एक्स्प्लोर

Maharashtra Corona Crisis: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या तीन दिवसात साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. मागील तीन दिवसात साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आजपर्यंत 80 हजार 786 इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 514 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट राहिला आहे. एवढेच नव्हे मृत्यूदराच्या बाबतही जळगाव जागतिक पातळीवर पुढे राहिले आहे. कोरोनाच्या बाबत जळगावची देशभर ओळख झाल्यानंतर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाल्याचं दिसून आल्याने अनेक नागरिक कोरोना बाबतचे नियमांचे पालन करीत नसल्याचं दिसून आले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा नव्याने कोरोनाची दुसरी लाट आली आहे. 

दिवसागणिक झपाट्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या तीनच दिवसात जळगाव जिल्ह्यात 3 हजार 407 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 36 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनतेला मास्क लावण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन करीत आहेत. मात्र, अनेक नागरिक प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात पाहिजे ते यश मिळत नसल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
राज्यात काल (बुधवारी 25 मार्च) विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, काल नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
Sanjay Rathod : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget