Kisan Sabha Long March : किसान सभेच्या लाँग मार्चचा (Kisan Sabha Long March) आज (16 मार्च) पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मार्च ठाणे (Thane) जिल्ह्यात दाखल झाला आहे. आज किसान सभेच्या (Kisan Sabha) शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळात (Delegation) 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. पाहुयात या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे.    


किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे. 


किसान सभेचं शिष्टमंडळ


1) जे पी गावित (माजी आमदार)
2) डॉ. अशोक ढवळे
3) आमदार विनोद निकोले
4) इरफान शेख
5) इंद्रजित गावित
6) डॉ डी एल कराड 
7) अजित नवले
8) उदय नारकर
9) उमेश देशमुख
10) मोहन जाधव
11) अर्जुन आडे 
11) किरण गहला
12) रमेश चौधरी 
13) मंजुळा बंगाळ
14) आमदार विनोद निकोले
15) डॉ अशोक ढवळे 


वरील 15 नेत्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आज मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. दुपारी तीन वाजता मंत्रालयात (Mantralaya) ही बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.


मागण्यांबाबत समाधान न झाल्यास मोर्चा सुरुच राहणार : जे पी गावित


आम्ही आज सरकारसोबत बैठकीला जाणार आहोत. आमच्या काही मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी दिली. काल मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse), मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांच्यासोबत चर्चा झाली. काही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायचे आहेत. सकारात्मक चर्चा व्हावी ही अपेक्षा असल्याचे गावित म्हणाले. समाधान झाले नाही तर मोर्चा सुरुच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लोकांची तब्बेत बिघडत आहे, सरकारला सगळे रिपोर्ट जात आहेत. त्यांचे इंटेलिजन्स इथे आहेत. कोणी दगावले कोणाला अधिक त्रास झाला तर सरकार जबाबदार असेल असंही गावित म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Long March : किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तोडगा निघणार का?