Bogus Seed : गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. मात्र, त्यातून सावरत शेतकऱ्याने यंदा पुन्हा मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी केली. पण, अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच राज्यभरातून बोगस बियाणांच्या तक्रारी येत असल्याने खळबळ उडाली आहे. मराठवाड्यासह राज्यभरात बोगस बियाणांच्या आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर आलेल्या एकूण तक्रारींपैकी 927 पंचनामे झाले आहेत. यात बहुतांश तक्रारी कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या आहेत. 

शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना दरवर्षी समोर येत असतात. मात्र, थातूरमातूर कारवाई केल्या जात असल्याने हे प्रकार वाढत चालले आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी करतो. पेरणी केल्यावर चांगले पीक येईल आणि उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक केली जाते. राज्यात अशा बोगस बियाणांच्या 1 हजार 85 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ज्यात सर्वाधिक 200 तक्रारी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. 

जिल्हा  दाखल गुन्हे  तक्रारी  पंचनामे  
अकोला  00  60  54 
अमरावती  04  118  118 
बुलढाणा  01  43  43 
यवतमाळ  02  01  01 
नागपूर  00 01 01
भंडारा   00 02 01
चंद्रपूर  12 46 46
गडचिरोली  01 03 03
वर्धा  03  00 00
गोंदिया  02  00 00
औरंगाबाद  00 199 196
जालना  01 78 75
बीड  00 115 86
लातूर  00 200 193
उस्मानाबाद  00 37 35
नांदेड  03 43 00
परभणी  03 10 10
हिंगोली  00 88 88
जळगाव  10 00 00
धुळे  03 00 00
नाशिक  01 03 03
अहमदनगर  00 199 135
नंदूरबार  02 00 00
सातारा  02 00 00
सोलापूर  00 03 00

आतापर्यंत अशी झाली कारवाई?

राज्यात बोगस बियाणाच्या ताकारी येत असतानाच कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहे. तर बोगस बियाणेविरोधात कारवाईला देखील सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत प्रतिबंधित एचबीटी कपाशीचे 3 हजार 799 पाकिटे जप्त करण्यात आले आहेत. तर 885 कांदा बियाणे पाकीट, सोयाबीनचे 5 हजार 264 पाकीट जप्त करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 हजार 88 पंचनामे करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका; लातूर, बीड, उस्मानाबादसह औरंगाबादच्या बळीराजावर दुबार पेरणीचे संकट