एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामींचा मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज, अन्वय नाईक प्रकरणातील आरोपपत्राला विरोध

रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या 1914 पानी आरोपपत्रात रायगड पोलीसांकडून एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या प्रकरणात रायगड पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची तूर्तास दखल न घेण्याचे निर्देश अलिबाग सत्र न्यायालयाला जारी करण्यात यावेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत याप्रकरणाची चौकशी तसेच पोलिसांच्या पुढील तपासप्रक्रियेवरही तुर्तास बंदी आणावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान अलिबाग न्यायालयात याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोझ शेख आणि नितेश सारडा यांनीही आपले जामीन अर्ज शनिवारी मागे घेतले. अर्णब गोस्वामी यांनी यापूर्वीच आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेलाही विरोध दर्शवला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्यानं तूर्तास इथं सुनावणी घेऊ नये अशी विनंती आरोपींच्यावतीनं कोर्टाकडे करण्यात आली. त्यानुसार अलिबाग सत्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 19 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

साल 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने अलिबागमधील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाईक यांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी फेरतपासाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याने रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांना मुंबईतून अटकही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गोस्वामी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget