एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर

बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्याने नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुतळयाचे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी लोकार्पण होण्याची शक्यता नाही. मात्र बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता पुढील परवानगी घेऊन पुतळा लवकरच उभारला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर 2012 रोजी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या समोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 रोजी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटी, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन, तसेच राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. याच दरम्यान पुतळा उभारण्यासाठी जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस इमारतीसमोरील चौकात बसवावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनवण्यात आला. त्यावर चौकात आणि दुभाजकाच्या जागी पुतळा उभारता येत नाही. पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून पालिका सभागृहाची परवानगी आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. त्याप्रमाणे आज पालिका सभागृहात विशेष बाब म्हणून बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याबाबत बोलताना आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आजपासून खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच राज्य शासन, कला संचालक महाराष्ट्र राज्य (सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्) यांचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रमुख वास्तूविशारद महाराष्ट्र शासन, पोलीस आयुक्त वाहतूक, कार्यकारी अभियंता वाहतूक व समन्वय यांचे ना हरकत प्रमाणपत्र, हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी यांची परवानगी घेतली जाईल. या विभागांची परवानगी मिळताच पुतळ्याचे अनावरण केले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
Embed widget