एक्स्प्लोर

काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी

लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबाला मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे.

भिवंडी : कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाने, गोडाऊन तसेच सर्व रोजगार बंद झाले आहेत. अनेक कुटुंब जे रोजंदारीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, त्यांच्यावर रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबांना रोजगार नसल्याने मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे कुटुंब मागील पाच दिवसांपासून घरातच आहे. मात्र काहीही झालं तरी चालेल पण कोरोनाला हरवणार हा त्यांचा निश्चय दृढ आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरात थांबावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी, घरातच राहावे, बाहेर फिरु नये, असे प्रशासनाकडून वारंवार सांगूनही काही जण रस्त्यावर, गल्लीत फिरताना दिसून येत आहेत. मात्र भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्याच्या हेंगाडे कुटुंब मागील पाच दिवसांपासून फक्त पाणी पीत उपाशी पोटी राहून कोरोनाला हरवण्यासाठी घरातच थांबून आहे.

'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, "काम करुन 100 ते 200 रुपये मिळायचे. त्यावर आमचं पोट चालत होतं. मात्र कोरोनामुळे सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे जेवणाचे खूप हाल होत आहेत. मुलं जेवणामध्ये भात, चपाती मागतात पण पैसे नसल्याने ते शक्य नाही. त्यामुळे पाणी पिऊन उपाशीपोटीच झोपावं लागत आहे. तसेच रस्त्यावर जे थोडे थोडे तांदूळ पडलेले असतात ते वेचून आणले आहे. त्याचा भात बनवू परंतु काहीही झाले तरी चालेल पण कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही घरातच राहणार." परिस्थिती एवढी बिकट असूनही जर हे कुटुंब घरात थांबू शकत तर इतर लोक का घरात थांबू शकत नाही, असा प्रश्न आहे. घराबाहेर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांसाठी हेंगाडे कुटुंबाचं चांगलं उदाहरण आहे.

काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बेरोजगार, कामगार, भिक्षुक यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. भिवंडीतील जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने महादेव आंबो घाटाळ यांनी भिनार येथील आदिवासी पाड्यामध्ये उपसरपंच सुरेखा किसन भोईर यांना घेऊन सर्वेक्षण केलं. काम नसल्याने कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे समजताच, त्यांनी संस्थेच्या वतीने या गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, तेल, साखर, मसाला, तेल, पीठ, डाळ, विविध कडधान्य असं जवळपास एक महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे. जीवनाश्यक वस्तू घेताना आमच्या घरी देव माणूस आला आहे असं म्हणत हेंगाडे कुटुंबाने महादेव घाटाळ यांचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget