एक्स्प्लोर
सिंधुदुर्गात काजूबागा आगीच्या भक्ष्यस्थानी, हजारो कलमं जळून खाक
सिंधुदुर्गात आंबा-काजू बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवरील ‘कोल्ह्य़ाचो पाचो’ परिसरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत जवळपास 1 हजार कलमे जळून खाक झाली आहेत.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात आंबा-काजू बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवरील ‘कोल्ह्य़ाचो पाचो’ परिसरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत जवळपास 1 हजार कलमे जळून खाक झाली आहेत. सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात लागलेल्या आगीत सुमारे 40 एकर क्षेत्रावरील जवळपास 1 हजार काजू कलमे जळून खाक झाली. स्थानिक आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आलं आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे दहा लाखाहून जास्त नुकसान झाले. दरम्यान आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही. ऐन काजूच्या हंगामात हाता-तोंडाशी आलेले काजूचे पीक अचानक आगीने गिळंकृत केल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















