एक्स्प्लोर

'मातोश्री'चा निरोप घेऊन आलो होतो; अनिल परबांचा रामदास कदमांना धक्का आणि इशारा!

Shivsena : शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील पक्षांतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे.

Dispute in Shivsena : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकांच्या घडामोडींमध्ये शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला देखील जोरात सुरूवात झालेली आहे. अर्थात या सर्वांच्या केंद्र स्थानी आहेत ते सेनेतील दोन बडे नेते! अनिल परब आणि रामदास कदम. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी अनिल परबांनी तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देत नव्यांची निवड केली. दरम्यान, त्यांचा हा निर्णय म्हणजे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना धक्का मानला जात आहे. कारण अनिल परब यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याचं म्हणत उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ दिला.  उपजिल्हा प्रमुख म्हणून राजू निगुडकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई, तालुका प्रमुख म्हणून रुषिकेश गुजर आणि शहर प्रमुख म्हणून संदिप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, निवड केलेले तिन्ही पदाधिकारी हे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या गटातील असून नारळ दिलेले पदाधिकारी हे रामदास कदम यांच्या गटातील असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे परब यांनी थेट कदमांना सुचक इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे. दापोली नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असून काही अपक्षांनी देखील बंडाचा झेंडा फडकवला आहे, परिणामी आता निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. शिवाय, रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या पुढील चालीकडे देखील लक्ष असणार आहे. 

'मातोश्रीचा निरोप घेऊन आलोय'

रामदास कदम यांचे परबांविरोधात मोबाईल संभाषण पुढे आल्यानंतर पक्ष नेतृत्व कदम यांच्यावर नाराज असल्याचं पुढे आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि मातोश्रीच्या जवळचे असलेले तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. शिवाय, या ठिकाणची सारी सुत्रं सध्या माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्याकडे आली आहे. हा देखील एक धक्का कदम यांना मानला जात आहे. याबाबात रत्नागिरी येथे बोलताना 'दापोलीला पक्ष प्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सध्या शिवसेनेचा हा आक्रमकपणा कदमांना दिलेला इशारा तर नाही ना? असा सवाल विचारत राजकीय वर्तुळात देखील एक चर्चा सुरू झाली आहे. 

काय आहे जागा वाटपाचा फॉम्युला?

दरम्यान, दापोली नगरपरिषदेतील 17 जागांसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असून राष्ट्रवादी 9 तर शिवसेना 8 जागांवर लढणार आहे. मुख्य बाब म्हणजे या ठिकाणी सध्या शिवसेनेची सत्ता आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं 13 जागांवर निवडणूक होणार आहे. दापोलीमध्ये 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget