नवी दिल्ली : मी अरुण जेटलींपेक्षा उत्तम अर्थमंत्री बनू शकतो असा विश्वास भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. मी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि ते वकील, मग ते माझ्यापेक्षा उत्कृष्ट कसे असू शकतील असा सवाल त्यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


गेल्या काही महिन्यात जेटली आणि स्वामींमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यावर बोलताना उत्तरेचे ब्राह्मण आणि दक्षिणेचे ब्राम्हण यांच्यात फार पूर्वीपासून वैर असल्याचा टोला त्यांनी लगावला.

तुमच्या बोलण्यावर भाजपनं बंधनं घातलीयेत का या प्रश्नावर तुम्ही माझ्यापेक्षा जेटलींशीच जास्त बोलता ही खरी समस्या असल्याचं उत्तर त्यांनी दिलं.