध्ये महिला आयोगाने पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर पुन्हा एकदा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज ठाण्याचे जॉइंट सीपी वांद्रे येथील महिला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 12 वाजता. रिपोर्टर -


जयपूर – काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आज जयपुरच्या शहिद स्मारक या ठिकाणी सकाळी 11 वाजता उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेसच सरकार आल्यानंतरही अनेक भ्रष्टाचारांच्या आरोपाची चौकशी सरकारनं केली नसल्याचा आरोप सचिन पायलट यांनी केलाय.


 मुंबई – देशातील वाढती महागाई,  बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा, देशातील हुकुमशाही,  भष्ट्राचारी केंद्र आणि राज्य सरकार म्हणत मुंबई कॉग्रेस आज मशाल यात्रा काढणार आहे, संध्याकाळी 7 वाजता, मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदान, माहिम कोळीवाडयासमोर, माहीम कॉज वे, कॅडल रोड, हिंदुजा हॉस्पिटल, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम येथे मशाल यात्रा संपेल. रिपोर्टर . 


मुंबई – महात्मा फुले यांच्या जयंती दिनी मराठ्यांना 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद. येत्या काही दिवसांत पुन्हा लाखोंच्या संख्येने मुंबईवर मराठे धडकणार आहेत. समाजाची तयारी पूर्ण झाली असून पुन्हा एकदा महाराष्ट्र मराठ्यांची धग अनुभवेल ते आंदोलन नेमके कसे असणार? याची माहिती दिली जाणार आहे. 


-        महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील अभिवादन करणार आहेत. 
 
-   बहुजन मेडिकोज असोसिएशनच्या वतीने आजपासून चार दिवसीय बहुजन समता पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर रोड वरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आज नितीन राऊत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन. संध्याकाळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचं "महात्मा फुले हा गुलामगिरी ग्रंथ और आज का भारत" या विषयावर व्याख्यान होईल.


भंडारा – ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी यासाठी भंडारा इथं ओबीसी बांधवांचा मोर्चा, दुपारी 12 वाजता. भंडारा शहरातील दसरा मैदान इथून निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील त्रिमूर्ती चौकापर्यंत काढण्यात येत आहे.


 बुलढाणा – राज्यातील पहिला विधवा विधुर आणि विधवा महिलांची लग्न करणाऱ्या सदस्यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय. समाजसेवक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच मेळावा होणार आहे.


मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या सन्मानार्थ 'सिंहासन' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलय. यावेळी शरद पवार स्क्रीनिंग साठी उपस्थितीत रहाणार आहेत, संध्याकाळी 5 वाजता, मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर.


-  नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजपासून हायकोर्टात सुनावणीला सुरूवात. मलिक गेले काही महिने मिळतेय केवळ तारीख पे तारीख.


-  शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. पीटर मुखर्जीशी संबंधित साक्षीदाराची होणार उलटतपासणी. इंद्राणी मुखर्जीचे वकील घेणार ही उलटतपासणी.


-   टिव्ही कलाकार तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी शिझान खानची हायकोर्टात याचिका. याप्रकरणी शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दाखल आहे गुन्हा.


वायनाड – खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदा आपला मतदारसंघ वायनाडमध्ये येत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधीही असतील. लोकांशी संवाद साधत राहुल सभेलाही मार्गदर्शन करणार, दुपारी 2.30 नंतर राहुल गांधी वायनाडमध्ये पोहचतील.


दिल्ली – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमिवर देशव्यापी मॉकड्रिल सुरू आहे त्याचा आज दुसरा दिवस. सकाळी 10 वाजता दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज राजीव गांधी रुग्णालयात मॉकड्रिलचं निरीक्षण करतील.


दिल्ली – राजद्रोहाच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी... मागच्या वर्षी मेमध्ये सुनावणी झाली होती तेंव्हा कोर्टानं केंद्र सरकारला समिक्षा करायला वेळ दिला होता.


दिल्ली – राजकिय पक्षांना आरटीआय मध्ये आणण्याच्या मागणीवरील याचीकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी. याप्रकरणी केंद्र आणि निवडणूक आयोगाला उत्तर द्यायच आहे.


 दिल्ली – राजकिय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत इलेक्ट्रॉनिक बॉंडची व्यवस्था करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी. या याचिकेत इलेक्टोरल बॉंडने भ्रष्टाचाराची शंका उपस्थित केली गेलीय. हे प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवयाच की नाही हे कोर्टाला ठरवायच आहे.


मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.