एक्स्प्लोर

Mission Oxygen : मिशन ऑक्सिजन राज्याला स्वावलंबनातून स्वयंपूर्ण करणार : मुख्यमंत्री  

राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची  अंमलबजावणी करीत असून  साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.

उस्मानाबाद  : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची  अंमलबजावणी करीत असून  साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.  
 
ठाकरे म्हणाले, कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लैब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली.  पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू.  

राज्यातील विविध महानगरपालिकांना ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असेही ते म्हणाले.                                   

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ऑक्सिजन निर्मिती साठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यात पुरवठा केला जाऊ शकतो. इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.  कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल

प्रकल्पाबाबत थोडक्यात

• उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर
• ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना
• दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार
• ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून 'रामरक्षा' आंदोलनाची हाक, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच...'
उद्धव ठाकरेंकडून 'रामरक्षा' आंदोलनाची हाक, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच...'
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Raigad Rain News : रायगडमध्ये पावसाचा हाहाकार; अंबा, कुंडलिका, पाताळगंगासह उल्हास नद्यांनी ओलांडलीधोका पातळी; मुंबई-गोवा महामार्ग 7 तासांपासून ठप्प, वाचा सर्व अपडेट्स
रायगडमध्ये पावसाचा हाहाकार; अंबा, कुंडलिका, पाताळगंगासह उल्हास नद्यांनी ओलांडली धोका पातळी; मुंबई-गोवा महामार्ग 7 तासांपासून ठप्प

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget