मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 252  नव्या रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 235  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

Continues below advertisement


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 75 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 75 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 63 हजार 868  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.07 टक्के आहे.  सध्या राज्यात 9 लाख 05 हजार 696 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2610  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 50 लाख 99 हजार 654 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 गुरुवारी मुंबईत 827 नवे रुग्ण, 1366 जणांची कोरोनावर मात


गुरुवारी मुंबईत 827 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,22,292 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 7601 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 623 दिवसांवर आला आहे.  मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.11% टक्के इतका झालाय.  मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :