एक्स्प्लोर

Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: फडणवीसांच्या A, B, C प्लानवर अशोक चव्हाणांचं 'प्लान R'नं उत्तर; पाहा काय म्हणाले?

Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या 'प्लान सी'बाबत विचारलं होतं. त्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी 'प्लान आर'नं उत्तर दिलं. पाहुयात काय आहे अशोक चव्हाणांचा 'प्लान आर'?

Congress Leader Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपलं राज्यासाठीचं व्हिजन मांडलं. अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भातही पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट केली. तसेच, 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या 'प्लान सी'बाबत विचारलं होतं. त्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी 'प्लान आर'नं उत्तर दिलं. 

प्रश्न : भाजपकडे एक प्लॅन  होता, तो म्हणजे अजित पवार. मग 'प्लान बी' होता, तो म्हणजे, एकनाथ शिंदे. आता त्यांच्याकडे 'प्लान सी' आहे, तो म्हणजे अशोक चव्हाण असल्याचं सांगितलं जातं. आपण अनेकदा म्हटलंय की, आपण भाजपमध्ये जात नाहीये, पण भाजपनं  आपल्याला संपर्क केलाय का? 

उत्तर : "प्लान सी' आणि आता 'प्लान आर' आता इथे उपस्थित आहे. राज ठाकरे... मला तुम्ही विचाराल, तर असा कोणताही प्लान नाहीये. मला वाटतं की, माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'प्लान सी'बाबत त्यांचं मत स्पष्ट केलं आहे. कुठलाही तसा विषय नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की, महाराष्ट्रामध्ये आम्ही राजकीय विरोधक आहोत एकमेकांचे, पण वैयक्तिक विरोध असण्याचं कारणच नाहीये. जर माझे राज ठाकरेंशी चांगले संबंध असतील त्यांचा पक्ष वेगळा, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी, माझी भूमिका वेगळी, देवेंद्र फडणवीसांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी. पण आपसांत काय आम्ही नेहमी भांडत राहावं? ही अपेक्षा चुकीची.", असं अशोक चव्हाण म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Ashok Chavan Majha Vision : भाजपच्या प्लॅन 'ए' 'बी' आणि 'सी' बद्दल अशोक चव्हाणांचं मत काय?

अशोक चव्हाणांचं राज्यासाठी व्हिजन काय? 

"विकास एक निरंतर राजकीय प्रक्रिया आहे, या मताचा मी आहे. पण तो गतीनं व्हावा, राज्य कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं असो आणि कोणीही राज्यकर्ता असो. पण महाराष्ट्र हा देशात अग्रेसर राहिला पाहिजे, हिच आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून या कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी झालो आहोत. महाराष्ट्राचा सुवर्णकाळ आपण सर्वांनी पाहिलाय. मी लहानपणापासूनच ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहिलीये. स्वर्गीय वसंतराव नाईकांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत जो कार्यकाळ तो सर्व मी पाहिलाय. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबतही मी काम केलं आहे. यासर्व राजकीय चढ उतारांमध्ये राज्यात जे काही घडलंय, तेही मी अनुभवलंय. त्यामुळे राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्र हा सदैव समोर राहिला पाहिजे. एक म्हण असायची की, हिमालयाच्या मदतीला जर कोणी गेलं असेल, तर तो महाराष्ट्र गेलाय.", असं अशोक चव्हाण म्हणाले. 

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान 15 टक्के आहे. थेट परकीय गुंतवणुकीत 31.4 टक्के योगदान राज्याचं आहे. तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 2 लाख 84 हजार रुपये आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या ही महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे विकास हा समतोल झाला पाहिजे, असं मला वाटतं. राज्यासमोरचा ज्वलंत प्रश्न म्हणजे, बेरोजगारी. 2020 ते 2021 मधील आकडेवारीनुसार, शहरी भागांत 6.5 टक्के आणि राज्याच्या ग्रामीण भागांत 2.2 टक्के आहे. त्यामुळे आपला प्राईम फोकस हाच असला पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही हेच लक्ष्य ठेवलं होतं. तसंच लक्ष्य विद्यमान सरकारच्या काळात राहील अशी अपेक्षा निश्चितच करावी लागणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. विलासराव आणि गोपीनाथ मुंडेंनंतर मराठवाड्याचा महाराष्ट्रातला आणि देशातला आवाज म्हणजे अशोक चव्हाण. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा दुर्मिळ योग चव्हाण कुटुंबाला अनुभवायला मिळाला. अत्यंत कठीण काळात महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्वही अशोक चव्हाणांनी केलं. महाविकास आघाडीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचं जाळं तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न शिवसेनेतल्या राजकीय भूकंपामुळे अपुरा राहिला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस क्षीण झालेली असताना महागाई, बेरोजगारी, मंदीचं सावट, उद्योगांची उपेक्षा अशा संकटामधून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांचं आणि पक्षाचं नेमकं काय व्हिजन आहे? नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून गेली, त्याचा पक्षातील नेत्यांना जोडण्यासाठी काय फायदा होईल? काँग्रेसमध्ये कायम टप्पा पडेल अशी भीती व्यक्त होते, त्यामागचं वास्तव काय आहे? आणि 2024 साठी पक्षाचा आणि अशोक चव्हाण यांचा रोडमॅप कसा असेल? यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी  'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात आपली मतं मांडली. 

महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'प्लान ए' अजित पवार, 'प्लान बी' एकनाथ शिंदे... आता 'प्लान सी' अशोक चव्हाण? फडणवीस म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget