एक्स्प्लोर

काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी

लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबाला मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे.

भिवंडी : कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाने, गोडाऊन तसेच सर्व रोजगार बंद झाले आहेत. अनेक कुटुंब जे रोजंदारीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, त्यांच्यावर रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबांना रोजगार नसल्याने मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे कुटुंब मागील पाच दिवसांपासून घरातच आहे. मात्र काहीही झालं तरी चालेल पण कोरोनाला हरवणार हा त्यांचा निश्चय दृढ आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरात थांबावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी, घरातच राहावे, बाहेर फिरु नये, असे प्रशासनाकडून वारंवार सांगूनही काही जण रस्त्यावर, गल्लीत फिरताना दिसून येत आहेत. मात्र भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्याच्या हेंगाडे कुटुंब मागील पाच दिवसांपासून फक्त पाणी पीत उपाशी पोटी राहून कोरोनाला हरवण्यासाठी घरातच थांबून आहे.

'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, "काम करुन 100 ते 200 रुपये मिळायचे. त्यावर आमचं पोट चालत होतं. मात्र कोरोनामुळे सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे जेवणाचे खूप हाल होत आहेत. मुलं जेवणामध्ये भात, चपाती मागतात पण पैसे नसल्याने ते शक्य नाही. त्यामुळे पाणी पिऊन उपाशीपोटीच झोपावं लागत आहे. तसेच रस्त्यावर जे थोडे थोडे तांदूळ पडलेले असतात ते वेचून आणले आहे. त्याचा भात बनवू परंतु काहीही झाले तरी चालेल पण कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही घरातच राहणार." परिस्थिती एवढी बिकट असूनही जर हे कुटुंब घरात थांबू शकत तर इतर लोक का घरात थांबू शकत नाही, असा प्रश्न आहे. घराबाहेर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांसाठी हेंगाडे कुटुंबाचं चांगलं उदाहरण आहे.

काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बेरोजगार, कामगार, भिक्षुक यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. भिवंडीतील जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने महादेव आंबो घाटाळ यांनी भिनार येथील आदिवासी पाड्यामध्ये उपसरपंच सुरेखा किसन भोईर यांना घेऊन सर्वेक्षण केलं. काम नसल्याने कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे समजताच, त्यांनी संस्थेच्या वतीने या गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, तेल, साखर, मसाला, तेल, पीठ, डाळ, विविध कडधान्य असं जवळपास एक महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे. जीवनाश्यक वस्तू घेताना आमच्या घरी देव माणूस आला आहे असं म्हणत हेंगाडे कुटुंबाने महादेव घाटाळ यांचे आभार मानले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget