पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’मध्ये बोलताना म्हणाले, “ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांना भारत सरकारने एक संधी दिली आहे की, आपली अघोषित संपत्ती 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी. अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी विशेष सुविधाही सरकारने सादर केली आहे. ठराविक दंड भरुन काळ्या पैशाच्या संकटातून मुक्त होऊ शकता.”
“जे लोक आपल्याकडील काळा पैसा स्वत:हून जाहीर करतील, त्यांना कोणत्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, हे माझं वचन आहे. एवढी संपत्ती कुठून आली, कशी आली, याबाबत विचारलंही जाणार नाही. त्यामुळे हीच मोठी संधी असून, पारदर्शक कारभाराचा भाग बना.”, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.