एक्स्प्लोर

'नोटाबंदीच्या निर्णयानं आर्थिक यादवी', सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई: 'मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतो, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे.' अशी जोरदार टीका  शिवसेननं आपलं मुखपत्र सामनातून केली आहे. 'देशातला काळा पैसा, बेहिशेबी संपत्ती खतम व्हायलाच पाहिजे! काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. पण मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक यादवी आली आहे', असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून या निर्णयावर सडकून टीका करण्यात आली आहे. एक नजर सामनाच्या अग्रलेखावर: १२५ कोटी जनता गारद * काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतोय, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय? * पंतप्रधान मोदी यांनी जपानच्या भूमीवरून जाहीर केले आहे की, ३० डिसेंबरनंतर ते आणखी एक जोरदार धमाका करणार आहेत. पाचशे-हजारच्या नोटा अचानक रद्द करून त्यांनी हिंदुस्थानच्या सवाशे कोटी जनतेवर आर्थिक अराजकाचा बॉम्ब आधीच टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात विव्हळणार्यान जनतेला सॅल्यूट करीत त्यांनी सांगितले की, ३० डिसेंबरनंतर आणखी एक धमाका करू! बहुधा पंतप्रधान पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून दहशतवादाचा कारखाना दाऊदसह बेचिराख करण्याच्या विचारात असावेत. नाही तरी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच सांगून टाकले आहे की, पाकिस्तानवर आम्ही अणुबॉम्ब टाकू. बहुधा हाच धमाका ३० डिसेंबरनंतर होईल. * अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार व्हायला आता फक्त २०-२५ दिवसांचा अवकाश आहे असे देशातील जनतेने समजायला हरकत नाही. ज्याप्रमाणे एका रात्रीत पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचे सिक्रेट मिशन मोदी यांनी तडीस नेले त्याचप्रमाणे ३० डिसेंबरनंतर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याची घोषणा होईल. कश्मीरातील ३७० कलम हटवून ‘एक राष्ट्र, एक निशाण’चे स्वप्न साकार होईल. ३० डिसेंबरच्या मध्यरात्री अयोध्येत राममंदिर उभारणीच्या घोषणेचा धमाकाही होऊ शकतो. देशवासीयांनी ३० डिसेंबरनंतरच्या या धमाक्याची वाट पाहायला हवी. * पाचशे-हजारच्या नोटा एका क्षणात रद्द केल्याने जनता त्यांना आशीर्वाद देत आहे. मोदीजी, जनतेचे आशीर्वाद इतके स्वस्त आहेत काय? दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड जनतेला असे रस्त्यावर आणून केली काय? हा सरळ सरळ विश्वासघात आहे. मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले. अन्नपाण्याशिवाय उन्हात तडफडायला व मरायला लावले. काळा पैसा संपविण्यासाठी केलेला हा प्रयोग अघोरी आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. * देशातला काळा पैसा सवाशे कोटी मध्यमवर्गीयांकडे नसून देशाच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत अशा १२५ घराण्यांकडे व राजकारण्यांकडे आहे. यापैकी किती लोक हजार-पाचशेच्या नोटांची बंडले घेऊन रांगेत उभे आहेत? त्यांचा पैसा परदेशी बँकांत सुरक्षित आहे व मोदी यांचा निर्णय होण्याआधीच या पैशाला परदेशाचे पाय फुटले असतील तर या लोकांवर काय कारवाई झाली? २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड काळा पैसा फिरवला आणि जिरवला गेला त्याचा हिशेबही आता द्यावाच लागेल. पंतप्रधान मोदी देशात कमी आणि परदेशातच जास्त फिरतात अशी टीका त्यांचे विरोधक करतात. आताही मोदी जपानलाच होते. पंतप्रधान परदेशात सतत फिरतात ते जनतेच्या कष्टाच्या पैशांवर आणि त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहून नोटा बदलाव्या लागलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. * लोकांना स्वत:च्या हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी चार-चार दिवस झगडावे लागत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होईल. देशातील वातावरण असे संवेदनशील झाले आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की, आणखी दोन-तीन आठवडे परिस्थिती पूर्ववत होण्यास लागतील. त्यांनी असेही सांगितले की, घाबरू नका, नव्या नोटा भरपूर आहेत. मात्र हे झूठ आहे. फक्त दोन हजारांसाठी लोकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. खून, मारामार्याग, चोर्यां चे प्रमाण वाढले आहे व यालाच यादवी म्हणतात. देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. मूठभर लोकांच्या हातात आजही देशाची आर्थिक सत्ता कायम आहे. त्यांच्या मुठीत गुदमरलेला देश कधी मुक्त होणार? उद्याच्या निवडणुका त्याच मूठभर लोकांच्या पैशांवर पुन्हा लढवल्या जातील व सत्ता मिळवली जाईल. त्यांना आजही पूर्ण संरक्षण रोकड्यात आहे, पण गरीब जनता, मजूर, शेतकरी हवालदिल होऊन रस्त्यांवर आहे. * पंतप्रधानांनी त्यांचा आक्रोश समजून घ्यावा. भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काळा पैसा हा कॅन्सर आहे. त्याने देश पोखरला जात आहे हे खरेच, पण आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय? संबंधित बातम्या: सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ 500-1000च्या जुन्या नोटांचं आरबीआय करणार तरी काय? बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते! बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

महत्त्वाच्या बातम्या

boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Patil: 'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती
NSE IPO: NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Embed widget