Janta Curfew | मुंबईच्या नागपाड्यातील मुंबईबाग आंदोलन तूर्तास स्थगित.

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2020 11:01 PM
पालघर शहरातील नानिवडेकर खासगी रुग्णालयातील एका सदनिकेस (गणेश-आशिष इमारत) रात्री 9.20 च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलीस प्रशासन दाखल, अग्निशामन जवान आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या जनता कर्फ्यूसाठी मुंबई महापालिकेचा डी वॉर्डही सज्ज आहे. एरव्ही डी वॉर्डमध्ये १८०० कर्मचारी असतात, परंतु जनता कर्फ्यूमुळे केवळ ३५० कर्मचारी मुंबईच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. सफाई कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. ड विभागातील घन कचरा व्यवस्थापन खात्याचे संतोष तायडे आणि ड विभागाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या जनता कर्फ्यूसाठी मुंबई महापालिकेचा डी वॉर्डही सज्ज आहे. एरव्ही डी वॉर्डमध्ये १८०० कर्मचारी असतात, परंतु जनता कर्फ्यूमुळे केवळ ३५० कर्मचारी मुंबईच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. सफाई कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. ड विभागातील घन कचरा व्यवस्थापन खात्याचे संतोष तायडे आणि ड विभागाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत.
हिंगोली | जनता कर्फ्यूमुळे अनेक जण घराबाहेर अडकून पडलेले आहेत. कुणी रुग्णालयात आहे तर कुणी रेल्वे स्थानक, बस स्थानक, अशा परिस्थितीत पोटाला घरचा घास मिळत नसल्याने कोणी उपाशी पोटी राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिंगोलीमधील विघ्नहर्ता ग्रुपने भुकेलेल्यांना आणि घरापासून दूर असलेल्या अशा व्यक्तींना जेवणाची व्यवस्था केली आहे. घरापासून दूर असलेल्या व्यक्तीचा शोध घेत मोफत जेवणाचं वाटप केलं.
हिंगोली | जनता कर्फ्यूमुळे अनेक जण घराबाहेर अडकून पडलेले आहेत. कुणी रुग्णालयात आहे तर कुणी रेल्वे स्थानक, बस स्थानक, अशा परिस्थितीत पोटाला घरचा घास मिळत नसल्याने कोणी उपाशी पोटी राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिंगोलीमधील विघ्नहर्ता ग्रुपने भुकेलेल्यांना आणि घरापासून दूर असलेल्या अशा व्यक्तींना जेवणाची व्यवस्था केली आहे. घरापासून दूर असलेल्या व्यक्तीचा शोध घेत मोफत जेवणाचं वाटप केलं.
नांदेड | जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नांदेडमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळे मागील आठवड्यापासूनच बंद आहेत. आजच्या जनता कर्फ्यूसाठी एसटी पूर्णपणे बंद आहेत. शिवाय शहरातील ऑटोरिक्षा देखील बंद आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक चौकाचौकातील दृश्य हे स्मशानशांतता असेच वर्णावे लागेल. तेलंगणा राज्याने तेलंगणाच्या सीमेत नांदेड जिल्ह्यातून प्रवेश बंदी केली आहे. जनतेने आज दिलेला प्रतिसाद पहिला तर कोरोनाचे हे युद्ध आपण नक्की जिंकू अशी आशा आहे.
नांदेड | जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नांदेडमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळे मागील आठवड्यापासूनच बंद आहेत. आजच्या जनता कर्फ्यूसाठी एसटी पूर्णपणे बंद आहेत. शिवाय शहरातील ऑटोरिक्षा देखील बंद आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक चौकाचौकातील दृश्य हे स्मशानशांतता असेच वर्णावे लागेल. तेलंगणा राज्याने तेलंगणाच्या सीमेत नांदेड जिल्ह्यातून प्रवेश बंदी केली आहे. जनतेने आज दिलेला प्रतिसाद पहिला तर कोरोनाचे हे युद्ध आपण नक्की जिंकू अशी आशा आहे.
भंडारा-गोंदिया | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च म्हणजे आजच्या दिवशी जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केलं आहे. या आवाहनाला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना व्हायरसची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. बहुतेक व्यापारी प्रतिष्ठान बंद आहेत. जी दुकानं चालू आहे, त्यामध्ये पेट्रोल पंप, किराणा दुकान आणि औषध दुकानांचा समावेश आहे.
भंडारा-गोंदिया | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च म्हणजे आजच्या दिवशी जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केलं आहे. या आवाहनाला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना व्हायरसची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. बहुतेक व्यापारी प्रतिष्ठान बंद आहेत. जी दुकानं चालू आहे, त्यामध्ये पेट्रोल पंप, किराणा दुकान आणि औषध दुकानांचा समावेश आहे.
अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यूचं आव्हान केल्यानंतर सबंध देशभरामध्ये याचं काटेकोर पालन केल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. अहमदनगर येथेही संपूर्ण शहरांमध्ये या कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिक घराबाहेर पडले नाहीत. मुख्य रस्त्यावर शुकशुकाट आहे. सतत गजबजलेले असणारे चौक सुने झाले आहेत, तर बाजारपेठ देखील 100 टक्के बंद आहेत.


पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून रोज हजारो भाविकांची वर्दळ असलेला विठ्ठल मंदिर परिसर पहिल्यांदाच निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य बनले असून सर्वत्र निरव शांतता पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिराच्या शिखराचे व नामदेव पायरीचे बाहेरून दर्शन घेण्यासाठी रोज शेकडो भाविक येत असतात. मात्र आजच्या जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण मंदिर परिसर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. शहरात असलेले शेकडो भिकारी व निराधारांना आज बस स्टॅण्डचा आसरा घेतल्याने हि परिवहन महामंडळाला मोठी डोकेदुखी ठरली आहे.


पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून रोज हजारो भाविकांची वर्दळ असलेला विठ्ठल मंदिर परिसर पहिल्यांदाच निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य बनले असून सर्वत्र निरव शांतता पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिराच्या शिखराचे व नामदेव पायरीचे बाहेरून दर्शन घेण्यासाठी रोज शेकडो भाविक येत असतात. मात्र आजच्या जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण मंदिर परिसर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. शहरात असलेले शेकडो भिकारी व निराधारांना आज बस स्टॅण्डचा आसरा घेतल्याने हि परिवहन महामंडळाला मोठी डोकेदुखी ठरली आहे.
नाशिक | नाशिकमध्ये एसटी डेपोमध्येच आज सर्व बस उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूला नाशिककरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने बसला प्रवासीच मिळत नाही. नाशिक शहरात रोज 2300 फेऱ्या होतात, मात्र आज सकाळपासून फक्त 7 फेऱ्या झाल्या आहेत.
नाशिक | नाशिकमध्ये एसटी डेपोमध्येच आज सर्व बस उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूला नाशिककरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने बसला प्रवासीच मिळत नाही. नाशिक शहरात रोज 2300 फेऱ्या होतात, मात्र आज सकाळपासून फक्त 7 फेऱ्या झाल्या आहेत.
बुलडाणा | कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला बुलडाण्याच्या मोताळा शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोताळाच्या बाजार चौकात नेहमी प्रवाशांची मोठी गर्दी असते, मात्र आज या चौकात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. हा परिसरच नाही तर शहरातही हीच परिस्थिती आहे.
परभणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. या आवाहनाला परभणीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. शहरासह जिल्हा कडकडीत बंद आहे. कायम वाहन आणि माणसाच्या गराड्यात आणि चार जिल्ह्यांना जोडणारा शहरातील उड्डाण पूल आज निर्मनुष्य झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 222 सह शहरातील सर्व गल्ली बोळ, छोट्या-मोठ्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
परभणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. या आवाहनाला परभणीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. शहरासह जिल्हा कडकडीत बंद आहे. कायम वाहन आणि माणसाच्या गराड्यात आणि चार जिल्ह्यांना जोडणारा शहरातील उड्डाण पूल आज निर्मनुष्य झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 222 सह शहरातील सर्व गल्ली बोळ, छोट्या-मोठ्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
हिंगोली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. याच आवाहानाला प्रतिसाद देत हिंगोली शहर आणि ग्रामीण भागातही या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदमुळे हिंगोली शहरांमध्ये निरव शांतता पसरली आहे. दररोज वर्दळ असणारे ठिकाण, रस्ते, बाजारपेठ सर्वच ओस पाहायला मिळाले. हीच परिस्थिती ग्रामीण भागांमध्ये देखील बघायला मिळाली. हिंगोलीमध्ये बस सेवा देखील बंद होती.
हिंगोली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. याच आवाहानाला प्रतिसाद देत हिंगोली शहर आणि ग्रामीण भागातही या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदमुळे हिंगोली शहरांमध्ये निरव शांतता पसरली आहे. दररोज वर्दळ असणारे ठिकाण, रस्ते, बाजारपेठ सर्वच ओस पाहायला मिळाले. हीच परिस्थिती ग्रामीण भागांमध्ये देखील बघायला मिळाली. हिंगोलीमध्ये बस सेवा देखील बंद होती.
सोलापूर | कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात आज जनता कर्फ्यू लागू करण्यात केला आहे. देशभरातून या जनता कर्फ्यूला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातही कडकडीत बंद दिसत आहे. मात्र शहरासोबत ग्रामीण भागातही हा कर्फ्यू तितकाच यशस्वी होताना दिसत आहे. स्वामींची नगरी असलेल्या सोलापूरातल्या अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंद दिसून आला. अक्कलकोट येथील एसटी स्टँड परिसर हा कधीही गजबज असणारा परिसर आता शुकशुकाट दिसत आहे. तर मोहोळ तालुक्यातील ही परिस्थिती तशीच आहे. मोठ्या दुकानांसह छोट्या व्यवसायिकांनीही कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलीसदेखील कारणं विचारत आहेत, जनजागृती करत आहेत, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती देखील पोलीस करताना दिसत आहे.
वर्धा | कोरोनाच्या अनुषंगाने जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्ध्यात बाजारपेठ बंद आहे. रस्ते निर्मनुष्य आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर कोणी दिसत नाही. प्रथमच असा अनुभव येत आहे.
वर्धा | कोरोनाच्या अनुषंगाने जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्ध्यात बाजारपेठ बंद आहे. रस्ते निर्मनुष्य आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर कोणी दिसत नाही. प्रथमच असा अनुभव येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास सांगलीच्या व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नेहमी गजबजलेले व्यापार पेठ आज मात्र ओस पडली आहे. सलग तीन दिवस व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. दुसरीकडे जनता कर्फ्यूला सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सांगलीचे बस स्टँड आणि रस्ते ओस पडले आहेत. सांगलीचे गजबजलेल्या रस्ते आणि बस स्टँड ओस पडलेले आहेत. त्याचबरोबर हळद आणि बेदाणे सौदे ही बंद करण्यात आले आहेत.
रत्नागिरी : आज एसटीच्या जिल्ह्यातील 1725 फेऱ्या रद्द; मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या एसटीचादेखील समावेश ; जिल्ह्यातील एसटी डेपोमधून दररोज धावतात 4500 एसटी

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

LIVE UPDATES | मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.