एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामींचा मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज, अन्वय नाईक प्रकरणातील आरोपपत्राला विरोध

रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या 1914 पानी आरोपपत्रात रायगड पोलीसांकडून एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या प्रकरणात रायगड पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची तूर्तास दखल न घेण्याचे निर्देश अलिबाग सत्र न्यायालयाला जारी करण्यात यावेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत याप्रकरणाची चौकशी तसेच पोलिसांच्या पुढील तपासप्रक्रियेवरही तुर्तास बंदी आणावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान अलिबाग न्यायालयात याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोझ शेख आणि नितेश सारडा यांनीही आपले जामीन अर्ज शनिवारी मागे घेतले. अर्णब गोस्वामी यांनी यापूर्वीच आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेलाही विरोध दर्शवला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्यानं तूर्तास इथं सुनावणी घेऊ नये अशी विनंती आरोपींच्यावतीनं कोर्टाकडे करण्यात आली. त्यानुसार अलिबाग सत्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 19 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

साल 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने अलिबागमधील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाईक यांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी फेरतपासाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याने रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांना मुंबईतून अटकही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गोस्वामी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Embed widget