मुंबई: भाजपचे (BJP)  ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal Krishna Adwani)   देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर  करण्यात आला आहे. त्यानंतर  देशभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar)  देखील अभिनंदन केले आहे. भारतरत्न जाहीर झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीर झाला पण योग्य निवड  आहे, असे म्हणत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप)  टोमणा मारला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. 


शरद पवार म्हणाले, भारतरत्न जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी  दोन्ही नावं अतिशय योग्य आहेत.  अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते.  भाजपचे नेते, संसदेचे सदस्य, मंत्री म्हणून आदर्श काम करत आहेत. थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्णी अडवाणी संसदेत अनेक वर्षे होते. त्यांचा पराभव कधी झाला नाही, रथयात्रा काढली  तेव्हा एकदा मतभेद झाले.थोडा उशीर झाला पण योग्य निवड  आहे.  त्यांना सन्मान मिळाला आहे,आता समाधान व्यक्त करतो. त्यांच्या पक्षात काय घडलं याच्या खोलात जात नाही.  


सत्तेचा गैरवापर केला जात आहे : शरद पवार


उल्हासनगर गोळीबार प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर केला जात आहे.  कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे.  सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जातंय याचा विचार केला पाहिजे. कायदा हातात घेणाऱ्या विरोधात गैरवापर होत आहे. राज्य सरकारची सगळ्या बाबतीत बघ्याची भूमीका घेते असे वाटते. अशा गोष्टी महाराष्ट्र नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. 


जागावाटपाचा 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत तिढा सुटेल : शरद पवार


महाविकास आघाडीमध्ये  जागावाटप चर्चा चांगली झाली, जागा जिंकणे महत्वाचे असले तरी कशासाठी हे महत्वाचे असतात. जागावाटपाचा 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत तिढा सुटेल. निवडणुका होऊ द्यात नंतर एकत्रित बसू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली. नितीशकुमार यांची भूमिका अशी का बदलली सांगू शकत नाही. इंडिया आघाडी बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी आक्रमक भूमिका भाजप विरोधी घेतली होती. सत्तेचा गैरवापर होतो त्याला पर्याय राहिलेला नाही,शेवटी सामान्य जनतेसमोर जावं लागेल. सोरेन आदिवासी नेता आहेत. 


राज्यसभेसाठी बहुमत नसल्याने आम्ही प्रयत्न करणार नाही : शरद पवार


पंतप्रधान मोदी महाराष्ट्रत येत आहेत. जसे गुजरातला सगळे देण्यासाठी ते धैर्य दाखवत असतात तसे महाराष्ट्र राज्याला पण द्यावं. आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही, बहुमत नसल्याने आम्ही प्रयत्न करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. रोहित पवार चौकशीवर बोलताना शरद पवार म्हणाले, घरच्या एका व्यक्तीला कोणी घेऊन गेलं . चौकशीला तर आपण जात नाही का? मग त्यात हे सगळे कुटुंबीय गेलं कुठं बिघडले. 


हे ही वाचा :


Lal Krishna Advani: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा