सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता शाळांच्या उपहारगृहांमध्ये भाताचे विविध प्रकार, इडली, सांबर, वडा अशा प्रकारचे पदार्थ ठेवावे लागतील. विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांचं प्रमाण वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
जंक फूड शाळांच्या उपहारगृहात आढळणार नाही, याची काळजी शाळा प्रशासनाला घ्यावी लागेल. शिवाय पोषक पदार्थांचं सेवन केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्याची जबाबदारीही शासनावर असेल.