एक्स्प्लोर

Aaditya Thackeray in Kolhapur : आदित्य ठाकरे यांचे कोल्हापुरात थेट शिवसैनिकांमध्ये मिसळून भाषण! बंडखोरांवर कडाडून हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे.

Aaditya Thackeray in Kolhapur : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचे आजरा तालुक्यात जल्लोषी स्वागत करण्यात आल्यानंतर  आले. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच हल्ला चढवला. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे असतील,  आम्हाला एकटे पाडायचं असेल किंवा ठाकरे परिवार संपवायचा असेल, पण कधीच शक्य नसल्याचे आदित्य यांनी निक्षून सांगितले. आदित्य यांनीस्टेजवरून उतरून भाषण केल्याने शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला.    

तत्पूर्वी, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा, फडफडणारा भगवा ध्वज आणि स्वागताला 40 फुटी हार अशा जल्लोष वातावरणात आदित्य ठाकरे यांच कोल्हापूर शहरातील खरी कॉर्नर येथील शहर शिवसेना कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी ठाकरे यांचे 40 फूट हार घालून स्वागत करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणत केली. आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी थेट स्टेजवरून खाली उतरून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये माझं जोरदार स्वागत झालं. हे गद्दार आहेत आणि गद्दारच आहेत, त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा, त्यांची भूक काही भागलेली नाही. त्यांची भूक वाढतच चालली आहे. माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा द्वेष नाही. मी कुठल्याही प्रकारे चोरी केलेली नाही. गद्दारी केलेली नाही, त्यामुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे. ते म्हणाले की, मी समजू शकतो तुम्ही का गेला आहात, तुमच्यावर दबाव पण असू शकतो.

हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामा द्या

ते पुढे म्हणाले की, गद्दारी करून गेलाच आहात, तर तुम्ही आनंदी राहा, सुखी राहा पण तुमच्या हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीला सामोरे जाण्याची तुमची हिंमत आहे का? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आपल्या हिंदुस्थानामध्ये सत्यमेव जयते म्हटले जाते, सत्तामेव जयते नाही.

आदित्य ठाकरे गद्दारांमध्ये दोन गट असल्याचे ते म्हणाले. एका गटामध्ये सत्तेची भूक आहे, गद्दारी आहे, राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, तर दुसर्‍या बाजूला फसवून नेले आहेत असे ते यावेळी म्हणाले. जर त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसला असं वाटत असेल तर तुमच्यासाठी आजही मातोश्री दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आपले कुटुंबप्रमुख आहेत असे प्रत्येकाला वाटत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच सहाशे कोटीचा निधी रायगडला दिला.त्यानंतर शेवटचा निर्णय औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे सर्व होत असतानाच त्यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोठेही जातीमध्ये दंगली घडल्या नाहीत. कुठे वाद निर्माण झाले नाहीत. असे मुख्यमंत्री सर्वांना सोबत घेऊन जाणारे होते. उद्धव ठाकरे असेच मोठे होत गेले, तर आपले काय होणार अशी भीती या लोकांना सतावू लागली होती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

 
 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
Thane Politics : टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Kailas Patil on Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेचं समर्थन की विरोध? कैलास पाटलांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेचं समर्थन की विरोध? कैलास पाटलांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून 15 टक्के पाणी कपात लागू, पवना धरणाने गाठला तळ
पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून 15 टक्के पाणी कपात लागू, पवना धरणाने गाठला तळ
Kolkata Red Road Yoga:कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार
कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार
MK Stalin on Rahul Gandhi: 'तेव्हा विचारांचा भाऊ ते आता फक्त...' अवघ्या काही दिवसांत सर्व काही बदललं! स्टॅलिन यांनी राहुल गांधींना दिलेल्या शुभेच्छांनी भूवया उंचावल्या, मात्र त्याचवेळी सीएम थलापती विजय यांनी टायमिंग साधली
'तेव्हा विचारांचा भाऊ ते आता फक्त...' अवघ्या काही दिवसांत सर्व काही बदललं! स्टॅलिन यांनी राहुल गांधींना दिलेल्या शुभेच्छांनी भूवया उंचावल्या, मात्र त्याचवेळी सीएम थलापती विजय यांनी टायमिंग साधली
Ramdas Kadam on Operation Tiger: उद्धवजी हे लोकं तुम्हाला फसवतायत, सातवा खासदारही फुटलाय, तो मंत्रिपद मागत होता; रामदास कदमांचा सनसनाटी दावा
उद्धवजी हे लोकं तुम्हाला फसवतायत, सातवा खासदारही फुटलाय, तो मंत्रिपद मागत होता; रामदास कदमांचा सनसनाटी दावा
Uday Samant on Operation Tiger: सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच उदय सामंतांच मोठं वक्तव्य
सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच उदय सामंतांच मोठं वक्तव्य
Embed widget