एक्स्प्लोर

मेडिकल प्रवेशासाठी ‘डोमिसाईल’च्या अटी योग्यच : राज्य सरकार

मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीप्रमाणे डोमिसाईलच्या अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील अधिवास असणे आणि दहावी व बारावी महाराष्ट्रातून उत्तीर्ण असणे, या अटींचा समावेश आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजांसाठी राज्य सरकार हे राज्यातील जनतेचा पैसा खर्च करत असते. त्यामुळे राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्यातील लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवतील, असे अपेक्षित असते. त्यासाठीच राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 85 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला असून त्यासाठी ‘डोमिसाईल’च्या अटी घातल्या आहेत. या अटी योग्यच आहेत, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीप्रमाणे डोमिसाईलच्या अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील अधिवास असणे आणि दहावी व बारावी महाराष्ट्रातून उत्तीर्ण असणे, या अटींचा समावेश आहे. मात्र, मूळचे महाराष्ट्रातीलच रहिवासी असलेल्या आणि बहुतांश शिक्षण राज्यातच झालेल्या, मात्र केवळ दहावी, बारावी किंवा दोन्ही परीक्षा अन्य राज्यातून उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या या नियमावलीला विवध याचिकांद्वारे हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्याविषयी मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी सुरू आहे. ‘राज्य सरकारच्या डोमिसाईलच्या अटीचा मूळ उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे. मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचा राज्यात अधिवास असणे महत्त्वाचे आहे. परंतु, काहींना केवळ आपल्या पालकांच्या नोकरीमुळे परराज्यात जावे लागले आणि त्यांची दहावी किंवा बारावी त्या राज्यात झाली म्हणून राज्यातील कोट्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही’, असा युक्तिवाद काही वकिलांनी मांडला. तसेच ‘डोमिसाईल’च्या नावाखाली भेदभाव करणे योग्य नसल्याचे म्हणणेही काहींनी मांडले. मात्र, ‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी असा नियम करणे योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्येच स्पष्ट केलेले आहे. तीच बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या अनेक खंडपीठांनीही नंतर आपल्या अनेक निवाड्यांत अधारेखित केलेली आहे. त्यामुळे दहावी व बारावी महाराष्ट्रातून उत्तीर्ण असणे आणि महाराष्ट्रातील अधिवास असणे या तिन्ही अटी योग्यच आहेत’, असा युक्तिवाद महाधिवक्त यांनी मांडला. ‘राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यात प्रवेश दिले तर ते भविष्यात सर्वसाधारणपणे राज्यातच स्थायिक होतात आणि त्यांची सेवा राज्यातील जनतेला मिळते. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना कोटा ठेवण्यामागे तो मूळ उद्देश आहे’, असे म्हणणेही त्यांनी मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने बुधवारीही यावरील सुनावणी राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget