Cyclone Nisarga LIVE UPDATE | राज्यात आज 2560 नवे कोरोनाबाधित, 122 जणांचा मृत्यू
Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2020 10:59 PM
पार्श्वभूमी
Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत...More
Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि दीव-दमण, गुजरात परिसरात ताशी 120 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. रायगडच्या किनारपट्टी भागातून 40 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ आणि इतर सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुंबई ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील सर्वच नागरिकांनी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचं आहे. या चक्रीवादळाचा वेग अंदाजे सव्वाशे किलोमीटर असण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील सर्व यंत्रणांना मुंबई महापालिकेकडून सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आज पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. शिवाय, 26 जणांची एनडीआरएफ टीम दाखल झाली असून हे सर्वजण चिपळूण येथे आहेत. किनारी भागात सध्या सतर्क राहा असे आदेश देखील देण्यात आले आहेत. कोस्ट गार्ड देखील सध्या याबाबत काळजी घेताना दिसत आहे.राज्य सरकारची तयारीचक्रीवादळबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा फटका ज्या जिल्ह्यात बसू शकतो त्या जिल्ह्यात एक एनडीआरएफ (NDRF) टीम बोलवण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम पोहचल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात गेलेल्या बोटींना परत बोलवण्यात आल्या आहेत. पुढची सूचना येईपर्यंत बोटी समुद्रात जाऊ शकणार नाही. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवब्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.पालघर जिल्ह्याला चक्रीवादळाचा धोका!अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवदळाचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ प्रमुख बी शिवप्रसाद राव हे आपल्या तुकडीसह सध्या पाहणी करत आहेत. तर तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालंय.अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?- अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.- उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.- नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे.- अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालाही फटका बसला, पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी झाडं कोसळली, झाडं रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरु
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2560 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 74,860 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 916 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं पुण्यात मुसळधार पाऊस, नाशिक, इगतपुरी, मालेगाव मार्गे वादळाचा प्रवास राहणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील दहा हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यातील दहा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. तसेच वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी विविध टीम तयार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाचा वॉल क्लाऊडचा भाग पुढचे दोन तास मुंबई आणि ठाण्यात राहणार आहे. दोन तासांनंतर वॉल क्लाऊड नाशिक, धुळ्याकडे हळूहळू सरकणार आहे. पोस्ट लॅण्डफॉलचा परिणाम म्हणून मुंबईत जोरदार वारा आणि पाऊस दिसत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात चार जण जखमी झाले, सुदैवाने जीवितहानी नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरु झाले असून नुकसानीबाबत दोन दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील 13 खलाशांना सुखरुपपणे वाचवण्यात यश आले आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल तसंच प्रभाग अधिकाऱ्यांशी बोलून ते वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल हे पाहण्याच्या सूचना देत आहेत. चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावं आणि सावधानता बाळगावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशात अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाही. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर कोसळल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सध्या मुंबईत वा-याचा वेग ५५ किमी प्रती तास नोंदवला गेलाय...पुढील काही तासात वा-याचा वेग वाढेल -- IMD
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवाद अलिबागला धडकल्यानंतर मुंबईत वाऱ्याचा वेग वाढल्याने खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक बंद करण्यात आला आहे. वाहनं पुन्हा माघारी फिरत असून पुढील सूचना मिळेपर्यंत सी-लिंक बंद राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अलिबागला धडकल्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने उरणच्या दिशेने कूच केली आहे. त्यानंतर हे वादळ मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सरकणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळांचा तडाखा कोकण किनारपाटीला देखील बसलाय. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशवर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाहीय. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडकामुळे जमिनी कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांसह आतील गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी. तसंच उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये, असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या लॅण्डफॉलला सुरुवात झाली आहे. अलिबाग समुद्रकिनारी चक्रीवादळ धडकलं आहे. येत्या दोन तासात वॉल क्लाऊड्स मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सरकत आहेत. पुढच्या दोन तासात मोठा पाऊस आणि वाऱ्याचा वेग असेल, असा अंदाज आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं, अलिबाग ते श्रीवर्धन दरम्यान धडकल्याची प्राथमिक माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव वाढू लागला असून समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय, तर वाऱ्याचा वेग ही वाढला आहे. सध्या NDRF ची टीम समुद्र भागाची पाहणी करत असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता आहे. रायगडमधील श्रीवर्धन पोलीस स्टेशनवर वाऱ्याने झाड कोसळले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळामुळे गुहागरमध्ये भयानक परिस्थिती आहे. किनाऱ्यावर उभे राहू शकत नाही इतका प्रचंड वाऱ्याचा वेग आहे. सध्या भरतीची वेळ असल्याने समुद्राला उधाण आले आहे. तर किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंदाऱ्यावरुन पाणी आत आल्याने नागरिकांची धांदल उडाली आहे. किनाऱ्यावरील बोटी ढकलत आत नेल्या जात आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव वाढू लागला आहे. समुद्र खवळलेला असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. सध्याही एनडीआरएफचं पथक समुद्रकिनाऱ्याची पाहणी करत असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा, प्रशासनाला सहकार्य करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील कोळीवाड्यातील नागरिकांना आवाहन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किमी, अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी, वादळ धडकताना ताशी 110 किमी वेग असेल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेनं घोंघावत येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला असून मालवण वेंगुर्ले देवगड किनारपट्टीवर वेगाने वारे वाहात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आय ऑफ सायक्लोन म्हणजेच वादळाचा केंद्रबिंदू श्रीवर्धनवरुन प्रवास करत आहे. त्यामुळे आता श्रीवर्धनला प्रचंड तडाखा बसत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ आज अलिबाग समुद्रकिनारी धडकणार आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. फांद्यांच्या छाटणीसह नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : गोल्फा देवी आणि जनता कॉलनी मधील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले, काल संध्याकाळी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन लोकांना हलवले, वरळी कोळीवाडा येथील कोळी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले आहे
मुंबई : गोल्फा देवी आणि जनता कॉलनी मधील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले, काल संध्याकाळी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन लोकांना हलवले, वरळी कोळीवाडा येथील कोळी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने घोंघावत येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला असून मालवण, वेंगुर्ले, देवगड किनारपट्टीवर वेगाने वारे वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने घोंघावत येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला असून मालवण, वेंगुर्ले, देवगड किनारपट्टीवर वेगाने वारे वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील माहिम कॉजवे, साई सेवा सोसायटी ही माहिम खाडीला लागून आहे. या ठिकाणी सुमारे अडीच हजार लोक राहतात. त्यांना महापालिकेच्या शाळेत हलवण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा सुटला आहे. लांज्यातही पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. तर रत्नागिरीतील शिरगांव येथील बाणखिंडी येथे झाड रस्त्यावर कोसळून पडले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा मच्छीमार नगर परिसरातील मच्छीमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडल्यास यांना स्थलांतरित करण्यात येईल अशी सूचना देखील मच्छीमारांना देण्यात आली आहे. यासोबतचं 25 लाईफगार्ड देखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सध्या सर्व बोट जेट्टीवर चढवल्यामुळे स्थानिक मच्छीमार बोटीना फटका बसू नये यासाठी बोटीवर छत बनवत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातही हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दलामध्ये 30 जवान आणि 3 अधिकारी यांचा सहभाग आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाणे : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला देखील हायअलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचलेले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या दलामध्ये 30 जवान आणि 3 अधिकारी यांचा सहभाग आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठैवण्यात आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठैवण्यात आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. चक्रीवादळ अलिबागपासून 115 किलोमीटर दूर, तर मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा मच्छीमार नगर परिसरातील मच्छीमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडल्यास यांना स्थलांतरित करण्यात येईल अशी सूचना देखील मच्छीमारांना देण्यात आली आहे. यासोबतच 25 लाईफगार्ड देखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सध्या सर्व बोट जेट्टीवर चढवल्यामुळे स्थानिक मच्छीमार बोटीना फटका बसू नये यासाठी बोटीवर छत बनवत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
समुद्र किनार पट्टीलगतच्या नागरिकांना चक्रीवादळात फटका बसू नये म्हणून उरण तालुक्यातील दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर सकाळपासून आणखी नागरिकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ आज मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. CRPC कलम 144 लावण्यात आलं असून लोकांनी समुद्र किनारी न जाण्याचा आव्हान पोलिसांनकडून करण्यात आलं आहे. तसेच मुंबई पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच लोकांनी घरीच राहण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी पाणी साचत अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सेफ्टी गिअर्स आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये लागणाऱ्या वस्तू पुरवण्यात आल्याचं देखील मुंबई पोलीस प्रवक्ते DCP प्रणय अशोक यांनी सांगितलं. तसेच जर एमर्जन्सी उद्भवल्यास लोकांनी महानगरपालिका आणि पोलिसांच्या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन देखील प्रणय अशोक यांनी केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चक्रीवादळाचा परिणाम सातारा भागातही दिसू लागला आहे. आज सकाळपासूनच पाटण महाबळेश्वरसह साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने चागंलाच जोर पकडला आहे. बदलत्या वातावरणामुळे सातारा प्रशासकिय यंत्रणेने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, वाई भागातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये अडकलं भरकटलेले जहाज, जहाजाला मिरकरवाडा बंदरात देण्याचे प्रयत्न असफल, समुद्राच्या अजस्त्र लाटांशी झुंज देतेय जहाज, जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पश्चिम उपनगरातील अक्सा बीचवर सकाळी 10:15 वाजता भरती असल्याने समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा येणार आहेत. लॉकडाऊनमुळे नाममात्र वर्दळ असल्याने बीचवर प्रशासनाचा फारसा बंदोबस्त नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पश्चिम उपनगरातील अक्सा बीचवर सकाळी 10:15 वाजता भरती असल्याने समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा येणार आहेत. लॉकडाऊनमुळे नाममात्र वर्दळ असल्याने बीचवर प्रशासनाचा फारसा बंदोबस्त नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या ट्रेन उशिराने पोहोचणार - •सकाळी 11.30 वाजता मुंबईला पोहोचणारी पाटणा-एलटीटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल. •दुपारी 2.15 वाजता मुंबईला पोहोचणारी वाराणसी-सीएसएमटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होईल.•दुपारी 4.40 वाजता पोहोचणारी थिरुअनंतपुरम-एलटीटी स्पेशल ट्रेन पुण्याला वळवून एलटीटीला नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. वेळा बदलल्या गाड्या - •एलटीटी-गोरखपूर विशेष ट्रेन सकाळी 11. 10 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार. •एलटीटी-थिरुअनंतरपुरम विशेष ट्रेन सकाळी 11.140 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटणार. •एलटीटी-दरभंगा विशेष ट्रेन दुपारी 12.15 ऐवजी रात्री 8.30 वाजता सुटणार. •एलटीटी-वाराणसी विशेष ट्रेन दुपारी 12.40 ऐवजी रात्री 9 वाजता सुटणार. •सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष ट्रेन दुपारी 3 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा, चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील काही भागात जाणवण्याची शक्यता, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नाशिक : चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा, चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील काही भागात जाणवण्याची शक्यता, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ आणखी पुढे सरकलं. चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून 130 तर मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग वादळ आज मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. लोकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच लोकांनी घरीच राहण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असंही आवाहन पोलिसांनी केलंय. तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सेफ्टी गिअर्स आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये लागणाऱ्या वस्तू व पुरवण्यात आल्याचं देखील मुंबई पोलीस प्रवक्ते DCP प्रणय अशोक यांनी सांगितलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ताशी 12 किमी वेगानं निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास, किनारपट्टीवर धडकताना 110 किमी वेगाने धडकण्याची शक्यता, किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्याचा वेग वाढला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढं सरकतंय, निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 140 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर, चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विरार : आज आणि उद्या चक्रीवादळाचा फटका समुद्र किनाऱ्यावर बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. सकाळच्या वेळेत तरी आणखी चक्री वादळाचे कोणतेही पडसाद वसई, विरार अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसत नाहीत. मच्छीमार बांधावा काडून बोटीतील सर्व सामान काडून सुरक्षित स्थळी हलवणे सुरू आहे. समुद्रात हलक्या लाटा वाढत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत वसई ताल्युक्यातील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 300 च्या वर नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफची 20 पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत आठ, रायगडमध्ये पाच, पालघरमध्ये दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरीत दोन आणि सिंधुदुर्गात एनडीआरएफचं एक पथक तैनात असेल. एनडीआरएफच्या एका रेस्क्यू टीममध्ये 45 जवानांचा समावेश आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थलांतराची 40000 लोक राहतील एवढी क्षमतेची तयारी ठेवण्यात आलेली आहे. सध्या देवगडमध्ये 40 लोकांना स्थलांतरित केलेले आहे. तर मालवणात 3 लोकांना स्थलांतरित केलेले आहे. स्थलांतरीत लोकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एकूण 82 निवारे शोधण्यात आलेले आहेत. ही तयारी जिल्हा आपत्ती विभागाने केली आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी केली गेली आहे. ही
स्थलांतरित देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छीमार व नागरिकांची केली जाईल
स्थलांतरित देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छीमार व नागरिकांची केली जाईल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर काल रात्री पासून जाणवू लागला आहे. मुंबईमध्ये रात्री ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरासह, दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसत होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मान्सून पूर्व पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
किनारपट्टी भागात आता निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. जिल्ह्यात रात्रभर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा आहे. पहाटेपासून हा जोर देखील वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मंडणगड. दापोली आणि गुहागरला चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला असून 9 ते12 या वेळात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागाचा विचार करता रत्नागिरी आणि राजापूर हा भाग कमी प्रभावित होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्या अणखी एक एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली असून एक तुकडी दापोली तर दसरी मंडणगड येथे थांबणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक बाबी वगळून अन्य कोणत्याही कारणासाठी जिल्ह्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास संचारबंदी केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये आणि वित्तहानी होऊ नये यासाठीच्या ठोस उपाय योजना करणे आवश्यक असल्याने संबंधित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ गोव्यापासून 280 किलोमीटर दूर आहे. तर मुंबईपासून 430 किलोमीटर लांब आहे. उद्यापर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस कोकण ,मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूबार, नाशिकमध्ये, पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, 120 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ धडकेल, पुणे वेधशाळेचा अंदाज
निसर्ग चक्रीवादळ गोव्यापासून 280 किलोमीटर दूर आहे. तर मुंबईपासून 430 किलोमीटर लांब आहे. उद्यापर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस कोकण ,मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूबार, नाशिकमध्ये, पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, 120 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ धडकेल, पुणे वेधशाळेचा अंदाज
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यातील अजून 13 मच्छिमार बोटी समुद्रात असून 156 मच्छिमार खलाशी या बोटींमध्ये आहेत. तर उर्वरित बोटी लवकरच परतण्याचा मार्गावर असल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निसर्ग चक्रीवादळ गोव्यापासून 280 किलोमीटर दूर आहे. मुंबई 430 किलोमीटर लांब आहे 11.30 तास किनारपट्टीवर पोहोचायला लागतील. पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे . 120 किलोमीटर प्रति तासाने हे वादळ धडकेल
कोकण ,मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूबार, नाशिकमध्ये,
पुणे घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल.
मुंबई, पालघर, रायगडमध्ये मोठा इम्पॅक्ट येईल या परिसरात 27 सेमी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण ,मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूबार, नाशिकमध्ये,
पुणे घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल.
मुंबई, पालघर, रायगडमध्ये मोठा इम्पॅक्ट येईल या परिसरात 27 सेमी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी शहरात आज दुपारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहर आणि परिसरात तब्बल एक तास पावसाच्या सरी बरसल्यात ज्यामुळे वातावरणात जाणवणारा उकाडा कमी झाला असून दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच नाल्याही ओसंडून वाहत होत्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले असून समुद्र काठावर असलेल्या नागरिकांना एनडीआरएफ आणि शासकीय यंत्रणेच्या मार्फत सूचना देण्यात येत असून येथील नागरिकांना इतरत्र हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल उद्या 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण 18 जवान आहेत. सोबत इन्स्पेक्टर आणि सबइन्स्पेक्टर असून ही सर्व टीम आज दापोली दाभोळ आणि गुहागर या परिसराची पाहणी करणार आहे. वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे. दरम्यान तीन तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत आगामी तीन दिवसांत पडणाऱ्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका लक्षात घेतं कफ परेड परिसरातील मच्छीमार नगर मधील सर्व मच्छीमारांनी आपल्या बोट जेट्टीवर आणून लावल्या आहेत. जवळपास 50 टक्के बोट जेट्टिवर लागल्या असून अजूनही 50 टक्के बोट जेट्टीवर लागणे बाकी आहेत. सध्या क्रेनच्या सहाय्याने या बोटी लावणं सुरु आहे. मागील तीन महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मच्छीमारांची उपासमार झाली आता आगामी काळात देखील पावसाळ्यामुळे मच्छीमारी बंद झाली आहे. त्यामुळे आता खायचे काय असा प्रश्न या मच्छीमार बांधवांसमोर उभा राहिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यावस्थापन सज्ज झाल असून तटरक्षक दल, अग्निशमन दल एन. डी. आर. एफ ग्रामसेवक तलाठी मंडळाधिकारी मच्छीमार संस्था यांच्यासोबत आज डहाणूमध्ये सुरक्षा उपाय व जनजागृतीसाठी बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्व यंत्रणांवर जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या असून झाईपासून चिंचणीपर्यंत एक टीम काम करणार आहे तर दुसरी टीम चिंचणीपासून वसईपर्यंत काम पाहणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात चक्रीवादळचा धोका संभवत आहे. राज्यात चक्रीवादळपूर्वी 10 एनडीआरएफच्या टीम राज्यात विविध महत्वाच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. मुंबई, पालघर, अलिबाग, श्रीवर्धन, पालघर अशा ठिकणी कालपासून एनडीआरएफ टीमकडून आढावा घेतला जातोय. आपत्ती पूर्व नियोजन करण्यासाठी स्थनिक लोकांना पूर्व सूचना देण्यात आल्या असून त्या दृष्टीने तयारी दर्शवली गेली आहे. रायगड हरिहरेवश्वर, श्रीवर्धन समुद्र किनारी पट्टीवरून हे चक्रीवादळ उत्तरेकडे मुंबई पालघर, दक्षिण गुजरातकडे सरकणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर आता महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलं आहे. मुंबईत आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. सध्या तरी मुंबईवर काळ्या ढगांचे सावट आहे. परंतू काही वेळातच ही परिस्थिती बदलू देखील शकते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणार असून ते रायगडच्या किनारपट्टीला येऊन धडकेल. याचा फटका श्रीवर्धन, हरिहरेश्र्वर, मुंबई शहर यांना फटका बसणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तयारीत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीला आता चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे. त्याकरता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या या इशाराकडे दुर्लक्ष करत आणि सूचनाना हरताळ फासत सध्या शेकडो बोटी समुद्रात असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्यानंतर देखील बोटी समुद्रात मच्छिमारी करताना दिसतात.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागाकडून देखील त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ज्या बोटी समुद्रात गेलेल्या होत्या मासेमारी करता यांना माघारी बोलावण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासन देखील यासाठी सतर्क झाले असून एनडीआरएफचे 26 जणांचा पथक चिपळूण येते दाखल झाले आहे. चक्रीवादळाचा काळात काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा प्रशासनकडून नागरिकांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. कॉस्ट गार्ड देखील यासाठी सध्या सज्ज आहे. अत्यावश्यक सेवा वगळता किंवा कारणांशिवाय नागरिकांना जिल्ह्यात संचार बंदी करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या मूळे पालघर जिल्ह्यातील समुद्र काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्ह्यातील समुद्रात मच्छीमारी साठी गेलेल्या 577 बोटींपैकी 78 बोटी अजूनही परतलेल्या नाहीत त्यामुळे ह्या बोटी माघारी आणण्यासाठी कोस्टगार्ड ची मदत घेतली जात आहे,,आज पालघर जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर : अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवदळाचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ प्रमुख बी शिवप्रसाद राव हे आपल्या तुकडीसह सध्या पाहणी करत आहेत. तर तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चक्रीवादळबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा फटका ज्या जिल्ह्यात बसू शकतो त्या जिल्ह्यात एक एनडीआरएफ (NDRF) टीम बोलवण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम पोहचल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात गेलेल्या बोटींना परत बोलवण्यात आल्या आहेत. पुढची सूचना येईपर्यंत बोटी समुद्रात जाऊ शकणार नाही. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवब्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतचं काही तासात निसर्ग चक्रीवादळ धडकण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 3 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात मधून जाणार आहे. या वादळाचा फटका रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tags: murud nisarga mumbai cyclone cyclone live cyclone in mumbai nisarga cyclone live cyclone tracking live cyclone tracking nisarga cyclone live tracking nisarg cyclone nisarg mumbai cyclone 2020 cyclone in mumbai 2020 cyclone news cyclone india nisarga cyclone mumbai cyclone update cyclone map maharashtra cyclone cyclone today cyclone meaning cyclone nisarga tracker cyclone in india mumbai cyclone live cyclone tracker nisarga cyclone
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Cyclone Nisarga LIVE UPDATE | राज्यात आज 2560 नवे कोरोनाबाधित, 122 जणांचा मृत्यू