Breaking News LIVE : पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ

Breaking News LIVE Updates, 15 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2021 09:42 PM
पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ

पिक विमा योजनेला 23 जुलैपर्यंतची मुदत वाढ. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यांनी कृषिमंत्री यांचीही याबाबत भेट घेतली होती. त्यानंतर ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

अरबीसमुद्रमध्ये कार्यरत असलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील 75 मृत कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची मदत

अरबीसमुद्रमध्ये कार्यरत असलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील 75 मृत कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची मदत, तोक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात घडली होती घटना, या चक्रीवादळामुळे 79 कामगारांचा मृत्यू झाला होता त्यापैकी 75 कामगारांची ओळख पटली, या 75 कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख असे एकूण ३ कोटी रुपयांची मदत

आज राज्यात  8,010  नवीन रुग्णांची नोंद तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त

आज राज्यात  8,010  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड

कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून अटक केली. राकेश मौर्य असं त्याचं नाव असून तो लेबर युनियनचा अध्यक्ष आहे. अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मुख्यमंत्री आणि शरद यांच्यामध्ये काय चर्चा झाली? 

  • अनिल देशमुखांपाठोपाठ खडसेंवर होत असलेल्या कारवाईवर झाली चर्चा 

  • नाना पटोले महाविकास आघाडीत अडचण निर्माण करणारी वक्तव्य करत असल्यानं नाराजी व्यक्त केली 

  • नाना पटोलेच्या स्वबळाच्या भाषेवर नाराजी 

  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कसं सामोरं जायचं? त्याची तयारी कशी करायची 

  • दिल्लीत होत असलेल्या अधिवेशानवर दोघांमध्ये चर्चा झाली 

  • कृषी कायद्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती त्याचे उमटणारे पडसाद 

  • विधानसभा अध्यक्षपद आणि मतदान प्रकिया

बीडीडीतल्या पोलीसांना 1994 च्या जीआरनं बाधित आणि निवृत्त पोलीसांना घर देण्यावर सरकारची सहमती, जितेंद्र आव्हाडांची माहिती

पोलीसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आज तातडीनं बैठक  बोलवण्यात आली होती. बीडीडीतल्या पोलीसांना 1994 च्या जीआरनं बाधित व निवृत्त पोलीसांना घरं देण्यावर सरकारची सहमती दिल्याची माहिती   जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.  बीडीडी चाळीतल्या पोलीसांचा 80 टक्के घरांचा प्रश्न सुटला, असे आव्हाड म्हणाले. पोलीसांच्या घराबाबात मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील .पोलीसांच्या हक्काच्या घरासाठी बोलवण्यात आलेली तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री आदित्य ठाकरे, म्हाडा आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वरळी नायगाव आणि डिलाईरोड मधील बीडीडी चाळींचा पुर्नविकास गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घेतल्यास याच महिन्यात  बीडीडीचं भूमिपूजन होणार असल्याचा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. 


 

मनसे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वागतासाठी गर्दी करू नका, कुठल्याही प्रकारचे पुष्पगुच्छ आणू नका, बॅनरबाजी करू नका अशा अनेक सूचना राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर 

मनसे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वागतासाठी गर्दी करू नका, कुठल्याही प्रकारचे पुष्पगुच्छ आणू नका, बॅनरबाजी करू नका अशा अनेक सूचना राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन लगत असलेल्या लक्ष्मी निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अचानक आग

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन लगत असलेल्या लक्ष्मी निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अचानक आग लागली आहे.

उद्या एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या  (16  जुलै)  दुपारी 1 वाजता  जाहीर होणार आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्सच्या व्यवस्थापकाच्या विरुध्द गुन्हा दाखल

रत्नागिरीतील खेड येथील लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्स कंपनीच्या झालेल्या स्फोटात 6 कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कंपनीचे व्यवस्थापक अमित प्रकाश जोशी यांच्यासह मिलिंद शिवराम बापट यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 18 एप्रिल रोजी श्री समर्थ इंजिनिअर्स कंपनीतील रिॲक्टर प्लांटचे तापमान वाढल्याने स्फोट झाला होता.

कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणात आणखी एक अटकेत

कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणात आणखी एकाला अटक केली आहे. दीपक खरात असं त्याचं नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी द्रुतगती मार्गावर ही कारवाई केली. खरात हा मौर्य आणि श्रीवास्तव यांच्या वसुलीची कामं करतो. सापते यांना देखील धमकावून पैसे वसूल करत होता. साक्षीदारांच्या जबाबात त्याचं नाव समोर आलं. मग त्याचा शोध सुरु झाला. तो अटकेत असणाऱ्या आरोपींना वकील देण्यासाठी पिंपरीत येणार होता. तेंव्हाच त्याला अटक करण्यात आली. याआधी सापते यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि मिस्त्री नरेश विश्वकर्मा हे दोघे अटकेत आहेत.


 


 

कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणात आणखी एक अटकेत

पुणे : कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणात आणखी एक अटकेत, दीपक खरात असं त्याचं नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी द्रुतगती मार्गावर ही कारवाई केली. खरात हा मौर्य आणि श्रीवास्तव यांच्या वसुलीची कामं करतो. सापते यांना देखील धमकावून पैसे वसूल करत होता. साक्षीदारांच्या जबाबात त्याचं नाव समोर आलं. मग त्याचा शोध सुरू झाला. तो अटकेत असणाऱ्या आरोपींना वकील देण्यासाठी पिंपरीत येणार होता. तेंव्हाच त्याला अटक करण्यात आली. याआधी सापते यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि मिस्त्री नरेश विश्वकर्मा हे दोघे अटकेत आहेत. मात्र मुख्य आरोपी लेबर युनियनचा राकेश मौर्य, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे हे तिघे अद्याप फरार आहेत. आत्महत्येला बारा दिवस उलटून ही मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती ते लागलेले नाहीत.

पालखी सोहळ्यात आज संत तुकोबांच्या पादुकांना स्नान

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज 15 वा दिवस आहे. परंपरेनुसार आजच्या दिवशी नीरा स्नान पार पडत असते. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर तुकोबांच्या पादुकांना स्नान घातलं जातं. पण कोरोनामुळं गेल्या वर्षीपासून हा सोहळा देहूच्या इंद्रायणी नदीत पार पाडला जातोय. यासाठी नीरा नदीचं घागर भरून पाणी आणलं जातं. आज हाच सोहळा देहूच्या इंद्रायणी नदीत प्रतिकात्मक पद्धतीने पार पडला. यावेळी मुख्य मंदिर ते इंद्रायणी नदी घाट दरम्यान रंगीबेरंगी फुलांनी पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असूनही शेतकऱ्यांची पाठ

पीकविमा काढण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदाही प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली. पण, हा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह नसल्याचं दिसून येतंय.  कालपर्यंत राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत फक्त जेमतेम 20 टक्के पीकविमा काढण्यात आला. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उर्वरित 80 टक्के पिकांचं उद्दिष्ट गाठण्याचं मोठं आव्हान शासकीय यंत्रणेसमोर आहे. गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या तिघांचं मिळून कोटीत प्रीमियम घेतलं पण नुकसान भरपाई मात्र लाखांमध्ये दिली. त्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमधील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांना इच्छा असूनही पीकविमा काढता आलेला नाही. त्यामुळे पीकविमा काढण्याची मुदत वाढवण्याची मागणी शेतकतऱ्यांकडून होतेय. त्यामुळे बळीराजानं पीकविम्याकडे पाठ का फिरवली, असा प्रश्न विचारला जातोय.

तळकोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू

मागील 3 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीतल्या अनेक नद्यांना पूर आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निर्मला नदीला पूर आल्यानं 27 गावांचा संपर्क तुटलाय. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. आजही सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीए. दरम्यान, राज्यभरात 1 ते 12 जुलैदरम्यान 360 मिमी पावसाची नोंद झालीय.

कोविडमुक्त झालेल्या गावात आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु

राज्यात अखेरीस शाळा भरण्याची घंटा वाजणार आहे. कारण राज्यातल्या कोविडमुक्त भगाात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा आजपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करताना सरकारनं नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचं पालन करणं शाळांना बंधनकारक असणार आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर देण्यात आल्या आहेत. तसंच शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन नियोजन करावं असे आदेश शिक्षण विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्यानं विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं अशा सूचनाही शिक्षण विभागानं दिल्या आहेत. 

अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत, वकिलांची माहिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले असले तरी त्या चौकशीसाठी जाणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिलीय. याआधी अनिल देशमुख यांनी ईडीचं समन्स आल्यानंतर चौकशीसाठी जाणं टाळलं आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशमुख यांनी ऑनलाईन चौकशी करण्याची मागणी केली आहे. ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावलं आहे. 

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या  24 तासात सरासरी 41 मिमी पावसाची नोंद झाली असून गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आलेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

तळकोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. तिलारी खोऱ्यातील अनेक काजवे पाण्याखाली गेले असून पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.

अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन 

अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते.


 

पार्श्वभूमी

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातील चर्चांना शरद पवार यांचं उत्तर
 निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बातम्या चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी आज (बुधवारी) स्पष्ट केलं. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल हे सर्वांनाच माहिती आहे. कारण, समोर 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.


आदित्य ठाकरेंचा निर्णयांचा धडाका; आता साहसी पर्यटन धोरणास मान्यता, काय आहे पर्यटन धोरण?
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल. या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील.


गणेशोत्सवासाठी कोकणात 2200 बसेस सोडणार, 16 जुलैपासून आरक्षण सुरु; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या नागकांसाठी विशेष ट्रेन्स आणि बस गणेशोत्सवादरम्यान सोडल्या जातात. यावर्षीही गणपती उत्सवासाठी कोकणात राज्य परिवहन महामंडळाच्या 2200 बसेस सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना 2200 बसेस सोडल्या जाणार असून त्यासाठी 16 जुलैपासून आरक्षण सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. 


नाशकात विवाहसोहळ्याला 'लव्ह जिहाद'चा रंग; जातपंचायतीच्या दबावामुळे लग्न रद्द झाल्याचा अंनिसचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खरं तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता, मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार जातपंचायतीच्या दबावामुळे झाल्याचा आरोप करत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.