कोल्हापूर : गृहमंत्रिपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही, त्यामुळे ते खातं सक्षम व्यक्तीकडे द्यावं, असं मत व्यक्त करुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.


 

त्याआधी अंबाबाई मंदिरात मारहाण करणाऱ्या श्रीपूजक आणि अन्य कार्यकर्त्यांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करा, अन्यथा राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

 

इतकंच नाही, तर राज्यातल्या मंदिरांमध्ये महिला श्रीपूजकांची नियुक्ती करुन त्यांना पूजेचा अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली.