UP Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन 50 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.


हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना


उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिथे ही चेंगराचेंगरी झाली तिथे सत्संग सुरु होता. ही घटना हाथरसच्या रतिभानपूर भागातील असल्याची माहिती आहे. भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे.






जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश


उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, त्यात 23 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एटा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी केली आहे. दरम्यान, मृतांमध्ये दोन पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.


50 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी






ही घटना एका धार्मिक सत्संगादरम्यान घडली, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमीही झाले आहेत. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.