एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात अवमान याचिका

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील शिवणी रसुलापूर येथील शेतकरी अमोल राजकुळे आणि मोरेश्वर वंजारी यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अमरावती:  नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत राज्य शासन भूसंपादन कायद्याचे उलंघन करीत आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील शिवणी रसुलापूर येथील शेतकरी अमोल राजकुळे आणि मोरेश्वर वंजारी यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत 85 टक्के शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. यात असमान मोबदला देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. वास्तविक, शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2013 च्या भूसंपादन कायद्यांन्वये शेतकऱ्यांना मोबदला देणे गरजेचे होते. मात्र, सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असल्याचे सांगत शेतकऱ्यांना फसविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे याविरोधात 30 आक्टोंबरला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपिठात अवमान याचिका क्र. 25802/2018 दाखल करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पाची किंमत 6 हजार कोटींनी वाढली समृध्दी महामार्गाची प्रकल्प किंमत अवघ्या चार महिन्यात तब्बल 6 हजार 88 कोटी रुपयांनी वाढली आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत 49 हजार 247 कोटी रुपये होती. मात्र टेंडरनंतर निश्चित झालेली किंमत 55 हजार 335 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या चार महिन्यात या प्रकल्पाची  किंमत 6 हजार 88 कोटींनी वाढली आहे. प्रकल्पासाठी सवलत कालावधी 40 वर्षे आहे. दर 10 वर्षानंतर आढावा घेवून सवलत कालावधी वाढणार आहे. सरकार प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत 6 हजार 396 कोटी रुपये इतकं व्याज देणार आहे. प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कालावधी वाढला तर रस्ते विकास महामंडळ व्याज भरणार आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडील जमीन विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसा असेल समृद्धी महामार्ग? नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.  701 किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी या द्रुतगती महामार्गाची 16 भागांत विभागणी करण्यात आली आहे. जवळपास 50 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणार आहे. कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना चालना देऊन त्यायोगे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा प्रकल्प ठरेल असा फडणीस सरकारला विश्वास आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामार्गामुळे निम्म्यावर येणार आहे. आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार या महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबईत VIP कल्चरवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; गाडीवर लाल-निळे दिवे, विधानभवन लोगो लावणाऱ्या कपडा व्यापाऱ्याविरोधात मोठी कारवाई
मुंबईत VIP कल्चरवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; गाडीवर लाल-निळे दिवे, विधानभवन लोगो लावणाऱ्या कपडा व्यापाऱ्याविरोधात मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
School Bus Driver Association : '...तर 16 लाख लिटर डिझेलची बचत होईल'; हायब्रिड मोडमध्ये शाळा सुरु करण्याची स्कूल बस चालकांच्या संस्थेची मागणी; पालकांच्या संस्थेचाही पाठिंबा
'...तर 16 लाख लिटर डिझेलची बचत होईल'; हायब्रिड मोडमध्ये शाळा सुरु करण्याची स्कूल बस चालकांच्या संस्थेची मागणी; पालकांच्या संस्थेचाही पाठिंबा
Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागणार? 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोजा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत
एसटीचा प्रवास महागणार? 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोजा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
Supriya Sule : 'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
Ulhasnagar News: ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
Embed widget