मुंबई: लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या खांद्यावर ब्रिटनची धुरा आली आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानंतर आता ऋषी सुनक यांच्याकडे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आली आहे. ऋषी सुनक हे पहिलेच भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती आहेत जे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. 


ऋषी सुनक यांच्या या यशाचे आता सर्वत्र कौतुक केलं होतं आहे. पण त्यांच्या कुटुंबासंबंधी आणि त्यांच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला या मूळ गावासंबंधी अनेकांना माहिती नसेल. ऋषी सुनक यांच्या कुटुंबाला फाळणीचा फटका बसला असून त्यांच्या आजोबांना अलिशान जीवनशैली आणि सर्व संपत्ती सोडून पाकिस्तानमधून स्थलांतरित व्हावं लागलं होतं. 


कसं आहे ऋषी सुनक यांचं मूळ गाव? 
गुजरानवाला या गावाबद्दल सांगायचं तर ते पहिलवान लोकांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या गावाची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. लाहोरपासून दीड तासाच्या अंतरावर हे गाव वसलं आहे. या गावाला एकूण सात मार्गाने प्रवेश करता येतो. भारत-पाकिस्तान फाळणीच्या आधी ऋषी सुनक यांचे आजोबा या गावात रहायचे. फाळणीच्या काळात झालेल्या दंगलीमुळे त्यांना हे गाव सोडून जावं लागलं होतं.


या गावाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी एबीपी न्यूजची एक टीम या गावात पोहोचली. ऋषी सुनक यांचे आजोबा कुठे रहायचे, त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली कशी होती, फाळणीच्या वेळी या गावातील परिस्थिती कशी होती यासंबंधी एबीपीने माहिती गोळा केली. 
 
फाळणीचा अनुभव घेतलंलं गाव
गुजरानवाला हे एक गाव कम छोटं शहर आहे. या गावात लोकसंख्या  बऱ्यापैकी आहे, या गावात कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच इतर अनेक दुकानं आहेत. या गावात हिंदू मंदिरं, त्यांची घरं, शीख गुरुद्वारा, 100 वर्षांहून अधिक जुनी निर्जन घरे विखुरलेली आहेत. अनेक घरं ही मोडकळीस आली असली तरी गर्दीच्या या ठिकाणी ते उठून आणि सुंदर दिसतात. या गावातील 1930 च्या रक्तरंजित दंगलीचा अनुभव घेतलेले आणि नंतर सीमेपलीकडे स्थलांतरित झालेले बहुतेक लोक आज हयात नाहीत. परंतु त्यांची कुटुंबे अजूनही त्याच घरात राहतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. 
 
हिंदू आणि शिखांच्या मालमत्ता स्थलांतरित मुस्लिमांनी ताब्यात घेतल्या
गुजरानवाला येथे राहणारे मुस्लिम कधीच श्रीमंत किंवा उच्च वर्गीय समाजातील नव्हते. श्रीमंत आणि उच्चवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व शीख आणि हिंदू करत होते, जे मोठ्या आणि आकर्षक वाड्यांमध्ये राहत असत. तर मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या व्यवसायात आणि घरांमध्ये कर्मचारी म्हणून त्यांच्यासाठी काम करत असत. परंतु जातीय दंगली सुरू झाल्यानंतर, रक्तपात आणि असुरक्षिततेमुळे अनेक हिंदू आणि शीख कुटुंबांना त्यांची भव्य जीवनशैली, महागड्या वाड्या आणि मोठे व्यवसाय सोडून स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतरित होण्याचा पर्याय स्वीकारला.
 
त्यावेळी अनेक हिंदू कुटुंबांनी त्यांच्या मुस्लिम घरातील कामगारांना त्यांच्या घरांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलं असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कारण दंगल संपल्यानंतर ते परत जातील अशी त्यांना आशा होती. पण दंगलीमुळे परिस्थीती बदलली. भारतातून स्थलांतरित मुस्लिमांचा मोठा ओघ या ठिकाणी यायला सुरू झाला. या स्थलांतरित लोकांनी हिंदू आणि शीख यांच्या मालकीच्या मालमत्तेवर जबरदस्तीने ताबा घेतला.


एबीपीच्या टीमने गुजरांवाला सभेत उजाड घरे, मंदिरे आणि गुरुद्वारांचा शोध घेतला तेव्हा हे देखील लक्षात आले की ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा देखील त्या उच्च वर्गातील विशेषाधिकारप्राप्त हिंदू कुटुंबांमध्ये होते. त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या संपत्तीवरचा हक्क सोडावा लागला. मागे राहिलेल्या संपत्तीचा एकतर स्थलांतरित मुस्लिमांनी किंवा गुजरानवालामधील लोकांनी ताबा घेतला किंवा त्या लुटल्या गेल्या. 


स्थानिकांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव
सुनक यांचे आजी-आजोबा आणि इतर अनेकांना सर्व काही सोडून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले होते. त्यांच्या मालमत्ता, जमीन, दुकानांची लूट, चोरी आणि बळजबरीने कब्जा केल्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये अपराधीपणाचे स्पष्ट चिन्हं होती. पण त्यावर कोणीही बोलत नव्हतं. असं दिसतं की ऋषी सुनकचे आजी-आजोबा आणि इतर अनेकांना सर्व काही सोडून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले होते, ते एक अनिच्छेने अज्ञानात बदलले होते आणि मालमत्ता, जमीन, दुकाने आणि मालमत्तेची लूट, चोरी आणि बळजबरीने कब्जा केल्याबद्दल अपराधीपणाचे स्पष्ट चिन्ह होते. जे काही घडलं त्याबद्दल लोकांनी बोलण्यास नकार दिला. तर रस्ते, घरे, जुन्या बाजारपेठा, इमारतींचे बांधकाम, विटा, इतिहासाची साक्ष म्हणून उभं असलेल्या सर्व गोष्टींमधून हे स्पष्ट दिसत होतं.


ब्रिटनचे पहिले आशियाई पंतप्रधान बनलेले ऋषी सुनक हे ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले आहेत, त्या कुटुंबाने 1930 च्या दंगली, रक्तपात आणि नंतरच्या फाळणीदरम्यान विनाशकारी अनुभव घेतला आहे. ऋषी सुनक यांच्या आजी-आजोबांचे घर आंद्रून गुजरानवाला येथे सापडले नाही, पण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दिल्लीला स्थलांतरित व्हावे लागलेल्या नवविवाहित पत्नी, तिचे सासरे आणि सासू यांच्या वेदना, भावनिक त्रास आणि बळजबरीने स्थलांतरित होण्याची मानसिकता यावेळी जाणवत होती.