एक्स्प्लोर
आम्ही कधी सत्तेची नशा डोक्यात जाऊ दिली नाही : अजित पवार
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या झालेल्या गोंधळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

बारामती : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या झालेल्या गोंधळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय सत्ता ही सोज्वळपणे सांभाळायची असते, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. बारामती तालुक्यातील मेडद येथे खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनच्या भूमीपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ''आपल्याकडे सगळी सत्ता होती. केंद्राची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची सत्ता होती. सर्व कारखाने ताब्यात होते, पण कधी आपण सत्तेचा गैरवापर केला नाही, सत्तेची मस्ती, नशा, धुंदी आपण कधी डोक्यामध्ये येऊ दिली नाही, असं अजित पवार म्हणाले. ''सत्ता सोज्वळपणे सांभाळायची असते आणि विरोध असला तरी त्याला योग्य पद्धतीने तोंड द्यायचं असतं,'' असं म्हणत अजित पवार यांनी भाजप सरकारला कानपिचक्या घेतल्या. काय आहे पालघरमधील गोंधळ? राज्यात आज पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. निवडणूक आयोगाने काही मशिन दुरुस्त केल्या, तर काही ठिकाणी मशिन वेळेत दुरुस्त न झाल्यामुळे मतदार वाट पाहून मतदान न करताच माघारी परतले.
Before You Go
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















