एक्स्प्लोर

भाजपला सत्तेची सूज, ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, म्हणाले भाजपला आभास निर्माण करण्याचा रोग

भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी केलं.

Bhaskar Jadhav : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray ) हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत. मात्र, भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी केलं.  घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत असल्याचे जाधव म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुका 54 टक्के मतं या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीची सर्वे आहे करतो. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.  नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकतीचा आम्हाला अंदाज आहे. हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. यापूर्वी आम्हाला योग्य स्थान संधी मिळाली नाही. आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहे..योग्य संधी मिळाली ते करिष्मा करून दाखवतील. आज बैठकीत आढावा घेऊ,  सहा महिन्यापूर्वी सुद्धा 151 जागेचा आढावा घेतला आहे. वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊ त्याचा आढावा पुढे देऊ असे जाधव म्हणाले. 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळालं आहे, तरी ते एकत्र लढत आहेत. त्यामुळं आम्ही आघाडी करुन एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महा विकास आघाडीला फायदा होईल असे भास्कर जाधव म्हणाले. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मात ही पद्धत आहे की वाढदिवस असल्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. राज ठाकरे यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काल आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. पण अहमदाबादला जी दुर्घटना झाली त्यामुळं वाढदिवस साजरा केला नाही असे भास्कर जाधव म्हणाले. 

भाजपला सत्तेची सूज, दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा केला 

शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या मुद्यावर देखील भास्कर जाधव यांना विचारण्यात आले. यावेळी जाधव म्हणाले की, विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदाराबद्दल अफवा पसरवणे आणि भाजपबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलं असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष होऊन, त्यांचा विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करु शकले नाहीत, हा त्यांचा पराभव आहे याचा विसर विसर पडला असल्याची टीका जाधव यांनी केली. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत आहे. ही सत्तेची आलेली ही सूज आहे .सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल अस जाधव म्हणाले. 

संघाच्या मुशीत भाजप नेतृत्व तयार झाल आहे. राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे. त्यांच्या संघाचा शाखेच हे अपयश आहे, पर्यायाने भाजपचे हे अपयश आहे. संघ हा नेहमीभाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्व पक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचं. राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे, ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरिता पाहिजे होता. आता ते तीन झालेले आहे. (अडाणी) पण भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही असे जाद म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Violence : सामाजिक तेढ वाढवणाऱ्या नितेश राणेंचा बोलविता धनी कोण? नागपूरच्या दंगलीनंतर भास्कर जाधवांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget