एक्स्प्लोर
Advertisement
मतदार भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील : अजित पवार
‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली.
कराड : ‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
'शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे सत्तेत बसायचं, दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही ऐवढी दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असं काही समजण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्रातील जनता प्रचंड हुशार आहे. आम्ही कसं वागतो, काय बोलतो याकडे अतिशय बारकाईनं लक्ष देतात. त्यामुळे निवडणुकीत कुठं बटण दाबायचं तिथं ते बरोबर दाबतात. शिवसेनेला सत्तेची ऊबही हवी आहे आणि विरोधकांची स्पेस देखील. सगळंच आधाशासारखं घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.' अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतीस्थळांचं सत्ताधाऱ्यांसह अनेक नेत्यांनी दर्शन घेतलं. यावेळी अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपच्या धोरणावर टीका केली.
VIDEO:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement