- विनोद तावडे विरुद्ध आशिष शेलार (मुंबई)
- संजय काकडे विरुद्ध गिरीश बापट (पुणे)
- संजय धोत्रे विरुद्ध रणजित पाटील (अकोला)
- एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन (जळगाव)
- अनिल गोटे विरुद्ध जयकुमार रावल (धुळे)
भाजपला राज्यात 2019 ला अंतर्गत गटबाजी नडणार?
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 04:18 PM (IST)
राज्यात भाजपसाठी येत्या निवडणुकीत सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे, अंतर्गत वैमनस्य, हेवे -दावे आणि शिरजोरीचं राजकारण.
नागपूर : केंद्रात आंध्र प्रदेशातील टीडीपीने भाजपाला डच्चू दिला आहे, तर राज्यात शिवसेनाही सतत खो देण्याच्या पावित्र्यात असते. आगामी निवडणुकीला एकच वर्ष उरल्यामुळे राजकीय पक्षांचा निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. राज्यात भाजपसाठी येत्या निवडणुकीत सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे, अंतर्गत वैमनस्य, हेवे -दावे आणि शिरजोरीचं राजकारण. गेल्या 4 वर्षात मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोतात आणलेली, झटकन बलशाली झालेली एक युवा नेत्यांची पिढी याला कारणीभूत ठरली आहे. अशी पिढी, की जिने आपापल्या भागातील प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभं केलं. एकेकाळी ज्या पद्धतीची खुली चढाओढ आणि हेवे-दावे मोठ्या प्रमाणात फक्त काँग्रेसमध्ये दिसून यायचे, ते चित्र आता भाजपच्या पटलावर राज्यात बघायला मिळत आहे. थेट मुंबईपासून ते विदर्भापर्यंत अशी अनेक भाजप नेते आहेत, ज्यांच्यात टोकाचा वाद आहे. खरं तर राज्यातील भाजप सरकारची सुरुवातच मुळात नितीन गडकरी विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी झाली होती. आमदारांनी त्यावेळी फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होणार, असं समजताच, गडकरी यांच्या वाड्यावर रांग लावून, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलं होतं. तो वाद पुढे महाराष्ट्राच्या आणि खास विदर्भाच्या भल्यासाठी या दोन्हीही नेत्यांनी परिपक्वता दाखवत संपुष्टात आणला. पण इतर ठिकाणी मात्र भाजपातील सामने निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तस-तसे जास्तच रंगत आहेत. राज्यातील भाजपाचे काही महत्त्वाचे सामने