शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयांचा थकीत एफआरपी मिळावा यासाठी परांडा, जामखेड, करमाळा आणि फलटण येथील 96 शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी संघटनेने हायकोर्टात धाव घेतली होती.
2014-15 मधील शेतकऱ्यांचे 38 कोटी 25 लाख रुपयांचा एफआरपी थकवल्याप्रकरणी साईकृपा साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थकीत रक्कम देण्याचं आश्वासन कारखान्यातर्फे देण्यात आलं होतं. मात्र ते न पाळल्याने आता साईकृपा कारखान्याच्या जप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.