एक्स्प्लोर

Ajit Pawar In Pune: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही मालक असल्यासारखं वागतात: अजित पवार

मंत्री जर नेमले असते तर राज्यातील 36 जिल्ह्यात काम सुरू झालं असतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही मालक असल्या सारखं वागत आहेत, असं मी म्हणतो मात्र ते स्वत:ला सेवक म्हणतात.

Ajit Pawar In Pune: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यात तुफान पाऊस सुरु आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचं या पावसामुळं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत व्हायला हवी. मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर आपल्या क्षेत्रात सगळ्यांनी कामं सुरु केली असती, असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.


सहकाराच्या निवडणुकांना सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. मी आत्ताच या निवडणुकीची सभा घेऊन आलो. 17 जुलैला तिथं मतदान होणार होतं, पण आता निवडणूक स्थगित केली. आपण लोकशाही माणनारे आहे. घटनेनुसार सगळीकडे कामकाज सुरु आहे. कोणावर अन्याय होऊ नये यासाठी घटना काढली आहे. मात्र आता लोकशाहीची थट्टा सुरु आहे. चेष्टा सुरु आहे, असंही ते म्हणाले.

मंत्री जर नेमले असते, तर राज्यातील 36 जिल्ह्यात काम सुरू झालं असतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही मालक असल्या सारखं वागत आहेत, असं मी म्हणतो मात्र ते स्वत:ला सेवक म्हणतात. चाळीस जणांना सोबत घ्या. त्यांचाही सन्मान ठेवा. संपुर्ण निर्णय त्यांचा आहे. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना घालवलं. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मला तुम्ही तीस वर्षांपासून ओळखता, मी थोडं कडक वागतो पण कोणावर अन्याय करत नाही, असंही ते म्हणाले.

जनतेतून सरपंच-नगराध्यक्ष निवडून येणार असा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपतींना, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इथं जनता ठरवते का? मग सरपंच - नगराध्यक्षाच्या मागे का लागलाय?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


शिंदे गटाबरोबर असलेले बरेचजण म्हणत होते की शिवसेनेचे मंत्री पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. आशिष जयस्वालही असं म्हणाले. पंधरा दिवसात काय चमत्कार झाला की तुम्हाला तेच मंत्री आता चांगले वाटू लागले. म्हणजे कुठं तरी पाणी मुरतंय, काय तरी गडबड झाली आहे. हे त्रिवार सत्य आहे आणि हे जनतेच्या ही लक्षात येतंय. जनता दूध खुळी नाही. मी पण हे अधिवेशनात त्यांना विचारणार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

आगामी निवडणुकीत महाविकासआघाडी कायम राहणार

महाविकासआघाडी कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर सगळे निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवरहीआघाडी बाबत ठरवायचे आहे. पक्षाच्या ताकतीनुसार समोरचे निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget