मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 229 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 395  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज  तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,22, 360  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 88, 40, 204   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  1906 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 1906 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  323  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 189 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. 


 देशात कोरोना प्रादुर्भावात घट


 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाली आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 539 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) 2 हजार 876 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.  तर 98 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजार 799 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 24 लाख 54 हजार 546 वर पोहोचली आहे. 


संबंधित बातम्या :


Coronavirus Cases Today : देशात कोरोना प्रादुर्भावात घट; गेल्या 24 तासांत 2539 दैनंदिन रुग्णांची नोंद