Breaking News LIVE : कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा एक कोटीचा निधी

Breaking News LIVE Updates, 17 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Apr 2021 06:50 AM
कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा एक कोटीचा निधी

कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कालच वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदारांना स्थानिक विकास निधीतले 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना भेटून एक कोटीचा निधी वळता करण्याचे पत्र दिले. विशेष म्हणजे चंद्रपूर मनपा ही भाजपच्या ताब्यात आहे आणि जोरगेवार हे भाजपविरोधात निवडणूक लढवून आमदार झाले आहे. 

भंडारा शहरातील सर्व किराणा दुकाने 17 ते 20 एप्रिलपर्यंत बंद

भंडारा जिल्ह्यात विशेषत:  भंडारा शहरात कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवता यावे आणि किराणा व्यावसायिक आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी भंडारा किराणा अँड जनरल असोसिएशनची महत्वाची बैठक शुक्रवारी पार पडली आहे,  भंडारा किराणा अँड जनरल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज संघानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने 17 ते 20 एप्रिलपर्यंत भंडारा शहरातील सर्व किराणा दुकाने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे

आशेचा किरण! औष्णिक उर्जा प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती शक्य

ऑक्सिजन मिळवण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार, उर्जामंत्री नितीन राऊत यांचा वृत्ताला दिलासा. औष्णिक उर्जा प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती शक्य. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची एबीपी माझाला माहिती. 

सोलापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सोलापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याची कारवाई. जवळपास 70 ते 80 लोकांना ताब्यात घेऊन केली दंडात्मक कारवाई. सकाळी मॉर्निंग वॉक आणि नंतर इतर कारणांनी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद. बारामतीत चौघांना अटक. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीत पॅरासिटामोलचं औषध भरत असल्याची धक्कादायक बाब उघड

कोरोना पार्श्नवभूमीवर वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी संवाद

कोरोना पार्श्नवभूमीवर वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी संवाद. हाफकिनची लस निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी. हाफकिनमध्ये लस निर्मिती होऊन ती वापरात येण्यात साधारण वर्षभराचा कालावधी जाणार. अमित देशमुख यांच्याशी झालेल्या संवादातून माहिती उघड.  

राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अमित देशमुख यांचं महत्त्वाचं वक्तव्य

गोंदियात ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू, सदर प्रकरणाची चौकशी करणार- अमित देशमुख 

राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अमित देशमुख यांचं महत्त्वाचं वक्तव्य

गोंदियात ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू, सदर प्रकरणाची चौकशी करणार- अमित देशमुख 

नागपूर आणि विदर्भावर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत अन्याय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

महाराष्ट्र सरकारने जरी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपाबद्दल एक निश्चित धोरण आखले असले, तरी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मातब्बर मंत्री त्यांच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य साहित्याचा जास्त पुरवठा घेऊन जात आहेत. त्या तुलनेत नागपूर आणि विदर्भात आवश्यकता असताना ही रेमडेसिवीर इंजेक्शनचा हवा तसा पुरवठा होत नसल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार

देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत . लसीकरण सुरु असलं तरी इतर सोयीसुविधांचा तुटवडा आहे . यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे . कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू - संतांना संसर्ग झाला आहे . निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आखाड्याच्या १७ संतांसह ५० पेक्षा जास्त संतांना कोरोना झाला आहे . अजून २०० संतांच्या चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे .

पोटनिवडणूक मतदान केंद्रांवर कोरोनाचं सावट, पहिल्या तासात अवघं 7 टक्के मतदान

पंढरपूर येथे पार पडत असणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. पण, सध्या मतदान केंद्रांवरही कोरोनाचं सावट दिसून येत आहे. कारण, इथं अवघ्या पहिल्या तासात अवघं 7 टक्के मतदान 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ, दहा उमेदवार रिंगणात

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला असून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली नाही. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांनी आपल्या दोन्ही मुलींसह सदाशिव नगर येथील मतदान केंद्रात मतदान केले. आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 2566 मतदान केंद्रे असून दहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपतर्फे मंगला अंगडी, काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके यांच्यातच खरी लढत आहे. 18 लाख 13 हजार 567 मतदार लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दौंडमधील पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून 1 गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि 1 तलवार जप्त

दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून 1 गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि 1 तलवार जप्त करण्यात आली आहे. धनाजी मारुती माकर असं ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे ग्रामीण पथकाने केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 3,4,25 प्रमाणे कारवाई करण्यात आली. जप्त मुद्देमाल आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन त्याला यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं आहे.

सोयाबीनला आजपर्यंतचा विक्रमी दर

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सुगीचे दिवस आलेत.आत्तापर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनला 7 हजार 71 रूपये विक्रमी दर मिळाला आहे.तर सोयाबीन सोबत पांढऱ्या तुरीला  7 हजार 140 रूपये भाव मिळाला आहे. त्यामुळे लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजची आवक वाढली आहे. आगामी काळात जर सोयाबीनचे दर असेच चढे राहीले तर सोयाबीन उत्पादक आणि तुर उत्पादन शेतकऱ्यांना नक्कीच अच्छे दिन येणार आहेत.

प्रसिद्ध युवा शिवकथाकार सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

नागपूरचे प्रसिद्ध युवा शिवकथाकार सुमंत टेकाडे यांचे कोरोना मुळे निधन झालं आहे. ते 40 वर्षांचे होते. सुमंत टेकाडे विविध कंपन्यांमध्ये शिवकालीन व्यवस्थापन पद्धतीवर व्याख्यान द्यायचे.

पश्चिम बंगालमध्ये पाचव्या सत्रातील मतदानास सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये पाचव्या सत्रातील मतदानास सुरुवात, 45 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 342 उमेदवारांचं भविष्य ठरवणार मतदार 

पंढरपूर आणि बेळगावमध्ये आज पोटनिवडणुकांसाठी मतदान

राज्यात दर दिवशी कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच पंढरपूर आणि बेळगाव या भागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांत आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

पार्श्वभूमी

पंढरपूर, बेळगावमध्ये कोरोना संकटातच पोटनिवडणुकांसाठी आज मतदान


दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी हे मतदान होत असून प्रमुख लढत भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच होत आहे. राज्यात दर दिवशी कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच पंढरपूर आणि बेळगाव या भागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांत आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर


राज्यातच नाही तर देशात सध्या दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वेगाने वाढत आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचा एक फॅक्टर समोर आलाय तो म्हणजे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात रुग्ण यायला नको. असे असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. 


मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला यात पहिल्यांदा रुग्ण आढळल्यानंतर थेट रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आणि यात लक्षण असलेले आणि लक्षण नसलेले अशी वर्गवारी करण्यात आली. त्यातही रुग्णालय फुल्ल झाल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय समोर आला. मात्र यासाठी अनेक नियम घालून देण्यात आले होते. परंतु या नियमांचे दुसऱ्या टप्प्यात मात्र पालन होत नाही.


ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना


 राज्यात दिवसेंदिवस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने  कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.  राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान या परिस्थितीत  या सर्वांची माल वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. राज्यांतर्गत तपासणी नाक्यांवर वाहतूक, परिवहन आणि पोलिस प्रशासनाकडून मालवाहतूक वाहनांच्या चालकांची आणि मालकांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या बाल मल्कित सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.